शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ५0 हजार एकर द्राक्षबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 18:10 IST

परतीच्या पावसाचा अनपेक्षितपणे मुक्काम लांबला. ऐन द्राक्ष हंगामात आठ दिवस सातत्याने पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देपावसाने ५0 हजार एकर द्राक्षबागांना फटकाद्राक्ष हंगामावर विपरित परिणाम

तासगाव : परतीच्या पावसाचा अनपेक्षितपणे मुक्काम लांबला. ऐन द्राक्ष हंगामात आठ दिवस सातत्याने पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

पीक छाटणीनंतर बहरलेल्या द्राक्षबागा वाचवण्यासाठी रात्रंदिवस औषध फवारणी करून मेहनत केली. मात्र बहुतांश द्राक्षबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनपेक्षित पावसामुळे अतिरिक्त औषध फवारणीचा सुमारे दोनशे कोटींचा भुर्दंड सहन करूनही अनेक द्राक्षबागा सोडून देण्याची वेळ आली आहे. याचा विपरित परिणाम द्राक्ष हंगामावर होणार आहे.जिल्ह्यात तब्बल एक लाख एकर द्राक्षक्षेत्र आहे. त्यापैकी सप्टेंबर महिन्यात ५० टक्के द्राक्षबागांची पीक छाटणी घेण्यात आली होती. लवकर छाटणी घेतल्यानंतर, द्राक्षाला चांगला दर अपेक्षित असतो; यामुळे बागायतदार सप्टेंबरमधील छाटणीला प्राधान्य देतात. मात्र यंदा परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यात छाटणी घेणाऱ्या द्राक्षबागायतदारांचे सर्वच गणित चुकवले.

गेल्या आठवड्यात दुष्काळी पट्ट्यासह जिल्हाभर सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसाने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायतदारांचे अर्थकारण कोलमडले आहे. दावण्यासह अनेक रोगांनी द्राक्षबागा वेढल्या आहेत. फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष बागांत घडकूज झाली आहे. मणी तयार झालेल्या बागांची मणीगळ झाली आहे. यामुळे बागायतदार सैरभैर झाले आहेत.पावसाने होणारे नुकसान थोपवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रं-दिवस औषध फवारणीचा मारा केला. द्राक्षबागेत गुडघाभर, काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले होते. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या जिकिरीने औषध फवारणीचा धडाका लावला.

अनेकदा औषध फवारणीनंतर लगेचच पाऊस आल्याने एका-एका दिवशी दोन ते तीनवेळा औषध फवारणी करून द्राक्षे वाचवण्याची धडपड सुरू होती. एका आठवड्यात एक एकर द्राक्षबागेसाठी सरासरी ४० हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड शेतकºयांना सोसावा लागला आहे.छाटणी झालेल्या ५० हजार एकर क्षेत्रासाठी तब्बल दोनशे कोटी रुपयांचा चुराडा झाला. इतके करूनही बहुतांश द्राक्षबागांचे नुकसान थांबवण्यात अपयश आले आहे. वर्षभर बाग जतन करून, ऐन फळधारणेच्या हंगामात पावसाने झोडपून काढल्याने अनेक बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्षबागायतदारांकडून होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसSangliसांगली