शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

प्रचारतोफा थंडावल्या!

By admin | Updated: February 19, 2017 23:46 IST

जि. प., पं. स. निवडणूक : उद्या मतदान यंत्रात बंद होणार उमेदवारांचे भवितव्य

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गेल्या सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री बारा वाजता थंडावल्या. दिग्गज नेत्यांनी सभांचा धुरळा उडवून दिल्याने, प्रचाराचा ‘संडे फिव्हर’ लोकांनी अनुभवला. उद्या, मंगळवारी मतदान होत असून, ५९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३६७ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य १६ लाख तीन हजार १४७ मतदारांच्या हाती आहे. प्रचारासाठी सहा दिवसांचाच कालावधी मिळाल्यामुळे सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होती. प्रचाराचा अखेरचा दिवस रविवारी आल्याने राज्यातील दिग्गज नेते जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात उतरले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून त्यांनी रान उठविले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार राजू शेट्टी अशा दिग्गज नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पक्षीय विजयाचे दावे करतानाच, या स्टार प्रचारकांनी विरोधकांवर आरोपाच्या तोफा डागल्या. यंदा प्रथमच विविध आघाड्या बनल्याने, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांनी सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. रात्री बारापर्यंत प्रचाराला मुभा दिल्यामुळे नेते, उमेदवार, कार्यकर्ते यांनी पायाला भिंगरी लावून रविवारी प्रचार केला. मतदारांच्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाने रविवारची रात्र जागविली. नागरिकांनाही निवडणुकांच्या या धुरळ्यात जागरण करावे लागले. प्रचार संपल्यामुळे पक्षीय नेत्यांनीही सुस्कारा सोडला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून नेत्यांची जी धावपळ सुरू होती, तिला रविवारी रात्री विश्रांती मिळाली. (प्रतिनिधी)नेत्यांची प्रतिष्ठा पणालाजिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार अशा सर्वच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार पतंगराव कदम, आमदार शिवाजीराव देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार विलासराव शिंदे, सदाशिवराव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, मानसिंगराव नाईक, पृथ्वीराज देशमुख अशा सर्वच पक्षांतील नेत्यांचे नातलग निवडणुकीस उभा राहिले आहेत. या नेत्यांसह खासदार राजू शेट्टी, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुरेश खाडे, अजितराव घोरपडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मित्र आणि शत्रुत्वाचा गोंधळआघाड्यांच्या खिचडीमुळे एका मतदारसंघात मित्र असलेला पक्ष दुसऱ्या मतदारसंघात शत्रू आहे. हा अनुभव प्रत्येक पक्षालाच येत असल्यामुळे आरोपांच्या बाबतीतही गोंधळ सुरू आहे. एका बाजूला राष्ट्रवादीवर जोरदार टीका करणाऱ्या भाजपला दुसरीकडे राष्ट्रवादीला मित्र बनवावे लागले आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही ठिकाणी टोकाचा संघर्ष, तर काही ठिकाणी आघाडी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा स्थानिक पातळीवर सोयीनुसार आघाडी केली आहे. नेत्यांच्या स्तरावरही मित्र आणि शत्रुत्वाचा सोयीनुसार खेळ रंगलेला आहे.