शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

५० हजारांच्या अनुदानापासून सांगली जिल्ह्यातील ६० हजारांवर शेतकरी राहणार वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 15:46 IST

जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी शासनाच्या एका चुकीमुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अविनाश कोळीसांगली : महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. योजनेतील परतफेडीच्या तारखेच्या गोंधळाने जिल्ह्यातील ६० हजारांहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान मिळणार असून, सुमारे ६०० कोटीहून अधिक अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी शासनाच्या एका चुकीमुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासनाने कर्ज परतफेडीच्या दिलेल्या देय तारखा व धोरणानुसार बँकांनी दिलेल्या देय तारखांमध्ये मोठी तफावत आहे. २०१७ - १८ या वर्षात घेतलेले अल्प मुदत पीककर्ज ३० जून २०१८पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास, २०१८ - १९ या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास तसेच २०१९ - २० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२०पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.मात्र, कर्जवाटप धोरणाप्रमाणे १ जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत उचल केलेल्या ऊस कर्जाची देय तारीख ३० जून २०१९, तर द्राक्षांसाठी १ जानेवारी २०१८ ते ३१ मार्च २०१८ या काळातील कर्जाची देय तारीख २६ एप्रिल २०१९ आहे. उसाकरिता १ जुलै २०१८ ते ३१ मार्च २०१९पर्यंत वाटप केलेल्या कर्जाची देय तारीख ३१ ऑगस्ट २०२० आहे. द्राक्ष पिकांच्या कर्जासाठीही हीच तारीख देय असते, अशा तिन्हीही आर्थिक वर्षातील प्रत्यक्षातील देय तारखा व शासनाने निश्चित केलेल्या तारखा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करुनही ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे.

जिल्ह्यातील नियमित कर्जदार शेतकरीवर्ष             शेतकरी (लाखात)     कर्ज परतफेड (कोटीत)२०१७-१८    १.३०                   ५४८.२६२०१८-१९    १.१९                   ७७२.३१२०१९-२०    १                        ६६८.०७

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी