शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
4
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
5
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
6
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
9
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
10
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
11
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
12
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
13
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
14
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
15
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
16
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
17
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
20
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 

पलूस-कडेगावची विभागणी ‘घाटमाथ्या’वरून

By admin | Updated: September 17, 2014 23:03 IST

पलूस-कडेगावची विभागणी ‘घाटमाथ्या’वरून

प्रताप महाडिक - कडेगाव -कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा व सध्या ताकारी व टेंभू योजनांच्या माध्यमातून सधन झालेला कडेगाव तालुका तसेच कृष्णाकाठचा पलूस तालुका अशा दोन तालुक्यांचा समावेश असलेला कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघ आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे पूर्वीचे नाव भिलवडी-वांगी असे होते. १९७८ च्या निवडणुकीपूर्वी खानापूर तालुक्यातील काही गावे आणि तासगाव तालुक्यातील काही गावे मिळून भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघाला ९ निवडणुकांचा इतिहास आहे. यापैकी १९७८ आणि १९८० अशा दोन निवडणुकात पलूस तालुक्यातील संपतराव चव्हाण यांना आमदारकी मिळाली, तर १९९५ च्या निवडणुकीत कडेगाव तालुक्यातील संपतराव देशमुख यांना आणि १९९६ च्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांना आमदारकी मिळाली. उर्वरित १९८५, १९९०, १९९९, २००४ आणि २००९ अशा तब्बल पाच निवडणुका जिंकून कडेगाव तालुक्यातील डॉ. पतंगराव कदम यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.२००९ च्या पुनर्रचनेत पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे आणि बांबवडे या तीन गावांचा समावेश या मतदारसंघात झाला. अन्य सर्व गावे जुन्या भिलवडी-वांगी मतदारसंघातीलच आहेत. कायम दुष्काळी कडेगाव तालुक्यातील शेतकरी मुरमाड व कोरडवाहू शेतजमिनीत काबाडकष्ट करून वाटचाल करीत होते. याशिवाय वसगडे, भिलवडी परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न आहे. अशा भौगोलिक परिस्थितीशी झुंज देणारा हा मतदार राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानला जातो.भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर पहिली निवडणूक झाली, ती १९७८ मध्ये काँग्रेसचे संपतराव चव्हाण आणि शेकापचे क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांच्यात ही निवडणूक झाली. या निवडणुकीत चव्हाण यांनी लाड यांचा २२ हजार ३२२ मताधिक्याने पराभव केला. ही निवडणूक वगळली, तर या मतदारसंघातील सर्व आठही निवडणुका कदम यांनी लढविल्या आहेत. पाच निवडणुकांमध्ये पतंगरावांचा विजय झाला, तर तीन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. १९८० च्या निवडणुकीत पतंगरावांनी बंडखोरी केली. पण, केवळ ८६ मतांनी त्यांचा पराभव झाला. १९८५ च्या निवडणुकीत कदम यांचा ३० हजार १३५ मतांनी विजय झाला. १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष संपतराव देशमुख यांनी कदम यांचा ७ हजार २६५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीचा अपवाद वगळता आजपर्यंत कदम यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या फै री झडणारआगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पतंगराव कदम व महायुतीच्या वाटेवर असलेले पृथ्वीराज देशमुख यांच्यातच कडवा राजकीय सत्तासंघर्ष पहावयास मिळणार आहे. यामुळे या निवडणुकीत आरोप-प्रत्योपांच्या फै री झडणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबाही इच्छुक आहेत. कडेगाव तालुक्यात एक लाख २५ हजार ४४८, तर पलूस तालुक्यात एक लाख २६ हजार २१२, असे एकूण दोन लाख ५१ हजार ६०७ मतदार कडेगाव-पलूस तालुक्याचा आमदार ठरविणार आहेत. दोन्ही तालुक्यात समान मतदान असल्यामुळे प्रचाराचा जोरही दोन्हीकडे समांतर असणार आहे.