शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणासाठी लोकांना भडकविण्याचा कार्यक्रम : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:08 IST

सांगलीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सदानंद मोरे यांचा गौरव

सांगली : अलीकडच्या काळात सर्वधर्मसमभाव कमी होताना दिसत आहे. धर्मा-धर्मांत, जाती-जातींत संघर्ष दिसत आहे. त्याच्यावर कुणाची तरी राजकीय पोळी भाजून निघत आहे. समाजातील लोकांची मने भडकावण्याचा कार्यक्रम देशाला अधोगतीकडे नेणारा आहे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने रविवारी भावे नाट्यमंदिरात झालेल्या सोहळ्यात ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. लताताई देशपांडे आणि धार्मिक, सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असलेले आप्पासाहेब पाटील यांना ऋणानुबंध पुरस्काराने, तर भवाळकर यांना ‘ब्रँड सांगली’ पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विश्वजित कदम, माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, राजकारणाला राजनीतीचे अधिष्ठान असावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केले; मात्र त्याला राजनीतीचा आधार आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांनाही राजकारण करावे लागले. मात्र त्याला राजनीतीचे अधिष्ठान होते; परंतु आजच्या राजकारणात राजनीतीचे अधिष्ठान कमी होत आहे; ते पूर्ववत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.डॉ. भवाळकर म्हणाल्या, सहकार क्षेत्र नावाची काय भानगड हे सांगलीत आल्यावर कळले. सहकार नसता तर ग्रामीण भागापर्यंत शिक्षण, उद्योग पोहोचू शकले नसते. लोकशाही कशी असावी, याची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रातून केली आहे. राजनीतीमध्ये नैतिकता आहे आणि ती प्रत्येक क्षेत्रात असली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

कृष्णेच्या पाण्यात मुक्त झाल्यासारखे वाटतेजयंत पाटील म्हणाले, कृष्णा नदीचे पाणी देशातील सर्व नद्यांमध्ये पवित्र आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे नरसोबावाडी किंवा हरिपूरच्या संगमात जरी डुबकी मारली तरी आम्हाला सगळ्यांतून मुक्त झालो असे वाटते.

संस्थात्मक वारशावरून टोलावडिलांनी चालवलेल्या सहकारी संस्था त्याच आदर्शाने पुढे चालविणे सर्वच वारसदारांना जमते असे नाही. बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी वारसा म्हणून मिळालेल्या संस्था समर्थपणे चालवल्या आहेत. मात्र अनेकांना असा वारसा चालवता आला नाही, असा टोला पृथ्वीराज पाटील यांनी लगावला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील