शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

Sangli News: म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या १५ दिवसांतच विश्रांती, वीजबिलाचा नाहक भुर्दंड सोसावा लागणार

By संतोष भिसे | Updated: February 6, 2023 17:22 IST

१७ जानेवारीस जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते.

सांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या १५ दिवसांतच विश्रांती घ्यावी लागली आहे. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी नसल्याने उपसा थांबविण्यात आला आहे. पंधरा दिवस पंप फिरविल्याने वीजबिलाचा नाहक भुर्दंड कृष्णा खोरे महामंडळाला सोसावा लागणार आहे.१७ जानेवारीस जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते. अधिकाऱ्यांनीही पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाल्याचे सांगितले होते. २० जानेवारीरोजी पंप सुरु करण्यात आले. पण अवघे १५ दिवसच सुरु राहिले. ३ फेब्रुवारीस विश्रांती देण्यात आली. या कालावधीत कृष्णेचे पाणी सलगरेत पाचव्या टप्प्यापलीकडेही जाऊ शकले नाही. अधिकाऱ्यांचे नियोजन जतपर्यंत पाणी नेण्याचे होते, पण मिरज तालुक्याची सीमाही ओलांडता आली नाही. पाणी कालव्यातून वाहत राहिले, शेतकऱ्यांनी मात्र उपसा केला नाही. जत तालुक्यातूनही मागणी अर्ज आले नाहीत. प्रशासनाने वेगवेगळ्या ग्रामपंचायतींत मागणी अर्ज घेण्याची सोय केली होती. पण शेतकरी फिरकले नाहीत.सध्या थंडी अद्याप कायम असल्याने विहिरी व कुपनलिकांतील पाणीसाठे टिकून आहेत. ऊसतोड व द्राक्ष उतरण सुरु आहे. त्यामुळे पाण्याची गरज नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.दरम्यान, सलगरे येथे योजनेच्या पाचव्या पंपगृहात विद्युत पॅनलचे काम सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण पॅनल बदलण्यात येणार आहे. थकबाकी ९८ कोटींवर म्हैसाळ योजनेची गेल्या आवर्तनासह एकूण थकीत पाणीपट्टी ९७ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपट्टीपैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर फक्त १९ टक्के पैसे शेतकऱ्याने भरायचे आहेत. तरीही पैसे भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने २३ हजार ४९४ रुपये प्रतिदशलक्ष घनफूट इतकी पाणीपट्टी निश्चित केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी