शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

माणदेशी सचिन खिलारीची अर्जुन पुरस्काराला गवसणी, भारताला ४० वर्षांनी गोळाफेकमध्ये मिळवून दिले पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:48 IST

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आटपाडी तालुक्यात आनंदोत्सव

आटपाडी : शारीरिक कमकुवतपणालाच आपली ताकद बनवत स्वतःला क्रीडाविश्वात सिद्ध करणाऱ्या करगणी (ता. आटपाडी) गावचा सुपुत्र व पॅरा ऑलिम्पिकवीर सचिन खिलारी याला क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. माणदेशातील सचिनला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तालुक्यात गुरुवारी आनंदोत्सव साजरा होत आहे.सचिन खिलारी याने पॅरिस येथील पॅरा ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ ४६ प्रकारात रौप्यपदक पटकावत देशाचे लक्ष वेधले होते. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची केंद्र शासनाने दखल घेतली. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सचिनला गुरुवारी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या सचिनचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिवंगत ॲड. सर्जेराव खिलारी यांचा सचिन हा मुलगा. अवघ्या नवव्या वर्षी सचिन सायकल चालवताना पडला. त्यामध्ये त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. मात्र काही दिवसात ‘गँगरीन’ झाले. जीवघेण्या संकटातून ताे बचावला. पण, त्याच्या हाताच्या हालचालींवर कायमस्वरूपी मर्यादा आल्या. त्याला अपंगत्व आले.बालपणातच झालेला मोठा आघात सचिनने माेठ्या धैर्याने पचविला. लहानपणापासून त्याला खेळाची कमालीची आवड होतीच. शारीरिक मर्यादेचे भांडवल न करता त्याने थेट माेठे मैदान गाजवण्याचा निर्धार केला. अथक परिश्रम आणि स्वप्नपूर्तीच्या निरंतर ध्यासातून सचिन सर्जेराव खिलारी हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले. इंजिनिअर असलेल्या सचिनने देशवासीयांची मान गर्वाने उंचावली आहे. त्याचबराेबर संकटाचे संधीमध्ये कसे रूपांतर करावे, याचा आदर्श देशातील तरुणाईसमाेर ठेवला आहे.

सचिनची दैदीप्पमान कामगिरी..पुण्यात सचिन खिलारीने पहिल्यांदा आझम कॅम्पसमध्ये ॲथलेटिक्स ट्रॅक पाहिला. येथेच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ॲथलेटिक्समध्येच करिअर करण्याचा निश्चय करत प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीफेक व भालाफेकला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत सचिन खिलारीने २०२३ च्या जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत गोळाफेकमधील एफ ४६ गटात १६.२१ मीटर गोळा फेकत सुवर्णपदक पटकावले. २०२४ च्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले. २०२२ मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेतील सुवर्णपदकही त्याच्या नावावर आहे. क्रीडाक्षेत्रातील सचिनच्या या दैदीप्यमान कामागिरीने त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.भारताला ४० वर्षांनी पदक ..सचिन खिलारी याने २०२४ च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्याच्या कामगिरीमुळे भारताला ४० वर्षांनंतर पदक मिळाले. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात पदक जिंकले होते.

टॅग्स :Sangliसांगली