शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट

By संतोष भिसे | Updated: May 11, 2024 16:04 IST

उद्योगांसाठी वापर वाढला, शेती व पिण्यासाठी आरक्षणाची मागणी

विकास शहाशिराळा : शिराळा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरणा धरणातीलपाणीसाठा फक्त अवघा ९ टक्के शिल्लक आहे. त्यामुळे शहरास काही दिवसांनी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी प्रामुख्याने पाणी देणे आवश्यक आहे; मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी तातडीने न सोडल्यास शिराळ्यासह अनेक गावांचा पिण्याच्या व शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.वाकुर्डे योजनेचे पाणी मोरणा धरणात ३ मार्च रोजी सोडले होते. त्यावेळी फक्त ४ टक्केच पाणीसाठा वाढला होता. याचा फारसा परिणाम पाणीसाठ्यावर झाला नव्हता. सध्या धरणात २९ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा फक्त ९ टक्केच आहे. धरणातून मोरणा नदीत सोडण्यात येणाऱ्या मुख्य दरवाज्याच्या काढण्यात आलेल्या चाचीमध्ये गाळ साचल्यामुळे २९ एप्रिलमध्ये सोडलेले पाणी कमी दाबाने आल्यामुळे शेतीला पाणी अपुरे पडले होते.आता सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावेळी पाणी मिळेल का नाही, अशी अवस्था आहे. पाणी नाही सोडले तर धरणापासून ते मांगलेपर्यंत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. या धरणातून नदीत पाच दिवस पाणी सोडण्यात येते. तर दहा दिवस बंद व जलाशयात ५ दिवस उपसा व १० दिवस उपसाबंदी असे नियोजन आहे. धरणातील पाण्यावर पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी २० गावे व प्रामुख्याने शिराळा शहराला व एम.आय.डी.सी. पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. मोरणा धरणाच्या क्षमतेपेक्षा दुप्पट पाणी वापरात येणारा राज्यातील एकमेव मध्यम प्रकल्प आहे. शासनाच्या नियमानुसार वीजबिले आजअखेर शेतकऱ्यांनी भरली असतानाही आमची अवस्था अशी का? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

धरणाच्या लाभक्षेत्रातील गावेजलाशयातील : शिराळा, एमआयडीसी तडवळे, उपवळे, अंत्री खुर्द, अंत्री बुद्रुक, पाडळी, पाडळेवाडीधरणाखालील : बिऊर, भाटशिरगाव, शिंगटेवाडी, जांभळेवाडी, धुमाळवाडी, चिखलवाडी, फकीरवाडी, इंग्रुळ, मांगले व शिराळ्याचा काही भाग.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळshirala-acशिराळा