घनशाम नवाथे सांगली : रस्ता सुरक्षा अभियान हे केवळ महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी राबविण्याची गरज बनली आहे. कारण, गेल्या पाच महिन्यांत तब्बल २३५ जणांचा अपघाती बळी गेला आहे. गतवर्षीपर्यंत जिल्ह्यात दर २० तासांत एक अपघाती बळी जात होता. आता दर १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत असून, हे चित्र चिंता करायला लावणारे आहे.रस्ते अपघात हा सध्या चिंताजनक विषय बनला आहे. कारण, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी महिन्यात राबविण्यात आले. अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. परंतु अपघातांचे प्रमाण काही कमी झाले नाही. अभियानात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपघातांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती. अभियान वर्षभर राबवले जाऊन ती चळवळ बनायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.दहा वर्षांपूर्वीपर्यंत अपघाताच्या प्रमुख कारणांचा शोध घेताना ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणीच अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार वारंवार अपघात होणारे ‘ब्लॅक स्पॉट’ नष्ट करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास ६५ हून अधिक ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सध्या बोटावर मोजण्याइतपत ही ठिकाणे आहेत. तीदेखील नष्ट केली जात आहेत.अलिकडे ‘ब्लॅक स्पॉट’ ऐवजी वाहन चालकांचा बेदरकारपणा अपघातास जास्त कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. खराब रस्ते, धोकादायक वळण, चढ-उतार, अरुंद रस्ता, अशा ठिकाणचे अपघात कमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी अपघात होताना दिसत आहेत. तसेच राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच शहरातदेखील अपघात होत आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण बेदरकारपणा, वेगावर नियंत्रण नसणे हेच दिसून येते. अपघाताला मानवी चुकाच जास्त कारणीभूत ठरत आहेत.
अपघाताची प्रमुख कारणे
- भरधाव वेगाने वाहन चालवणे.
- धोकादायक वाहन चालवणे.
- दारू पिऊन वाहन चालवणे.
- चुकीचे ओव्हरटेक करणे.
- हेल्मेट न घालणे.
अपघाती बळी वाढू लागलेवर्ष - मृत्यूमुखी२०२१ - ३१७२०२२ - ३७३२०२३ - ३४४२०२४ - ४४९२०२५ - २३५(मे अखेर)
अभिनयान नव्हे, चळवळ हवीअपघाताचे वाढते प्रमाण पाहता रस्ता सुरक्षा अभियान केवळ एक महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी चळवळ म्हणून राबविण्याची गरज आहे. तरच वाहन चालकांमध्ये जागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल.
वाहतूक नियमांचे पालन हवेदुचाकी चालवताना हेल्मेट घालणे. चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करणे. महामार्गावर दिलेल्या वेग मर्यादेचे पालन करणे. दारूच्या नशेत वाहन न चालवणे. नादुरुस्त वाहन न चालवणे. ट्रिपल सीट दुचाकी न चालवणे. वाहन चालवताना मोबाइलवर न बोलणे आदी नियमांचे पालन करावे.
२० तासांवरून १६ तासांवर प्रमाणजिल्ह्यात गतवर्षीपर्यंत दर २० तासांत एकाचा अपघाती बळी जात होता. परंतु अपघाती बळींची संख्या वाढली असून, सध्या १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.