शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १६ तासांत एकाचा जातोय बळी, रस्ता सुरक्षा अभियानानंतरही अपघातांची मालिका

By घनशाम नवाथे | Updated: June 27, 2025 16:49 IST

२० तासांवरून १६ तासांवर प्रमाण

घनशाम नवाथे सांगली : रस्ता सुरक्षा अभियान हे केवळ महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी राबविण्याची गरज बनली आहे. कारण, गेल्या पाच महिन्यांत तब्बल २३५ जणांचा अपघाती बळी गेला आहे. गतवर्षीपर्यंत जिल्ह्यात दर २० तासांत एक अपघाती बळी जात होता. आता दर १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत असून, हे चित्र चिंता करायला लावणारे आहे.रस्ते अपघात हा सध्या चिंताजनक विषय बनला आहे. कारण, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी महिन्यात राबविण्यात आले. अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. परंतु अपघातांचे प्रमाण काही कमी झाले नाही. अभियानात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपघातांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती. अभियान वर्षभर राबवले जाऊन ती चळवळ बनायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.दहा वर्षांपूर्वीपर्यंत अपघाताच्या प्रमुख कारणांचा शोध घेताना ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणीच अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार वारंवार अपघात होणारे ‘ब्लॅक स्पॉट’ नष्ट करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास ६५ हून अधिक ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सध्या बोटावर मोजण्याइतपत ही ठिकाणे आहेत. तीदेखील नष्ट केली जात आहेत.अलिकडे ‘ब्लॅक स्पॉट’ ऐवजी वाहन चालकांचा बेदरकारपणा अपघातास जास्त कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. खराब रस्ते, धोकादायक वळण, चढ-उतार, अरुंद रस्ता, अशा ठिकाणचे अपघात कमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी अपघात होताना दिसत आहेत. तसेच राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच शहरातदेखील अपघात होत आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण बेदरकारपणा, वेगावर नियंत्रण नसणे हेच दिसून येते. अपघाताला मानवी चुकाच जास्त कारणीभूत ठरत आहेत.

अपघाताची प्रमुख कारणे

  • भरधाव वेगाने वाहन चालवणे.
  • धोकादायक वाहन चालवणे.
  • दारू पिऊन वाहन चालवणे.
  • चुकीचे ओव्हरटेक करणे.
  • हेल्मेट न घालणे.

अपघाती बळी वाढू लागलेवर्ष -  मृत्यूमुखी२०२१ - ३१७२०२२ - ३७३२०२३ - ३४४२०२४ - ४४९२०२५ - २३५(मे अखेर) 

अभिनयान नव्हे, चळवळ हवीअपघाताचे वाढते प्रमाण पाहता रस्ता सुरक्षा अभियान केवळ एक महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी चळवळ म्हणून राबविण्याची गरज आहे. तरच वाहन चालकांमध्ये जागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल.

वाहतूक नियमांचे पालन हवेदुचाकी चालवताना हेल्मेट घालणे. चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करणे. महामार्गावर दिलेल्या वेग मर्यादेचे पालन करणे. दारूच्या नशेत वाहन न चालवणे. नादुरुस्त वाहन न चालवणे. ट्रिपल सीट दुचाकी न चालवणे. वाहन चालवताना मोबाइलवर न बोलणे आदी नियमांचे पालन करावे.

२० तासांवरून १६ तासांवर प्रमाणजिल्ह्यात गतवर्षीपर्यंत दर २० तासांत एकाचा अपघाती बळी जात होता. परंतु अपघाती बळींची संख्या वाढली असून, सध्या १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.