शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

देशातील जातीविद्वेषाचे राजकारण बंधुतेला घातक : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:19 AM

इस्लामपूर : प्रत्येक धर्मातील महापुरुषांनी मानवतेची जाणीव पेरली; मात्र त्याच महापुरुषांचे अनुयायी आपली दुकानदारी चालविण्यासाठी शत्रुत्व पेरण्याचे काम करत आहेत

ठळक मुद्देइस्लामपुरात राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन; एन. डी. पाटील, अश्विनी धोंगडे यांना पुरस्कार प्रदानरत्येक धर्मवासीयांनी आपल्या धर्माचे आचरण करताना दुसºया धर्मातील जी चांगली तत्त्वे आहेत ती स्वीकारली,

इस्लामपूर : प्रत्येक धर्मातील महापुरुषांनी मानवतेची जाणीव पेरली; मात्र त्याच महापुरुषांचे अनुयायी आपली दुकानदारी चालविण्यासाठी शत्रुत्व पेरण्याचे काम करत आहेत. या प्रवृत्तींच्या माध्यमातून सुरु असलेले जातीविद्वेषाचे राजकारण बंधुतेला घातक आहे. अशावेळी सर्व महापुरुषांना बंधुतेच्या धाग्यात गुंफून एकात्मिक मानवतावादाच्या सूत्राने भारताला तत्त्वज्ञानात्मक महासत्ता बनविण्यासाठी बंधुतेचा विचार जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु असलेल्या एकोणीसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांना ‘राष्ट्रीय बंधुता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सरोज पाटील, प्रकाश रोकडे, महेंद्र भारती, संमेलनाध्यक्ष उध्दव कानडे, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सबनीस म्हणाले, देशातील सध्याचा कालखंड हा जातीय संघर्षाचा आहे. प्रत्येक धर्मात आक्रमक मूलमतत्त्ववाद फोफावत आहे. राज्यकर्ते संविधानाच्या पवित्रतेची लाज गुंडाळून लोकशाहीची विटंबना करत आहेत. सत्य अंग चोरुन उभे आहे. हिंसा ही कोणत्याही धर्माला मान्य नाही. त्यामुळे बंधुतेच्या निकषावर धर्माची चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे. संवादाशिवाय समता आणि बंधुता शक्य नाही. बंधुतेचा विचार जीवनाला विकसित करणारा आहे. त्याची जोपासना करणे गरजेचे आहे.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, धर्म-जाती या माणसानेच निर्माण केल्या आहेत. स्वत:चे हितसंबंध जपण्याचा त्यांचा हा चिरेबंदी खेळ असतो. धर्माच्या नावावर समाज दुभंगून टाकला जात आहे. जाती-धर्माच्या तावडीतून सुटल्याशिवाय तुम्हाला माणूस बनता येणार नाही. आपले विचारधन हे माणुसकी जपणारे असावे. त्यासाठी ‘मी माणूस आहे’ एवढे धाडसाने म्हणण्याचा गर्व बाळगा. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-पातीच्या विध्वंसाची मोहीम राबवून प्रत्येकाला त्याचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, स्त्रियांना माणूसपणाकडे घेऊन जाणारी विचारधारा उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. जीवनाच्या दोन गटांमध्ये विभागलेल्या स्त्रियांना विकासाच्या मध्यप्रवाहात आणण्याची जबाबदारी बंधुता संमेलनाने घ्यावी. स्त्रियांना अत्याचारापासून मुक्त करुन भगिनी बंधुतेचा नवीन प्रयोग सुरु करणे गरजेचे आहे.

समारोपापूर्वी एम. डी. पवार पीपल्स बँकेला ‘राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क’ पुरस्कार देण्यात आला. वैभव पवार यांनी तो स्वीकारला. तसेच हडपसरच्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेस दिलेला ‘स्वामी विवेकानंद’ पुरस्कार शिवाजीराव पवार यांनी स्वीकारला.

त्यानंतर प्रा. जे. पी. देसाई यांनी ‘स्वामी विवेकानंदांचे बंधुतामय तत्त्वज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक धर्मवासीयांनी आपल्या धर्माचे आचरण करताना दुसºया धर्मातील जी चांगली तत्त्वे आहेत ती स्वीकारली, तरच जगाचा विकास शक्य आहे. पावित्र्य, शुध्दता आणि दयाशीलता ही तत्त्वे कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नाही. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म जगन्मान्य केला तरी जागतिक व्यासपीठावर त्यांनी सर्वधर्मसमभावाचे तत्त्वज्ञान मांडले. मानवनिर्मित विषमता नष्ट करणे ही समता ठरते.

डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रकट मुलाखत घतली. वैशाली जौंजाळ यांनी ‘पाझर’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी आभार मानले. नगरसेवक शहाजी पाटील, अ‍ॅड. एन. आर. पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिवाजीराव पवार, प्रा. एल. डी. पाटील, प्रा. सौ. कल्पना मोहिते उपस्थित होत्या.अध्यक्षपदी : सबनीस यांची निवडबंधुता साहित्य परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी बंधुता संमेलनात अध्यक्षपदाच्या निवडीवरुन कधीही निवडणूक अथवा वाद होत नाहीत, असे सांगत, पिंपरी-चिंचवड येथे होणाºया २० व्या बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड जाहीर केली.धोंगडेंची दानत...!व्यासपीठावर राष्ट्रीय बंधुता पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ पुरोगामी लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी आपल्या भाषणावेळीच पुरस्कारातून मिळालेल्या ५ हजार रुपयांच्या रकमेत स्वत:चे ५ हजार रुपये घालून १० हजार रुपयांची देणगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र भारती व प्रकाश रोकडे यांच्याकडे सुपूर्द करुन आपली दानशूरता दाखवून दिली.