शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘ताकारी’चे आवर्तन लांबल्याने तीव्र टंचाई, शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:48 AM

देवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर या दुष्काळी तालुक्यांना नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देनेत्यांचे दुर्लक्ष; शासनाकडेही कोट्यवधीची थकबाकीजिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार झाला असून शासनाकडूनही बिलाची प्रतीक्षा आहे.

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर या दुष्काळी तालुक्यांना नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही. १० कोटी रूपयांच्या वीज बिलाच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीने वीजपुरवठा तोडला आहे. परिणामी रब्बी आवर्तन दीड महिना लांबले आहे. तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकºयांकडून वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम कारखानदार वर्षभर वापरतात. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकºयांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील ऊस अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना पाणी टंचाईचा सामना करीत दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आवर्तन लांबल्याने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर बागायत क्षेत्र धोक्यात आले आहे. मूठभर कारखानदार व प्रशासनातील कामचुकार कर्मचारी यांच्यामुळे नियमित पाणीपट्टी भरणारा शेतकरी भरडला जात आहे.

रब्बी हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरीही प्रशासनाने ताकारीचे आवर्तन सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. सध्या योजनेचे ९ कोटी ४७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा बंद आहे. गत हंगामात साखर कारखान्यांनी शेतकºयांकडून वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम अद्यापही वर्ग केलेली नाही. दरवर्षीच ही स्थिती निर्माण होत असून शासनाकडूनही पाणीपट्टीची कोट्यवधीची रक्कम येणे आहे. यंदा परतीच्या पावसाने सरासरी ओलांडत खरीप हंगाम पार पाडला.

आता रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकºयांनी गहू, हरभरा यासह इतर रब्बी पिकांची पेरणी, टोकणी केली आहे.दरवर्षी ताकारी योजनेची दोन रब्बी आवर्तने देण्यात येतात. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाने योजनेचे रब्बी आवर्तन तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.गत हंगामात साखर कारखान्यांनी वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम अद्यापही पाटबंधारेकडे वर्ग केलेली नाही. त्याचबरोबर जून २०१६ या कालावधित तासगाव तालुक्यासाठी येरळा नदीतून योजनेचे पाणी सोडले होते. हे पाणी लोकप्रतिनिधींच्या मागणीवरुन शासनाने टंचाईतून सोडले होते. याचे ४ कोटीचे बिल शासनाकडून येणे आहे.

याबद्दल जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार झाला असून शासनाकडूनही बिलाची प्रतीक्षा आहे. यावर्षीही खरीप हंगामात टंचाईतून एक आवर्तन देण्यात आले होते. त्याचेही बिल शासनाकडून येणे आहे. त्यामुळे योजनेचे आवर्तन सुरू होण्यासाठी कारखान्यांबरोबरच जिल्हाधिकाºयांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.पाणीपट्टी वसुली : साखर आयुक्तांना पत्रताकारी योजनेचे आवर्तन लांबले आहे. शासनाकडील बाकी व कार्यक्षेत्रातील कारखान्यांनी वसूल केलेली पाणीपट्टी न भरल्याने ही स्थिती ओढविली आहे. कारखान्यांकडील पाणीपट्टी वसुलीसाठी ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी थेट साखर आयुक्तांना पत्र पाठविले आहे. ताकारी योजना दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरत आहे. मात्र शेतकरी पाणीपट्टी वेळेवर भरत असतानाही योजना सुरू होत नसल्याचे टंचाईजन्य स्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांकडील बाकी वसुलीसाठी त्रास होत आहे. या वसुलीसाठी साखर आयुक्तांना पत्र पाठविले असल्याचे पाटील यांनी सांगितले.महावितरण कंपनीला वीज जोडण्यासाठी पत्र : पाटीलथकीत वीज बिलाची रक्कम मोठी असल्याने ती भरण्यासाठी शासनाकडील बाकी लवकर मिळणे गरजेचे आहे. ती या आठवड्यात जमा होईल. ही रक्कम जमा झाली की आम्ही अडीच कोटी रुपयांचा भरणा करु. तरी महावितरणने वीज पुरवठा जोडावा, असे पत्र महावितरण कंपनीला दिले असल्याचे ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीwater transportजलवाहतूक