शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Police Commemoration Day : 'देशासाठी लढताना शहीद झालेले पोलीस नेहमीच स्मरणात राहतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 14:25 IST

पोलिसांमुळेच समाजाला आजही सुरक्षिततेची भावना वाटते. समाजात शांतता तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने पोलिसच करीत आहेत.

सांगली - पोलिसांमुळेच समाजाला आजही सुरक्षिततेची भावना वाटते. समाजात शांतता तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने पोलिसच करीत आहेत. देशासाठी लढताना प्राणांची आहूती दिलेले शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच स्मरणात राहतील, असे मत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी व्यक्त केले. 

जिल्हा पोलीस दलातर्फे रविवारी सकाळी विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयात शहीद पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काळम-पाटील बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या सीमेवर संरक्षण करताना शहीद होणाऱ्या पोलिसांची संख्या वाढत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत. अन्यत्र ठिकाणीही पोलिसांना टार्गेट करुन हल्ले केले जात आहे. पोलिसांवरील वाढते हल्ले,  ही चिंताजनक बाब आहे. पोलीस आपल्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे, असे विसरुन चालणार नाही. 

यावेळी नांदेड परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर, अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देशभरातील एकूण ४१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

लडाख येथे २१ आॅक्टोबर १९५९ रोजी देशाचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा पोलीस शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराने हल्ला केला होता. या तुकडीने त्याच्याशी लढा देताना प्राणांची आहुती दिली होती. तेंव्हापासून २१ आॅक्टोंबर हा दिवस शहिर पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. 

फैरी झाडून मानवंदना

परेड सलामी शस्त्र व शोक शस्त्र करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशासाठी शहीद झालेल्या अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

टॅग्स :Police Commemoration Dayपोलीस हुतात्मा दिनSangliसांगलीPoliceपोलिस