शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पृथ्वीराजबाबांनी अनुभवली गटबाजी...विटा नगरपालिकेत खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 11:53 PM

विटा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी रात्री काँग्रेसमधील विटा शहरातील व तालुक्यातील गटबाजी अनुभवली. पालिकेत पृथ्वीराजबाबा, माजी आ. सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास खलबते

ठळक मुद्देकदम समर्थकांचे दुकानातच फोटोसेशननिवडणुकीत कदम गटाचा हस्तक्षेप व पक्षांतर्गत गटबाजीमुळे सदाभाऊ नाराज कार्यकर्त्यांनीही विटा बसस्थानकासमोर एकत्रित येऊन बाबांना थांबविण्याचा निर्णय घेतला

दिलीप मोहिते।विटा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी रात्री काँग्रेसमधील विटा शहरातील व तालुक्यातील गटबाजी अनुभवली. पालिकेत पृथ्वीराजबाबा, माजी आ. सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास खलबते झाली, पण त्यातील माहिती समजू शकली नसली तरी, विटा शहराच्या पश्चिमेकडून म्हणजे कडेगावकडून खानापूर तालुक्यात सोडण्यात येणाºया राजकीय ‘क्षेपणास्त्रांवर’ चर्चा झाल्याचे समजते.

बुधवारी जत तालुक्याच्या दौºयावर असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांनी जतहून निघताना अचानक विटामार्गे कºहाडला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बाबांनी माजी आ. पाटील यांना भेटण्यास येत असल्याचा निरोप पाठविला. सदाभाऊंनी पालिकेत जय्यत तयारी केली. याची माहिती माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम समर्थक गटाला मिळताच, या गटातील कार्यकर्त्यांनीही विटा बसस्थानकासमोर एकत्रित येऊन बाबांना थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाबांना बसस्थानकासमोर थांबविण्यात आले. कदम समर्थक माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, रघुराज मेटकरी, डी. के. कदम, माजी उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी आदींनी बाबांना एका शीतपेयाच्या दुकानात नेऊन तेथे फोटोसेशन केले. त्यानंतर बाबांचा ताफा विटा पालिकेकडे रवाना झाला.

पालिकेसमोर सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील प्रवेशव्दारात होते. त्यांनी बाबांचे स्वागत केले. सदाभाऊ, वैभवदादा, उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, मुख्याधिकारी महेश रोकडे व नगरसेवकांनी पालिकेचे कामकाज व कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर नगराध्यक्षांच्या अ‍ॅँटीचेंबरमध्ये बाबा, सदाभाऊ, वैभवदादा तसेच कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात सुमारे पाऊण तास गुप्त चर्चा झाली.

या चर्चेतील माहिती मिळू शकली नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीत सदाभाऊंनी पालिकेवर कॉँग्रेसचा झेंडा फडकविल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कदम गटाचा हस्तक्षेप व पक्षांतर्गत गटबाजीमुळे सदाभाऊ नाराज झाले. त्यातून ते कॉँग्रेसच्या कामात जास्त सक्रिय दिसले नाहीत. त्यामुळेच त्यांची नाराजी काढण्याबाबत बाबांनी विटामार्गे कºहाडला जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.या सर्व प्रकारात पृथ्वीराजबाबांनी खानापूर तालुक्यातील कॉँग्रेस पक्षांतर्गत असलेली कदम-पाटील समर्थकांची गटबाजी चांगलीच अनुभवली.प्रवेशाला ब्रेक?कॉँग्रेस पक्षांतर्गत नेत्यांच्या गटबाजीमुळे नाराज झालेल्या माजी आ. सदाभाऊंना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे खुले आवाहन करण्यात आले. त्यामुळे पृथ्वीराजबाबांनी सदाभाऊंना भेटून पक्ष न सोडण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते. ही चर्चा झाल्याने आता सदाभाऊ, वैभवदादांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागण्याचे संकेत आहेत. सदाभाऊ हे पक्षातील एक ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे महत्त्व ओळखूनच पृथ्वीराजबाबांनी त्यांच्याशी खलबते केल्याचे समजते. या चर्चेचे फलित काय होणार, याकडे आता तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणministerमंत्री