शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

Sangli: जत पूर्व भागात पावसाने पिकांची हानी; हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:55 IST

२००९ च्या आठवणी ताज्या, पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले

उमदी : जत तालुक्यात पूर्व भागात मागील आठवडाभर संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. बोरनदी दुथडी वाहत असल्याने पूरसदृशच स्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बांध फुटले आहेत. उभ्या पिकात, फळबागेत पाणी थांबले आहे.जतपूर्व भागात गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रातील मका, तूर, बाजरी या शेती पिकांचे तर डाळिंब द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उमदी भागात अनेक घरांची पडझड देखील झाली आहे. यावर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली. यामुळे शेतकरी सुखावला होता. शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून मका, तूर, भुईमूग, मूग, बाजरी पिकांची पेरणी केली. यावर्षी तरी चांगले पीक येईल आणि मागील कर्ज फिटेल, या आशेवर शेतकरी पिकांची कापणी, सुखवणी करत असतानाच पाऊस आला. उमदी येथील विठ्ठलवाडी, पवार वस्ती, शेवाळे वस्ती, येथे मका, बाजरी, भुईमूग पिकात पाणी साचले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हळळी येथील मेडीदार वस्ती, पाटील वस्ती, येथील पिकांमध्येही पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. बोर्गी, बालगाव येथे सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने बोर नदी दुथडी भरून वाहत आहे. मोरबागी, गिरगाव, माणिकनाळ, सुसलाद, सोनलगी येथे मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने कांदा, मका पिकाचे नुकसान झाले आहे. डाळिंब द्राक्ष या पिकांचेही नुकसान झाले आहे.२००९ च्या आठवणी ताज्या दुष्काळी तालुका असलेल्या जत तालुक्यात २००९ साली अतिवृष्टी व धुवाधार पाऊस झाला होता. या पावसाने बोर नदीला पूर आला. सहा गावाला पाण्याने वेढा दिला. तत्कालीन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी या भागात बोटी आणून लोकांना वाचवले होते. मागील चार दिवसात जत पूर्व भागात होत असलेल्या पावसामुळे २००९ ची आठवणी ताज्या झाल्या आहेत.शेतात, घरासमोर पाणी साचले अहिल्यानगर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याने काम पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी पाईप न घातल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरासमोर पाणी साचले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jat East: Rain devastates crops; thousands of hectares ruined.

Web Summary : Heavy rains in Jat East have caused significant crop damage, impacting pomegranate, millet, and groundnut farms. Homes were damaged, and memories of the 2009 floods resurfaced. Poor highway drainage worsened the situation, leading to waterlogged fields and residences, devastating farmers.