शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: November 24, 2024 17:02 IST

सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या 

अशोक डोंबाळेसांगली : काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत एकसंधपणा दाखविल्याने खासदार विशाल पाटील यांची बंडखोरी यशस्वी झाली. पण, लोकसभा निवडणुकीतील एकी काँग्रेस नेत्यांना विधानसभा निवडणुकीत दाखविता आली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या सांगली व जत यादोन जागा गमवाव्या लागल्या. घराणेशाहीचा मुद्दा या निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्याचे दिसून आले.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी एकसंधपणा दाखविल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते रिचार्ज झाले. कार्यकर्त्यांनी पदरमोड करून पक्षाचा प्रचार करून भरभरून मतांची शिदोरी काँग्रेस अपक्षांच्या पारड्यात टाकले. खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, मिरज, सांगली या पाच विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. केवळ जत विधानसभा मतदारसंघात भाजपला सहा हजार २७१ मतांची आघाडी मिळाली होती.लोकसभा निवडणुका होऊन सहा महिने पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. खासदार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. त्यामुळे विशाल पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील नेत्यांमधील संघर्ष संपवून त्यांना एकत्र आणण्याची गरज होती. पण, काँग्रेसची एकी करण्याऐवजी डॉ. विश्वजित कदम यांनी स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले.अर्थात भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभा केले होते. खासदार विशाल पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसमधील वाद मिटविण्याऐवजी दादा घराण्याचा मुद्दा उपस्थित करून फुटीला खतपाणीच घातले. सांगलीतील काँग्रेसच्या वादाचे पडसाद जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमटले. नेत्यांच्या भूमिकेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षापासून फारकत घेतली. म्हणूनच २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मताची आकडेवारी उमेदवारांना टिकविता आली नाही.

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट..सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ मागील निवडणुकीत सहा हजार मताधिक्याने विजयी झाले होते; पण, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना ३६ हजार १३५ मतांची आघाडी मिळाली. जतमध्येही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांचाही ३७ हजार १०३ मताने पराभव झाला. केवळ काँग्रेस नेत्यांची एकजूट नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेला बेरीज होण्याऐवजी वजाबाकीच झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे नेते आत्मचिंतन करून आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीपूर्वी संघर्ष संपवून नव्याने पक्षबांधणी करणार की नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. नेत्यांनी संघर्ष थांबविला नाही, तर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट होणार आहे.

काँग्रेसचे आणखी काय चुकले?

  • ओबीसी, दलित समाजाची एकसंधपण बांधणी करण्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष
  • काँग्रेस पक्षबांधणीकडे लक्ष देण्याऐवजी गट-तट वाढविण्यात नेते व्यस्त.
  • गावपातळीवर पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष.
  • अंतर्गत वादात मतदारापर्यंत पोहोचण्यात यश.
  • भाजपविरोधात भूमिका मांडण्याऐवजी एकमेकांवर टीकास्त्रात व्यस्त.
  • निवडणुका आल्यानंतरच कार्यकर्त्यांची नेत्यांना आठवण.
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024