शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्लेसह यांत काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

'आमच्या शाळेत आरटीईतून प्रवेश नाही'; शासन पैसे देत नसल्याने सांगलीतील खासगी शाळा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:26 IST

मान्यता रद्दचा शासनाचा इशारा

सांगली : आरटीई योजनेतून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे पैसे शासनाकडून मिळत नसल्याने खासगी शाळांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाने पैसे दिले नाहीत, तर ते पालकांकडून घेऊ, असा इशारा शाळांनी दिला आहे. दरम्यान, सांगलीतील एका खासगी शाळेेने तर ‘आमच्या शाळेत आरटीईतून प्रवेश मिळणार नाही’ असा फलकच गेटबाहेर लावला आहे.सक्तीचे व मोफत शिक्षण कायद्यांतर्गत आरटीई योजना राबविली जाते. खासगी इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागा दुर्बल व गरजूंसाठी राखून ठेवल्या जातात तेथे सोडतीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या पाल्यांचे सर्व पैसे शासन शाळांना देते. मात्र, सध्या शासनाकडून हात आखडता घेण्यात आला असून कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळालेला नाही. संपूर्ण राज्याची थकबाकी अडीच हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पैसे मिळावेत म्हणून शाळांकडून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.शासनाने जुने पैसे देण्यापूर्वीच यंदा नव्याने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यासाठी पालकांकडून अर्ज घेतले असून त्यातून सोडतही काढली आहे. पहिल्या टप्प्यात १६१३ पाल्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यांनी प्रवेशासाठी सर्व कागदपत्रे शुक्रवारपर्यंत (दि. २८) जमा करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. पुढील टप्प्यात आणखी काहीवेळा सोडत काढली जाणार आहे.

शासन एकीकडे प्रवेशाची निश्चिती करत असताना शाळा मात्र अस्वस्थ आहेत. शासन पैसे देत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. प्रवेश नाकारता येत नाहीत आणि पैसेही मिळत नाहीत या कोंडीत संस्थाचालक सापडले आहेत. प्रवेश दिले नाहीत, तर प्रसंगी शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शासन करु शकते, त्यामुळे संस्थाचालकांचा नाईलाज झाला आहे.

सरकारी बडग्यापुढे शाळांचे नमतेसांगलीतील एका प्रथितयश खासगी शाळेने गतवर्षी न्यायालयात धाव घेतली होती. शासन पैसे देत नसल्याने आरटीईमधून प्रवेश देणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, न्यायालयाने शाळेचा दावा फेटाळला. जिल्हा परिषदेनेही शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला होता. यावर्षी या शाळेने गेटमध्येच फलक लावला आहे. ‘आरटीईमधून प्रवेश दिले जाणार नाहीत’ असे फलकावर लिहिले आहे. जिल्ह्यातील प्रवेशपात्र शाळांच्या यादीतही ही शाळा नाही.

शासनाच्या आदेशांचे उल्लंघन एखादी शाळा करत असेल, तर तिची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागेल. आरटीईतून प्रवेश प्रक्रिया सर्व पात्र शाळांना राबवावीच लागेल. - मोहन गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थीGovernmentसरकार