शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निवृत्तीनंतर पोलिसांना घरे मिळावीत : धनंजय जाधव -सांगलीत निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याण संघटनेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:07 IST

सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने पोलीस कल्याण विभाग स्थापन केला पाहिजे, असे मत मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

सांगली : सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने पोलीस कल्याण विभाग स्थापन केला पाहिजे, असे मत मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. याचा पाठपुरावा करण्यासाठी निवृत्तांनी संघटित होऊ लढा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा मेळावा झाला. त्यावेळी जाधव बोलत होते.पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक रामराव वाघ, निवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश घार्गे, मदन चव्हाण, आर. के. पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष व निवृत्त पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत शिंदे, उपाध्यक्ष गजानन शिंदे उपस्थित होते.

जाधव म्हणाले, निवृत्तीनंतर अधिकारी व कर्मचाºयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. निवृत्त पोलिसांना आधार देण्यासाठी संघटनेची स्थापना झाली आहे. यासाठी सर्वांनी संघटित राहिले पाहिजे. निवृत्तीनंतर मानसिकदृष्ट्या सक्षम रहावे, कोणत्याही गोष्टीची काळजी करुन प्रकृती बिघडवून घेऊ नका, स्वत:ला सकारात्मक गोष्टीत गुंतवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

रामराव वाघ म्हणाले की, पोलीस दलात सेवा बजावताना सर्वजण धकाधकीचे जीवन जगतात. ज्या सेवेमुळे आपल्याला नाव, पद, प्रतिष्ठा मिळाली त्याचाही प्रत्येकाने सन्मान ठेवला पाहिजे. आपल्याला न्याय हक्कासाठी हिंसक आंदोलन करता येत नाही.

सेवानिवृत्तीनंतर शासकीय सोयी-सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार? आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असे प्रभाकर घार्गे यांनी सांगितले.निवृत्तीनंतर स्वत:साठी जगले पाहिजे. संघटनेतर्फे निवृत्तांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे आवाहन मदन चव्हाण यांनी केले. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्त अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. गजानन शिंदे यांनी आभार मानले.जिल्ह्यात सहाशे सभासद : चंद्रकांत शिंदेचंद्रकांत शिंदे यांनी प्रास्ताविकात, जिल्ह्यात सहाशेहून अधिक सभासद झाले आहेत. ही संख्या लवकरच हजारावर जाईल. भविष्यनिर्वाह निधीसह अन्य सुविधांचा लाभ असूनही त्या वेळेवर मिळत नाहीत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच संघटना स्थापन केली असल्याचे त्यांनी सांगितले.सांगलीत शनिवारी निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाºयांच्या मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी डावीकडून मदन चव्हाण, आर. के. पाटील, धनंजय जाधव, रामराव वाघ, चंद्रकांत शिंदे, गजानन शिंदे उपस्थित होते.