शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Sangli: चारधामसाठी नेलेल्या यात्रेकरूंना हरिद्वारातच सोडले, इचलकरंजीच्या ठकसेनाचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:57 IST

बुधगाव : कमी खर्चात चारधाम यात्रा करण्याची संधी मिळतेय म्हणून, त्यांनी पैसे भरले... गेलेही हरिद्वारपर्यंत. मात्र तिथूनच ''त्या'' ठकसेन ...

बुधगाव : कमी खर्चात चारधाम यात्रा करण्याची संधी मिळतेय म्हणून, त्यांनी पैसे भरले... गेलेही हरिद्वारपर्यंत. मात्र तिथूनच ''त्या'' ठकसेन ट्रॅव्हल एजंटने पोबारा केल्याने, यात्रेचा नाद सोडून घरी परतण्याची वेळ ३२ यात्रेकरूंवर आली. फसवणूक झालेल्यांमध्ये माधवनगर परिसरातील २३, आष्ट्यातील ४ आणि पुण्यातील ५ जणांचा समावेश आहे. याप्रकरणी कौस्तुभ मिलिंद म्हैशाळकर, (वय ३०, रा. खोतवाडी, इचलकरंजी) या ठकसेन ट्रॅव्हल एजंटविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.इचलकरंजी जवळच्या खोतवाडी येथील कौस्तुभ म्हैशाळकर या ट्रॅव्हल एजंटने केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अशा चारधाम यात्रेचे मागील २२ मे रोजी नियोजन केले होते. २१ हजार ५०० रुपयात प्रवास, निवास व भोजनव्यवस्था करण्याचे त्याने आश्वासन दिले होते. या यात्रेत माधवनगर परिसरातील २० महिला, ३ पुरुष असे २३ जण, आष्ट्यातील ४ आणि पुण्यातील ५ जणांनी प्रत्येकी २१ हजार ५०० रुपये भरून सहभागी झाले होते. नियोजनानुसार आष्टा, माधवनगरमधील २७ जण, स्वत: म्हैशाळकर, एक महिला व दोन पुरुष आचाऱ्यांसह मिरजेतून २२ मे रोजी रेल्वेने गेले होते.२४ मे रोजी ते हरिद्वारला पोहोचले. हरिद्वारमध्ये एका हाॅटेलमध्ये निवास व भोजन व्यवस्था केली होती. मात्र केदारनाथसाठी आवश्यक नोंदणी केली नव्हती. नोंदणी करण्याच्या बहाण्याने तो तिथून बाहेर पडला. मात्र तीन दिवसांनंतरही तो परत तिथे गेला नाही. तो फोनही उचलत नव्हता. फसवणूक लक्षात आल्यानंतर, या यात्रेकरूंनी स्थानिक पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर त्याने हाॅटेलचे बिलही ॲानलाइनच पाठविले.

यात्रेचा मुख्य खर्च असणाऱ्या प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येकाने सुरुवातीलाच त्याच्याकडे पैसे दिले होते. त्यामुळे इतर खर्चासाठी पुरतील इतकेच पैसे प्रत्येकाकडे होते. त्यामुळे भांबावलेल्या या यात्रेकरूंनी परतीचा मार्ग निवडला. ऐनवेळी रेल्वे तिकिटे न मिळाल्याने, बसचा पर्याय त्यांनी स्वीकारला. मजल-दरमजल करीत तब्बल ४८ तासांच्या प्रवासानंतर सर्वजण सांगलीत पोहोचले.कमी खर्चातील यात्रेचा मोह नडला!सांगलीतून चारधाम यात्रेचे संयोजन करणाऱ्या यात्रा कंपन्या २८ हजारांपासून ४० हजार रुपयांपर्यंत प्रत्येकी घेतात. मात्र कमी खर्चात यात्रा करण्याचा मोहच या यात्रेकरूची फसवणूक करून गेला!

यापूर्ही ठकसेनाचा अनेकांना गंडा!

फसवणूक झालेल्यांनी त्याच्या खोतवाडी (इचलकरंजी) येथे जाऊन चौकशी केली असता, त्याने यापूर्वीही अनेकांना विविध प्रकारे गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. गेमच्या नावाखाली शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनाही त्याने ठकविल्याची माहिती समोर आली आहे. माधवनगर परिसरातील या यात्रेकरूंनी आता संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन, फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीharidwar-pcहरिद्वार