शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रिमझिम पावसाचा डाळिंब बागांना फटका, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 17:20 IST

उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

संख : जत तालुक्यात गेली दहा दिवसांपासून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागांना फटका बसला आहे. बिब्या, ऑटक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. फूल, कळीची गळती सुरू झाली आहे. उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १२ हजार २२१ एकर आहे. शेतकऱ्यांनी उजाड फोंड्या माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. उमदी, दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, वाळेखिंडी, बेवणूर, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, संख, निगडी बुद्रूक या परिसरात डाळिंब बागा आहेत. गत तीन वर्षांत पिन होल बोरर, मर रोगाने तालुक्यातील पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील बागा वाळवून गेल्याने काढून टाकल्या आहेत.शेतकरी पर्याय पिकाच्या शोधात आहे. गेली दोन वर्षांपासून कोरोना संकटाच्या चक्रव्यूहात डाळिंब बागायतदार सापडला होता. सध्या डाळिंबाला चांगला भाव आहे. शेतकरी भाव मिळेल अशी आशा बाळगून होता. पण आता रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे बागांना फटका बसला आहे. बिब्या, ऑटक बुरशीजन्य रोग वाढवून फूल, कळीची गळती झाली आहे.

फवारणीही रेंगाळली

बागांचा हंगाम वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. रोगांचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी फवारणी घेण्यासाठी दोन ते चार तासही पावसाची उघडीप मिळत नाही. झाडावर पाण्याचे थेंब साचून राहत असल्याने फवारणीच घेता येत नाही. फवारणीला पावसाची उघडीप मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरणामुळे बिब्या, ऑटक, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव डाळिंब बागांवर झाला आहे. उत्पादनात घट झाली आहे. लाखो रुपयांचा फटका बसला आहे. - आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक शेतकरी, दरीबडची

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस