शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पावसाने ५0 हजार एकर द्राक्षबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 18:10 IST

परतीच्या पावसाचा अनपेक्षितपणे मुक्काम लांबला. ऐन द्राक्ष हंगामात आठ दिवस सातत्याने पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देपावसाने ५0 हजार एकर द्राक्षबागांना फटकाद्राक्ष हंगामावर विपरित परिणाम

तासगाव : परतीच्या पावसाचा अनपेक्षितपणे मुक्काम लांबला. ऐन द्राक्ष हंगामात आठ दिवस सातत्याने पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

पीक छाटणीनंतर बहरलेल्या द्राक्षबागा वाचवण्यासाठी रात्रंदिवस औषध फवारणी करून मेहनत केली. मात्र बहुतांश द्राक्षबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनपेक्षित पावसामुळे अतिरिक्त औषध फवारणीचा सुमारे दोनशे कोटींचा भुर्दंड सहन करूनही अनेक द्राक्षबागा सोडून देण्याची वेळ आली आहे. याचा विपरित परिणाम द्राक्ष हंगामावर होणार आहे.जिल्ह्यात तब्बल एक लाख एकर द्राक्षक्षेत्र आहे. त्यापैकी सप्टेंबर महिन्यात ५० टक्के द्राक्षबागांची पीक छाटणी घेण्यात आली होती. लवकर छाटणी घेतल्यानंतर, द्राक्षाला चांगला दर अपेक्षित असतो; यामुळे बागायतदार सप्टेंबरमधील छाटणीला प्राधान्य देतात. मात्र यंदा परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यात छाटणी घेणाऱ्या द्राक्षबागायतदारांचे सर्वच गणित चुकवले.

गेल्या आठवड्यात दुष्काळी पट्ट्यासह जिल्हाभर सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसाने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायतदारांचे अर्थकारण कोलमडले आहे. दावण्यासह अनेक रोगांनी द्राक्षबागा वेढल्या आहेत. फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष बागांत घडकूज झाली आहे. मणी तयार झालेल्या बागांची मणीगळ झाली आहे. यामुळे बागायतदार सैरभैर झाले आहेत.पावसाने होणारे नुकसान थोपवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रं-दिवस औषध फवारणीचा मारा केला. द्राक्षबागेत गुडघाभर, काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले होते. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या जिकिरीने औषध फवारणीचा धडाका लावला.

अनेकदा औषध फवारणीनंतर लगेचच पाऊस आल्याने एका-एका दिवशी दोन ते तीनवेळा औषध फवारणी करून द्राक्षे वाचवण्याची धडपड सुरू होती. एका आठवड्यात एक एकर द्राक्षबागेसाठी सरासरी ४० हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड शेतकºयांना सोसावा लागला आहे.छाटणी झालेल्या ५० हजार एकर क्षेत्रासाठी तब्बल दोनशे कोटी रुपयांचा चुराडा झाला. इतके करूनही बहुतांश द्राक्षबागांचे नुकसान थांबवण्यात अपयश आले आहे. वर्षभर बाग जतन करून, ऐन फळधारणेच्या हंगामात पावसाने झोडपून काढल्याने अनेक बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्षबागायतदारांकडून होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसSangliसांगली