शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

जत तालुक्यात अवकाळीने फळबागांचे १३.८५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:58 IST

जत तालुक्यातील ३ हजार ९९२ शेतकºयांचे २ हजार २५७.५० हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे, तर ३ हजार ९०८ शेतक-यांचे १ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतक-यांना २००९ मधील नुकसानभरपाई मिळाली नाही. यावेळी मुख्य लाभार्थ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.

जयवंत आदाटे ।जत : जत तालुक्यातील ९ हजार ९९०.४९ हेक्टर क्षेत्रातील जिरायत व बागायत आणि फळपिकांचे अवकाळी पावसामुळे सुमारे १३ कोटी ८५ लाख रुपये इतके नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. पंचनामा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याला आणखी मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यात फळबागांचे ५ हजार १६८.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर १८ हजार रुपयेप्रमाणे ९ कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिरायत पिकांचे २ हजार ९०५.५३ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपयेप्रमाणे १ कोटी ९७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बागायती पिकांचे १ हजार ९१६.६५ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर १३ हजार ५०० रुपयेप्रमाणे २ कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र ८९ हजार १२१.९ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ४९ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ७ हजार ९०० शेतकऱ्यांचे ४१ हजार १००.५० हेक्टर क्षेत्रातील तूर, मका, हरभरा, भुईमूग, गहू, बाजरी, कांदा आदी पिकांचे व द्राक्ष आणि डाळिंब फळबागांचे १३ कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान अवकाळी पावसाने झाले आहे.

जत तालुक्यातील ३ हजार ९९२ शेतकºयांचे २ हजार २५७.५० हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे, तर ३ हजार ९०८ शेतक-यांचे १ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माडग्याळ, शेगाव, जत, उमदी, संख, बिळूर गावांसह सीमाभागातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहिल्यामुळे शेतकºयांच्या नुकसानीचा आकडा वाढला आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. सर्वसाधारण ६५ ते ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भयंकर दुष्काळ व अवकाळी नुकसानीचे प्रमाण मोठे आहे.जून व जुलै महिन्यातील नुकसानीची भरपाई शेतक-यांना मिळणार आहे. यानंतरच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात शासनाने आपली भूमिका व धोरण जाहीर करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.

शेतक-यांना २००९ मधील नुकसानभरपाई मिळाली नाही. यावेळी मुख्य लाभार्थ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी