शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या शाळेत आरटीईतून प्रवेश नाही'; शासन पैसे देत नसल्याने सांगलीतील खासगी शाळा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:26 IST

मान्यता रद्दचा शासनाचा इशारा

सांगली : आरटीई योजनेतून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे पैसे शासनाकडून मिळत नसल्याने खासगी शाळांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाने पैसे दिले नाहीत, तर ते पालकांकडून घेऊ, असा इशारा शाळांनी दिला आहे. दरम्यान, सांगलीतील एका खासगी शाळेेने तर ‘आमच्या शाळेत आरटीईतून प्रवेश मिळणार नाही’ असा फलकच गेटबाहेर लावला आहे.सक्तीचे व मोफत शिक्षण कायद्यांतर्गत आरटीई योजना राबविली जाते. खासगी इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागा दुर्बल व गरजूंसाठी राखून ठेवल्या जातात तेथे सोडतीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या पाल्यांचे सर्व पैसे शासन शाळांना देते. मात्र, सध्या शासनाकडून हात आखडता घेण्यात आला असून कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळालेला नाही. संपूर्ण राज्याची थकबाकी अडीच हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पैसे मिळावेत म्हणून शाळांकडून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.शासनाने जुने पैसे देण्यापूर्वीच यंदा नव्याने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यासाठी पालकांकडून अर्ज घेतले असून त्यातून सोडतही काढली आहे. पहिल्या टप्प्यात १६१३ पाल्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यांनी प्रवेशासाठी सर्व कागदपत्रे शुक्रवारपर्यंत (दि. २८) जमा करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. पुढील टप्प्यात आणखी काहीवेळा सोडत काढली जाणार आहे.

शासन एकीकडे प्रवेशाची निश्चिती करत असताना शाळा मात्र अस्वस्थ आहेत. शासन पैसे देत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. प्रवेश नाकारता येत नाहीत आणि पैसेही मिळत नाहीत या कोंडीत संस्थाचालक सापडले आहेत. प्रवेश दिले नाहीत, तर प्रसंगी शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शासन करु शकते, त्यामुळे संस्थाचालकांचा नाईलाज झाला आहे.

सरकारी बडग्यापुढे शाळांचे नमतेसांगलीतील एका प्रथितयश खासगी शाळेने गतवर्षी न्यायालयात धाव घेतली होती. शासन पैसे देत नसल्याने आरटीईमधून प्रवेश देणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, न्यायालयाने शाळेचा दावा फेटाळला. जिल्हा परिषदेनेही शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला होता. यावर्षी या शाळेने गेटमध्येच फलक लावला आहे. ‘आरटीईमधून प्रवेश दिले जाणार नाहीत’ असे फलकावर लिहिले आहे. जिल्ह्यातील प्रवेशपात्र शाळांच्या यादीतही ही शाळा नाही.

शासनाच्या आदेशांचे उल्लंघन एखादी शाळा करत असेल, तर तिची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागेल. आरटीईतून प्रवेश प्रक्रिया सर्व पात्र शाळांना राबवावीच लागेल. - मोहन गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थीGovernmentसरकार