शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

कृष्णा प्रदूषित अन् वारणेचे पाणी पेटले; सांगलीत पाण्यावरून राजकारण 

By अविनाश कोळी | Updated: December 8, 2023 16:47 IST

दीर्घकालीन योजनांची महापालिकेला ॲलर्जी

अविनाश कोळीसांगली : कृष्णा नदीला सांडपाण्याच्या प्रदूषणाचे ग्रहण जितके जुने आहे. तितकेच पाणी प्रश्नातल्या राजकीय प्रदूषणाची परंपरा कायम आहे. त्यानुसार सांगलीसाठी आखल्या जाणाऱ्या पर्यायी पाणीपुरवठा योजनेवरून आता राजकारण रंगले आहे. दीर्घकालीन विचार करून ठोस योजना आखणे. ती मुदतीत पूर्ण करणे महापालिकेला आजवर कधीही जमलेले नाही. तांत्रिक व राजकीय अडथळे पार करत कोणतीही योजना पूर्णत्वास न गेल्याने वारणा नदीतून पाणी उचलण्याचा घाट घातला जातोय.सध्या कृष्णा नदीत शेरीनाला जिथे मिसळतो. त्याच्यापासून काही अंतर उत्तरेला महापालिकेचे पाणी उपसा केंद्र आहे. नदीच्या पाण्याची तपासणी सातत्याने होत असते. प्रदूषित पाण्यामुळे सांगलीच्या पाणी योजनेला पर्याय हवा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यायी योजनेची चर्चा सुरू आहे. दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ता काळात महापालिकेने वारणा उद्भव योजना आखली होती. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ही योजना गुंडाळली होती. आता नव्याने पर्यायी योजनेची चर्चा पुढे आली आहे. सर्वपक्षीय चर्चासत्रात सर्वच नेत्यांचे सूर जुळले, मात्र अल्पावधीत सोयीच्या राजकारणाने योजनेला ग्रासले आहे.

अशा आहेत पर्यायी योजना?कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमापासून एक किलोमीटरवर पश्चिमेकडे सांगलीवाडी हद्दीतून वारणेचे पाणी उचलून ते सांगली व कुपवाडला देण्याची योजना आहे. ही योजना २३० कोटी रुपयांची असेल.चांदोली धरणातून थेट पाइपलाइन टाकून सांगली व कुपवाडला पाणी पुरवठा करण्याची दुसरी योजनाही सध्या चर्चेत आहे. अंदाजे १०० किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या या योजनेसाठी महापालिका अधिकाऱ्यांच्या मते १२०० कोटी रुपयांचा खर्च होईल.

म्हणून वारणा नदीतून पाणी उचलण्यास विरोधस्थानिक सामाजिक संघटनांनी चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला पसंती दर्शविली आहे. हरिपूरजवळून पाणी उचलण्याच्या योजनेला प्रदूषणामुळे विरोध होत आहे. म्हैसाळ येथे कृष्णा नदीत बॅरेज उभारण्यात येणार आहे. यामुळे त्याचे बॅकवॉटर दानोळीपर्यंत येणार आहे. दुसरीकडे कृष्णा नदीत सांगलीतून तब्बल ५६.२५ दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज नदीत मिसळते. त्यामुळे हरीपूरपर्यंतच्या पात्राला गटाराचे स्वरूप प्राप्त होते. बॅरेजच्या बॅकवाॅटरमुळे वारणेच्या पात्रालाही प्रदूषणाचा फटका बसणार आहे. त्यामुळे या योजनेतून पुन्हा दूषित पाणीच नागरिकांच्या वाट्याला येईल म्हणून विरोध केला जात आहे.

श्रेयवादाचे राजकारण रंगणारड्रेनेजच्या योजनेप्रमाणेच सांगलीच्या पर्यायी पाणी योजनेमध्ये राजकारणाने शिरकाव केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू राहणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीpollutionप्रदूषण