शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राजू भोसलेंचे क्रशर उद्ध्वस्त करावे लागतील

By admin | Updated: February 19, 2017 23:11 IST

उदयनराजेंचा परळीत इशारा : ज्यांच्याकडे साधी सायकलही नव्हती त्यांच्याकडे घोडागाड्या कुठून आल्या ?

सातारा : ‘मी सत्तेपेक्षा सत्याला आणि सामान्य जनतेला महत्त्व देत आलो आहे. आजपर्यंत जे झाले ते झाले. परंतु ज्यांच्याकडे सायकल नव्हती त्यांच्याकडे गाड्या-घोडी आली कुठून याची चौकशी लावली जाईल. उरमोडीच्या धरणाजवळ असलेल्या अनधिकृत क्रशर आणि बंगला उद्ध्वस्त करण्याचे काम प्रामुख्याने हाती घेण्यात येईल. दहशत-दहशत म्हणून प्रचार करणाऱ्यांना दहशत आणि दादागिरी काय असते ते दाखवून दिले जाईल,’ असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. परळी, ता. सातारा येथील सातारा विकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. कारी गटातील उमेदवार राजश्री महेंद्र शिंदे व कारी गणामधील तानाजी खामकर आणि अंबवडे गणातील उमेदवार कोमल भंडारे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिकूभाऊ भोसले, बबनराव देवरे, वसंत भंडारे, आर. वाय. जाधव, संभाजी देशमुख, बाळासाहेब अनगळ, नितीन कदम, सुरेश दळवी, मोहन राऊत, सुमित काठाळे, सौरभ बोबडे, वैभव पानसरे, आनंदा गाढवे, गणेश गायकवाड, जितेंद्र दळवी, पंकज पाटील, दिलीप गंगावणे, काका कोठावळे, राजू एकबोटे, मोहन जांभळे, रामदास कोकरे, संतोष राऊत, शाम पानसरे, भैया मुलाणी आदी उपस्थित होते. आज मला बाजूला केलं असे आमदार म्हणतात. तथापि, विरोधकांच्या पोस्टर्सवर जेवढे चेहरे आहेत त्या सर्वांना आम्ही वेळोवेळी हिसका दाखविला आहे, हे लक्षात असू द्यात, असे स्पष्ट करून खासदार उदयनराजे म्हणाले, ‘कुणावर अन्याय होत असेल तर मला सहन होत नाही. ज्याच्यावर अन्याय होतोय आणि पोलिसही काही करीत नसतील तर मला गप्प राहता येत नाही. त्यावेळी न्याय देण्याचे काम मी केले तर ती दहशत म्हणत असाल तर असली दहशत मी निश्चित करतो. कारी गटाच्या कार्यक्षेत्रात सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खासदार निधी वाटप केला आहे. कुणाला खात्री करून घ्यायची असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागामधून माहिती घ्यावी. मी नुसते बोलत नाही तर जे बोलतो ते करून दाखवत असतो. तसेच सातारा-कास हा रस्ता अन्युटी प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करून मंजूर करून घेतला आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्याने सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.’ (प्रतिनिधी) आमदार शहरातून संपले...‘विरोधकांना विकास म्हणजे काय असतो हे माहिती आहे का? हा खरा सवाल आहे. नुसता राजूचा विकास झाला म्हणजे संपूर्ण परळी खोऱ्याचा विकास झाला अशी यांची विकासाची व्याख्या आहे. प्रचंड प्रमाणात गैरकारभार करून, खोटी कामे दाखवून त्यांनी प्रचंड माया कमावली आहे. यांच्या सर्व भानगडी आता मीच मांडणार आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे हे आमदार शहरातून संपले आहेत. शाहूनगर आणि शाहूपुरीत त्यांना विचारत नाहीत,’ असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.