शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सांगली जिल्ह्यातील मौनी लोकप्रतिनिधी, चुकीच्या नियोजनामुळे कृष्णाकाठी पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:53 IST

जिल्ह्यासाठी ३७.५० टीएमसी पाणी देण्याचे कोयनेला बंधनकारक

सांगली : जिल्ह्यातील मौनी लोकप्रतिनिधी, चुकीच्या नियोजनामुळे कृष्णा नदीकाठावर पावसाळा संपताच पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. कोयना धरणातून जिल्ह्यासाठी ३७.५० टीएमसी पाणी देण्याचे बंधन आहे; पण सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे सांगली जिल्ह्याला पाणी देण्यात आडकाठी आणली जात आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदीपात्रात अपेक्षित पाणीसाठा नाही. जिल्ह्यातील मध्यम व लघुप्रकल्पात केवळ ३७ टक्के पाणीसाठा आहे. हाच साठा गतवर्षी ८८ टक्के होता. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून सांगलीला पाणी देण्यात अडचणी आणल्या जात असल्याचा आरोपही होत आहे; पण सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काय करतात ? असाही सवाल आहे. सांगली जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी ३७.५० टीएमसी पाणी देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार हे पाणी देण्याचे बंधन कोयना धरण विभागाला आहे; पण त्यासाठी लोकप्रतिनिधीकडून जोर लावला जात नाही.

याबाबत पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता विजयकुमार दिवाण यांच्याशी संपर्क साधला. दिवाण म्हणाले की, कोयना धरण आणि सांगली पाटबंधारे विभागात करार होऊन ३७.५० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर टेंभू, ताकारी योजनेसाठी जादा सहा टीएमसी पाणी देण्याचा करार आहे. त्यानुसार जिल्ह्याला ४४ टीएमसी पाणी धरणातून सोडलेच पाहिजे. सध्या कोयना धरणातील जिवंत पाणीसाठा ८३ टीएमसी आहे. त्यातील सांगली जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी सोडले तरी ४० टीएमसी पाणी शिल्लक राहते.जर दर पंधरा दिवसांपैकी दहा दिवस २१०० क्युसेकप्रमाणे पाणी सोडावे. पाच दिवस उपसा बंदी लावावी असे नियोजन एक नोव्हेंबर ते १५ जूनपर्यंत करावे. सिंचन, बिगर सिंचन, औद्योगिक व पिण्यासाठी १८ टीएमसी, टेंभूसाठी २० टीएमसी आणि ताकारीसाठी ६ टीएमसी राखीव ठेवल्यास ४४ टीएमसी पाणी खर्च पडेल. चुकीच्या नियोजनामुळे कृष्णा काठावरील लोकांना दुष्काळ सामोरे जावे लागत आहे. आजपर्यंत कधीही असे घडले नव्हते.

दुष्काळातही नदीकाठी पाणीटंचाई नव्हती१९९५ व २००३ मध्ये जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. तेव्हाही कृष्णा नदीकाठच्या लोकांना पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. त्यावेळी कोयना धरणात ७८ टीएमसी पाणी होते. तरीहीसुद्धा पाणी कपातीचे संकट निर्माण झाले नव्हते. वीजनिर्मितीसाठी ३९ टीएमसी पाणी शिल्लक असते. हे पाणी शेती, पिण्याच्या पाण्यासाठी वापरावे. विजेसाठी २२६ कोटी रुपये लागतील. इतका भार शासनाने उचलावा. पुरावेळी ५५ हजार कोटी खर्च करण्यापेक्षा २२६ कोटींचा भार कित्येक पटीने कमीच आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीriverनदीKoyana Damकोयना धरण