शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

निवृत्तीनंतर पोलिसांना घरे मिळावीत : धनंजय जाधव -सांगलीत निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याण संघटनेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:07 IST

सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने पोलीस कल्याण विभाग स्थापन केला पाहिजे, असे मत मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

सांगली : सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने पोलीस कल्याण विभाग स्थापन केला पाहिजे, असे मत मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. याचा पाठपुरावा करण्यासाठी निवृत्तांनी संघटित होऊ लढा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा मेळावा झाला. त्यावेळी जाधव बोलत होते.पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक रामराव वाघ, निवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश घार्गे, मदन चव्हाण, आर. के. पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष व निवृत्त पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत शिंदे, उपाध्यक्ष गजानन शिंदे उपस्थित होते.

जाधव म्हणाले, निवृत्तीनंतर अधिकारी व कर्मचाºयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. निवृत्त पोलिसांना आधार देण्यासाठी संघटनेची स्थापना झाली आहे. यासाठी सर्वांनी संघटित राहिले पाहिजे. निवृत्तीनंतर मानसिकदृष्ट्या सक्षम रहावे, कोणत्याही गोष्टीची काळजी करुन प्रकृती बिघडवून घेऊ नका, स्वत:ला सकारात्मक गोष्टीत गुंतवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

रामराव वाघ म्हणाले की, पोलीस दलात सेवा बजावताना सर्वजण धकाधकीचे जीवन जगतात. ज्या सेवेमुळे आपल्याला नाव, पद, प्रतिष्ठा मिळाली त्याचाही प्रत्येकाने सन्मान ठेवला पाहिजे. आपल्याला न्याय हक्कासाठी हिंसक आंदोलन करता येत नाही.

सेवानिवृत्तीनंतर शासकीय सोयी-सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार? आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असे प्रभाकर घार्गे यांनी सांगितले.निवृत्तीनंतर स्वत:साठी जगले पाहिजे. संघटनेतर्फे निवृत्तांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे आवाहन मदन चव्हाण यांनी केले. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्त अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. गजानन शिंदे यांनी आभार मानले.जिल्ह्यात सहाशे सभासद : चंद्रकांत शिंदेचंद्रकांत शिंदे यांनी प्रास्ताविकात, जिल्ह्यात सहाशेहून अधिक सभासद झाले आहेत. ही संख्या लवकरच हजारावर जाईल. भविष्यनिर्वाह निधीसह अन्य सुविधांचा लाभ असूनही त्या वेळेवर मिळत नाहीत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच संघटना स्थापन केली असल्याचे त्यांनी सांगितले.सांगलीत शनिवारी निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाºयांच्या मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी डावीकडून मदन चव्हाण, आर. के. पाटील, धनंजय जाधव, रामराव वाघ, चंद्रकांत शिंदे, गजानन शिंदे उपस्थित होते.