शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १६ तासांत एकाचा जातोय बळी, रस्ता सुरक्षा अभियानानंतरही अपघातांची मालिका

By घनशाम नवाथे | Updated: June 27, 2025 16:49 IST

२० तासांवरून १६ तासांवर प्रमाण

घनशाम नवाथे सांगली : रस्ता सुरक्षा अभियान हे केवळ महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी राबविण्याची गरज बनली आहे. कारण, गेल्या पाच महिन्यांत तब्बल २३५ जणांचा अपघाती बळी गेला आहे. गतवर्षीपर्यंत जिल्ह्यात दर २० तासांत एक अपघाती बळी जात होता. आता दर १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत असून, हे चित्र चिंता करायला लावणारे आहे.रस्ते अपघात हा सध्या चिंताजनक विषय बनला आहे. कारण, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी महिन्यात राबविण्यात आले. अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. परंतु अपघातांचे प्रमाण काही कमी झाले नाही. अभियानात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपघातांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती. अभियान वर्षभर राबवले जाऊन ती चळवळ बनायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.दहा वर्षांपूर्वीपर्यंत अपघाताच्या प्रमुख कारणांचा शोध घेताना ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणीच अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार वारंवार अपघात होणारे ‘ब्लॅक स्पॉट’ नष्ट करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास ६५ हून अधिक ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सध्या बोटावर मोजण्याइतपत ही ठिकाणे आहेत. तीदेखील नष्ट केली जात आहेत.अलिकडे ‘ब्लॅक स्पॉट’ ऐवजी वाहन चालकांचा बेदरकारपणा अपघातास जास्त कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. खराब रस्ते, धोकादायक वळण, चढ-उतार, अरुंद रस्ता, अशा ठिकाणचे अपघात कमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी अपघात होताना दिसत आहेत. तसेच राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच शहरातदेखील अपघात होत आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण बेदरकारपणा, वेगावर नियंत्रण नसणे हेच दिसून येते. अपघाताला मानवी चुकाच जास्त कारणीभूत ठरत आहेत.

अपघाताची प्रमुख कारणे

  • भरधाव वेगाने वाहन चालवणे.
  • धोकादायक वाहन चालवणे.
  • दारू पिऊन वाहन चालवणे.
  • चुकीचे ओव्हरटेक करणे.
  • हेल्मेट न घालणे.

अपघाती बळी वाढू लागलेवर्ष -  मृत्यूमुखी२०२१ - ३१७२०२२ - ३७३२०२३ - ३४४२०२४ - ४४९२०२५ - २३५(मे अखेर) 

अभिनयान नव्हे, चळवळ हवीअपघाताचे वाढते प्रमाण पाहता रस्ता सुरक्षा अभियान केवळ एक महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी चळवळ म्हणून राबविण्याची गरज आहे. तरच वाहन चालकांमध्ये जागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल.

वाहतूक नियमांचे पालन हवेदुचाकी चालवताना हेल्मेट घालणे. चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करणे. महामार्गावर दिलेल्या वेग मर्यादेचे पालन करणे. दारूच्या नशेत वाहन न चालवणे. नादुरुस्त वाहन न चालवणे. ट्रिपल सीट दुचाकी न चालवणे. वाहन चालवताना मोबाइलवर न बोलणे आदी नियमांचे पालन करावे.

२० तासांवरून १६ तासांवर प्रमाणजिल्ह्यात गतवर्षीपर्यंत दर २० तासांत एकाचा अपघाती बळी जात होता. परंतु अपघाती बळींची संख्या वाढली असून, सध्या १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.