शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

जिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणा उत्पादन ५0 टक्के घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:45 IST

जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणा उत्पादन ५0 टक्के घटणारबहुतांश द्राक्षबागांचे उत्पन्न निम्म्यावर

तासगाव : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे सांगली जिल्ह्यात सुमारे ६० हजार एकर द्राक्षबागांना फटका बसला आहे. खरीप छाटणीपासून पीक छाटणीपर्यंत एकरी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च करूनदेखील पावसामुळे द्राक्षबागा सोडून देण्याची वेळ आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.गेल्या आठवडाभरात पावसाने कधी नव्हे एवढे जिल्ह्याला झोडपून काढले. दुष्काळी पट्ट्यातही मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला. सुरुवातीला द्राक्षबागा जगवण्यासाठी हजारो रुपयांची औषध फवारणी करूनदेखील पावसाने पिच्छा सोडला नाही. त्यामुळे शेतकरीच हतबल झाला.

जिल्ह्यातील सुमारे ६० एकर द्राक्षबागांची पीक छाटणी झाली आहे. त्यातील बहुतांश द्राक्षबागांना मोठा फटका बसला. दावण्यासारख्या रोगांनी द्राक्षघड खराब झाले. सततच्या पावसाने मणीगळ, घडकुजीसारख्या संकटांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक द्राक्षबागायतदारांनी बागा सोडून दिल्या आहेत.

औषध फवारणी करून मोठ्या जिद्दीने द्राक्षे टिकवून ठेवण्यासाठी अद्यापही काही द्राक्षबागायतदारांची केविलवाणी धडपड सुरु आहे. मात्र पावसाने झालेल्या नुकसानीचा फटका उत्पन्नाला बसणार असल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश द्राक्षबागांचे उत्पन्न निम्म्यावर येणार आहे. त्यामुळे द्राक्षबागांना हजारो कोटींचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. नुकसानीमुळे यंदा द्राक्षे आणि बेदाण्याच्या उत्पादनातही घट होणार आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीSangliसांगली