शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: November 24, 2024 17:02 IST

सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या 

अशोक डोंबाळेसांगली : काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत एकसंधपणा दाखविल्याने खासदार विशाल पाटील यांची बंडखोरी यशस्वी झाली. पण, लोकसभा निवडणुकीतील एकी काँग्रेस नेत्यांना विधानसभा निवडणुकीत दाखविता आली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या सांगली व जत यादोन जागा गमवाव्या लागल्या. घराणेशाहीचा मुद्दा या निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्याचे दिसून आले.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी एकसंधपणा दाखविल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते रिचार्ज झाले. कार्यकर्त्यांनी पदरमोड करून पक्षाचा प्रचार करून भरभरून मतांची शिदोरी काँग्रेस अपक्षांच्या पारड्यात टाकले. खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, मिरज, सांगली या पाच विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. केवळ जत विधानसभा मतदारसंघात भाजपला सहा हजार २७१ मतांची आघाडी मिळाली होती.लोकसभा निवडणुका होऊन सहा महिने पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. खासदार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. त्यामुळे विशाल पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील नेत्यांमधील संघर्ष संपवून त्यांना एकत्र आणण्याची गरज होती. पण, काँग्रेसची एकी करण्याऐवजी डॉ. विश्वजित कदम यांनी स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले.अर्थात भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभा केले होते. खासदार विशाल पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसमधील वाद मिटविण्याऐवजी दादा घराण्याचा मुद्दा उपस्थित करून फुटीला खतपाणीच घातले. सांगलीतील काँग्रेसच्या वादाचे पडसाद जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमटले. नेत्यांच्या भूमिकेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षापासून फारकत घेतली. म्हणूनच २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मताची आकडेवारी उमेदवारांना टिकविता आली नाही.

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट..सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ मागील निवडणुकीत सहा हजार मताधिक्याने विजयी झाले होते; पण, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना ३६ हजार १३५ मतांची आघाडी मिळाली. जतमध्येही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांचाही ३७ हजार १०३ मताने पराभव झाला. केवळ काँग्रेस नेत्यांची एकजूट नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेला बेरीज होण्याऐवजी वजाबाकीच झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे नेते आत्मचिंतन करून आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीपूर्वी संघर्ष संपवून नव्याने पक्षबांधणी करणार की नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. नेत्यांनी संघर्ष थांबविला नाही, तर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट होणार आहे.

काँग्रेसचे आणखी काय चुकले?

  • ओबीसी, दलित समाजाची एकसंधपण बांधणी करण्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष
  • काँग्रेस पक्षबांधणीकडे लक्ष देण्याऐवजी गट-तट वाढविण्यात नेते व्यस्त.
  • गावपातळीवर पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष.
  • अंतर्गत वादात मतदारापर्यंत पोहोचण्यात यश.
  • भाजपविरोधात भूमिका मांडण्याऐवजी एकमेकांवर टीकास्त्रात व्यस्त.
  • निवडणुका आल्यानंतरच कार्यकर्त्यांची नेत्यांना आठवण.
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024