शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्रचारतोफा थंडावल्या!

By admin | Updated: February 19, 2017 23:46 IST

जि. प., पं. स. निवडणूक : उद्या मतदान यंत्रात बंद होणार उमेदवारांचे भवितव्य

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गेल्या सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री बारा वाजता थंडावल्या. दिग्गज नेत्यांनी सभांचा धुरळा उडवून दिल्याने, प्रचाराचा ‘संडे फिव्हर’ लोकांनी अनुभवला. उद्या, मंगळवारी मतदान होत असून, ५९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३६७ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य १६ लाख तीन हजार १४७ मतदारांच्या हाती आहे. प्रचारासाठी सहा दिवसांचाच कालावधी मिळाल्यामुळे सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होती. प्रचाराचा अखेरचा दिवस रविवारी आल्याने राज्यातील दिग्गज नेते जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात उतरले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून त्यांनी रान उठविले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार राजू शेट्टी अशा दिग्गज नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पक्षीय विजयाचे दावे करतानाच, या स्टार प्रचारकांनी विरोधकांवर आरोपाच्या तोफा डागल्या. यंदा प्रथमच विविध आघाड्या बनल्याने, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांनी सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. रात्री बारापर्यंत प्रचाराला मुभा दिल्यामुळे नेते, उमेदवार, कार्यकर्ते यांनी पायाला भिंगरी लावून रविवारी प्रचार केला. मतदारांच्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाने रविवारची रात्र जागविली. नागरिकांनाही निवडणुकांच्या या धुरळ्यात जागरण करावे लागले. प्रचार संपल्यामुळे पक्षीय नेत्यांनीही सुस्कारा सोडला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून नेत्यांची जी धावपळ सुरू होती, तिला रविवारी रात्री विश्रांती मिळाली. (प्रतिनिधी)नेत्यांची प्रतिष्ठा पणालाजिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार अशा सर्वच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार पतंगराव कदम, आमदार शिवाजीराव देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार विलासराव शिंदे, सदाशिवराव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, मानसिंगराव नाईक, पृथ्वीराज देशमुख अशा सर्वच पक्षांतील नेत्यांचे नातलग निवडणुकीस उभा राहिले आहेत. या नेत्यांसह खासदार राजू शेट्टी, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुरेश खाडे, अजितराव घोरपडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मित्र आणि शत्रुत्वाचा गोंधळआघाड्यांच्या खिचडीमुळे एका मतदारसंघात मित्र असलेला पक्ष दुसऱ्या मतदारसंघात शत्रू आहे. हा अनुभव प्रत्येक पक्षालाच येत असल्यामुळे आरोपांच्या बाबतीतही गोंधळ सुरू आहे. एका बाजूला राष्ट्रवादीवर जोरदार टीका करणाऱ्या भाजपला दुसरीकडे राष्ट्रवादीला मित्र बनवावे लागले आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही ठिकाणी टोकाचा संघर्ष, तर काही ठिकाणी आघाडी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा स्थानिक पातळीवर सोयीनुसार आघाडी केली आहे. नेत्यांच्या स्तरावरही मित्र आणि शत्रुत्वाचा सोयीनुसार खेळ रंगलेला आहे.