शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १६ तासांत एकाचा जातोय बळी, रस्ता सुरक्षा अभियानानंतरही अपघातांची मालिका

By घनशाम नवाथे | Updated: June 27, 2025 16:49 IST

२० तासांवरून १६ तासांवर प्रमाण

घनशाम नवाथे सांगली : रस्ता सुरक्षा अभियान हे केवळ महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी राबविण्याची गरज बनली आहे. कारण, गेल्या पाच महिन्यांत तब्बल २३५ जणांचा अपघाती बळी गेला आहे. गतवर्षीपर्यंत जिल्ह्यात दर २० तासांत एक अपघाती बळी जात होता. आता दर १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत असून, हे चित्र चिंता करायला लावणारे आहे.रस्ते अपघात हा सध्या चिंताजनक विषय बनला आहे. कारण, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी महिन्यात राबविण्यात आले. अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. परंतु अपघातांचे प्रमाण काही कमी झाले नाही. अभियानात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपघातांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती. अभियान वर्षभर राबवले जाऊन ती चळवळ बनायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.दहा वर्षांपूर्वीपर्यंत अपघाताच्या प्रमुख कारणांचा शोध घेताना ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणीच अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार वारंवार अपघात होणारे ‘ब्लॅक स्पॉट’ नष्ट करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास ६५ हून अधिक ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सध्या बोटावर मोजण्याइतपत ही ठिकाणे आहेत. तीदेखील नष्ट केली जात आहेत.अलिकडे ‘ब्लॅक स्पॉट’ ऐवजी वाहन चालकांचा बेदरकारपणा अपघातास जास्त कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. खराब रस्ते, धोकादायक वळण, चढ-उतार, अरुंद रस्ता, अशा ठिकाणचे अपघात कमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी अपघात होताना दिसत आहेत. तसेच राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच शहरातदेखील अपघात होत आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण बेदरकारपणा, वेगावर नियंत्रण नसणे हेच दिसून येते. अपघाताला मानवी चुकाच जास्त कारणीभूत ठरत आहेत.

अपघाताची प्रमुख कारणे

  • भरधाव वेगाने वाहन चालवणे.
  • धोकादायक वाहन चालवणे.
  • दारू पिऊन वाहन चालवणे.
  • चुकीचे ओव्हरटेक करणे.
  • हेल्मेट न घालणे.

अपघाती बळी वाढू लागलेवर्ष -  मृत्यूमुखी२०२१ - ३१७२०२२ - ३७३२०२३ - ३४४२०२४ - ४४९२०२५ - २३५(मे अखेर) 

अभिनयान नव्हे, चळवळ हवीअपघाताचे वाढते प्रमाण पाहता रस्ता सुरक्षा अभियान केवळ एक महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी चळवळ म्हणून राबविण्याची गरज आहे. तरच वाहन चालकांमध्ये जागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल.

वाहतूक नियमांचे पालन हवेदुचाकी चालवताना हेल्मेट घालणे. चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करणे. महामार्गावर दिलेल्या वेग मर्यादेचे पालन करणे. दारूच्या नशेत वाहन न चालवणे. नादुरुस्त वाहन न चालवणे. ट्रिपल सीट दुचाकी न चालवणे. वाहन चालवताना मोबाइलवर न बोलणे आदी नियमांचे पालन करावे.

२० तासांवरून १६ तासांवर प्रमाणजिल्ह्यात गतवर्षीपर्यंत दर २० तासांत एकाचा अपघाती बळी जात होता. परंतु अपघाती बळींची संख्या वाढली असून, सध्या १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.