शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

जयंतरावांची ताकद अबाधित, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 5:31 PM

लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा धक्का बसला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले, मात्र शेट्टींना मानणाऱ्या पूर्व भागातील तीन गावात माने यांनी मताधिक्य घेतले.

ठळक मुद्देजयंतरावांची ताकद अबाधित, पण...बालेकिल्ल्यात विरोधकांनी दिले धक्के

युनूस शेख इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा धक्का बसला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले, मात्र शेट्टींना मानणाऱ्या पूर्व भागातील तीन गावात माने यांनी मताधिक्य घेतले.गेल्या दोन अडीच वर्षांपासून जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी धक्के दिले आहेत. इस्लामूपर नगरपालिकेतील सत्तांतर, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवत विरोधकांनी राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत चुरस अनुभवास आली. कॉँग्रेस-राष्ट्रवादी  आघाडीची सोबत घेतल्याने गेल्या दोन निवडणुकीत त्यांना मदत करणारे राष्ट्रवादी वगळता सर्व पक्ष विरोधात गेले, तर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या माने यांच्याविरोधात स्वाभिमानीसह राष्ट्रवादीची ताकद उभी ठाकली.इस्लामपूर हे मतदारसंघातील सर्वात मोठे मतदारसंख्येचे शहर. येथे आ. पाटील यांची वर्चस्व असतानाही शेट्टींना केवळ २२१७ मतांचे अधिक्य मिळाले. गेल्यावेळेपेक्षा केवळ ४१ जादा मतांची भर पडली. त्यापाठोपाठ आष्टा शहरातही शेट्टींना केवळ ७६२ मताधिक्य मिळाले. तेथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे प्राबल्य आहे.रेठरेहरणाक्ष परिसरात राष्ट्रवादीसह शेट्टींना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा वर्ग आहे. केवळ ७ बुथ असणाºया या गावात शेट्टींनी १७०९ इतके मताधिक्य घेतले.बोरगावात कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांचा गट शेट्टींविरोधात उघडपणे गेला. मात्र तरीही येथे शेट्टींना १००१ मते जादा मिळाली. साखराळेत ९१० जादा मते शेट्टींना मिळाली. वाळव्यात धैर्यशील माने यांना केवळ ३९९ मते जादा मिळाली. बावचीत शेट्टी १४८१ मतांनी पुढे राहिले. बागणीत ५०५, तर अवघे १० बुध असणाऱ्यां दुधगावात शेट्टींनी २१४५ मतांची आघाडी घेतली. शिगावात केवळ १८०, तर समडोळीत १५४५ जादा मते शेट्टी यांना मिळाली. कोरेगावात ३५४ चे अधिक्य मिळाले.मतदारसंघाच्या पूर्व भागातील कवठेपिरान (१७५८), कसबे डिग्रज (८९७) आणि तुंग (२०८) अशी आघाडी धैर्यशील माने यांनी घेतली. मतदारसंघातील मोठ्या १५ गावांपैकी, इस्लामपूर, रेठरेहरणाक्ष, बोरगाव, साखराळे, बावची, आष्टा, बागणी, दुधगाव, कोरेगाव, शिगाव, समडोळी या ११ गावांतून शेट्टी यांना १२ हजार ८०९ मतांचे अधिक्य मिळाले, तर कवठेपिरान, वाळवा, कसबे डिग्रज, तुंगमधून माने यांना ३ हजार ६२ मते जादा मिळाली. गेल्या तुलनेत शेट्टींच्या मताधिक्यात घट झाली.

टॅग्स :sangli-pcसांगलीhatkanangle-pcहातकणंगलेRaju Shettyराजू शेट्टी