शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात अवकाळीने फळबागांचे १३.८५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:58 IST

जत तालुक्यातील ३ हजार ९९२ शेतकºयांचे २ हजार २५७.५० हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे, तर ३ हजार ९०८ शेतक-यांचे १ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतक-यांना २००९ मधील नुकसानभरपाई मिळाली नाही. यावेळी मुख्य लाभार्थ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.

जयवंत आदाटे ।जत : जत तालुक्यातील ९ हजार ९९०.४९ हेक्टर क्षेत्रातील जिरायत व बागायत आणि फळपिकांचे अवकाळी पावसामुळे सुमारे १३ कोटी ८५ लाख रुपये इतके नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. पंचनामा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याला आणखी मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यात फळबागांचे ५ हजार १६८.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर १८ हजार रुपयेप्रमाणे ९ कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिरायत पिकांचे २ हजार ९०५.५३ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपयेप्रमाणे १ कोटी ९७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बागायती पिकांचे १ हजार ९१६.६५ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. प्रति हेक्टर १३ हजार ५०० रुपयेप्रमाणे २ कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र ८९ हजार १२१.९ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ४९ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ७ हजार ९०० शेतकऱ्यांचे ४१ हजार १००.५० हेक्टर क्षेत्रातील तूर, मका, हरभरा, भुईमूग, गहू, बाजरी, कांदा आदी पिकांचे व द्राक्ष आणि डाळिंब फळबागांचे १३ कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान अवकाळी पावसाने झाले आहे.

जत तालुक्यातील ३ हजार ९९२ शेतकºयांचे २ हजार २५७.५० हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे, तर ३ हजार ९०८ शेतक-यांचे १ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माडग्याळ, शेगाव, जत, उमदी, संख, बिळूर गावांसह सीमाभागातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहिल्यामुळे शेतकºयांच्या नुकसानीचा आकडा वाढला आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. सर्वसाधारण ६५ ते ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भयंकर दुष्काळ व अवकाळी नुकसानीचे प्रमाण मोठे आहे.जून व जुलै महिन्यातील नुकसानीची भरपाई शेतक-यांना मिळणार आहे. यानंतरच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात शासनाने आपली भूमिका व धोरण जाहीर करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.

शेतक-यांना २००९ मधील नुकसानभरपाई मिळाली नाही. यावेळी मुख्य लाभार्थ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी