शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्व भागात पावसाने द्राक्षबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 15:05 IST

फवारणीनंतर चार-पाच तास तरी पावसाने उघडीप द्यायला हवी. मात्र पाऊस जास्त उघडीप देत नसल्याने औषध फवारणीनंतर पाऊस पडल्याने औषधाचा रोगावर परिणाम होत नाही.

ठळक मुद्दे दररोज एकरी दोन ते तीन हजार रुपये औषधांना लागत असून हे एकप्रकारचे  मोठे नुकसानच आहे.

लिंगनूर-मिरज : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, बेळंकी, संतोषवाडी, खटाव परिसराला परतीच्या पावसाने झोडपल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. द्राक्षबागांमध्ये पाणी साचून राहिल्याने दावण्यासह अनेक रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे दिवाळीत दिवाळ निघण्याची वेळ आली असून उत्पादनात घट होऊन प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे.

मिरज पूर्व भागातील द्राक्षे बाजारपेठेत सर्वात प्रथम येतात. त्यामुळे द्राक्षपेटीला जास्त भाव मिळत असतो. त्यासाठी द्राक्ष उत्पादकांना जुलै, आॅगस्टमध्ये फळ छाटणी घ्यावी लागत असते. मात्र यंदा बागायतदारांनी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस असल्याने उशिरा आॅक्टोबर महिन्यात फळछाटणी घेण्यास पसंती दिली. तरी देखील छाटणीनंतर परतीच्या पावसाने परिसरात गेल्या आठ दिवसांपासून तळ ठोकल्याने द्राक्ष बागायदार अडचणीत सापडला आहे. सध्या अनेक बागा पोंगा स्थितीमध्ये आहेत, तर काही बागा फुलोºयामध्ये आहेत. या स्थितीत द्राक्षबागेचे पावसामुळे नुकसान होते. सध्या पावसाच्या पाण्यामुळे बागांमध्ये औषध फवारणी करणे मुश्किल झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने बागेमध्ये दावण्या रोगाने थैमान घातले आहे. शेतकºयांना जास्त औषध फवारणी करावी लागत आहे. फवारणीनंतर चार-पाच तास तरी पावसाने उघडीप द्यायला हवी. मात्र पाऊस जास्त उघडीप देत नसल्याने औषध फवारणीनंतर पाऊस पडल्याने औषधाचा रोगावर परिणाम होत नाही. त्यामुळे  द्राक्ष उत्पादकांना दोन-तीनदा औषध फवारणी करावी लागत आहे. दररोज एकरी दोन ते तीन हजार रुपये औषधांना लागत असून हे एकप्रकारचे  मोठे नुकसानच आहे. त्यामुळे औषधावारी खर्च होत असल्याने द्राक्षबागायतदार अडचणीत येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी