शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रिमझिम पावसाचा डाळिंब बागांना फटका, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 17:20 IST

उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

संख : जत तालुक्यात गेली दहा दिवसांपासून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागांना फटका बसला आहे. बिब्या, ऑटक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. फूल, कळीची गळती सुरू झाली आहे. उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १२ हजार २२१ एकर आहे. शेतकऱ्यांनी उजाड फोंड्या माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. उमदी, दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, वाळेखिंडी, बेवणूर, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, संख, निगडी बुद्रूक या परिसरात डाळिंब बागा आहेत. गत तीन वर्षांत पिन होल बोरर, मर रोगाने तालुक्यातील पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील बागा वाळवून गेल्याने काढून टाकल्या आहेत.शेतकरी पर्याय पिकाच्या शोधात आहे. गेली दोन वर्षांपासून कोरोना संकटाच्या चक्रव्यूहात डाळिंब बागायतदार सापडला होता. सध्या डाळिंबाला चांगला भाव आहे. शेतकरी भाव मिळेल अशी आशा बाळगून होता. पण आता रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे बागांना फटका बसला आहे. बिब्या, ऑटक बुरशीजन्य रोग वाढवून फूल, कळीची गळती झाली आहे.

फवारणीही रेंगाळली

बागांचा हंगाम वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. रोगांचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी फवारणी घेण्यासाठी दोन ते चार तासही पावसाची उघडीप मिळत नाही. झाडावर पाण्याचे थेंब साचून राहत असल्याने फवारणीच घेता येत नाही. फवारणीला पावसाची उघडीप मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरणामुळे बिब्या, ऑटक, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव डाळिंब बागांवर झाला आहे. उत्पादनात घट झाली आहे. लाखो रुपयांचा फटका बसला आहे. - आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक शेतकरी, दरीबडची

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस