शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

प्रचारतोफा थंडावल्या!

By admin | Updated: February 19, 2017 23:46 IST

जि. प., पं. स. निवडणूक : उद्या मतदान यंत्रात बंद होणार उमेदवारांचे भवितव्य

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गेल्या सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री बारा वाजता थंडावल्या. दिग्गज नेत्यांनी सभांचा धुरळा उडवून दिल्याने, प्रचाराचा ‘संडे फिव्हर’ लोकांनी अनुभवला. उद्या, मंगळवारी मतदान होत असून, ५९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३६७ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य १६ लाख तीन हजार १४७ मतदारांच्या हाती आहे. प्रचारासाठी सहा दिवसांचाच कालावधी मिळाल्यामुळे सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होती. प्रचाराचा अखेरचा दिवस रविवारी आल्याने राज्यातील दिग्गज नेते जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात उतरले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून त्यांनी रान उठविले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार राजू शेट्टी अशा दिग्गज नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पक्षीय विजयाचे दावे करतानाच, या स्टार प्रचारकांनी विरोधकांवर आरोपाच्या तोफा डागल्या. यंदा प्रथमच विविध आघाड्या बनल्याने, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांनी सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. रात्री बारापर्यंत प्रचाराला मुभा दिल्यामुळे नेते, उमेदवार, कार्यकर्ते यांनी पायाला भिंगरी लावून रविवारी प्रचार केला. मतदारांच्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाने रविवारची रात्र जागविली. नागरिकांनाही निवडणुकांच्या या धुरळ्यात जागरण करावे लागले. प्रचार संपल्यामुळे पक्षीय नेत्यांनीही सुस्कारा सोडला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून नेत्यांची जी धावपळ सुरू होती, तिला रविवारी रात्री विश्रांती मिळाली. (प्रतिनिधी)नेत्यांची प्रतिष्ठा पणालाजिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार अशा सर्वच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार पतंगराव कदम, आमदार शिवाजीराव देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार विलासराव शिंदे, सदाशिवराव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, मानसिंगराव नाईक, पृथ्वीराज देशमुख अशा सर्वच पक्षांतील नेत्यांचे नातलग निवडणुकीस उभा राहिले आहेत. या नेत्यांसह खासदार राजू शेट्टी, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुरेश खाडे, अजितराव घोरपडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मित्र आणि शत्रुत्वाचा गोंधळआघाड्यांच्या खिचडीमुळे एका मतदारसंघात मित्र असलेला पक्ष दुसऱ्या मतदारसंघात शत्रू आहे. हा अनुभव प्रत्येक पक्षालाच येत असल्यामुळे आरोपांच्या बाबतीतही गोंधळ सुरू आहे. एका बाजूला राष्ट्रवादीवर जोरदार टीका करणाऱ्या भाजपला दुसरीकडे राष्ट्रवादीला मित्र बनवावे लागले आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही ठिकाणी टोकाचा संघर्ष, तर काही ठिकाणी आघाडी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा स्थानिक पातळीवर सोयीनुसार आघाडी केली आहे. नेत्यांच्या स्तरावरही मित्र आणि शत्रुत्वाचा सोयीनुसार खेळ रंगलेला आहे.