शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: November 24, 2024 17:02 IST

सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या 

अशोक डोंबाळेसांगली : काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत एकसंधपणा दाखविल्याने खासदार विशाल पाटील यांची बंडखोरी यशस्वी झाली. पण, लोकसभा निवडणुकीतील एकी काँग्रेस नेत्यांना विधानसभा निवडणुकीत दाखविता आली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या सांगली व जत यादोन जागा गमवाव्या लागल्या. घराणेशाहीचा मुद्दा या निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्याचे दिसून आले.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी एकसंधपणा दाखविल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते रिचार्ज झाले. कार्यकर्त्यांनी पदरमोड करून पक्षाचा प्रचार करून भरभरून मतांची शिदोरी काँग्रेस अपक्षांच्या पारड्यात टाकले. खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, मिरज, सांगली या पाच विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. केवळ जत विधानसभा मतदारसंघात भाजपला सहा हजार २७१ मतांची आघाडी मिळाली होती.लोकसभा निवडणुका होऊन सहा महिने पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. खासदार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. त्यामुळे विशाल पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील नेत्यांमधील संघर्ष संपवून त्यांना एकत्र आणण्याची गरज होती. पण, काँग्रेसची एकी करण्याऐवजी डॉ. विश्वजित कदम यांनी स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले.अर्थात भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभा केले होते. खासदार विशाल पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसमधील वाद मिटविण्याऐवजी दादा घराण्याचा मुद्दा उपस्थित करून फुटीला खतपाणीच घातले. सांगलीतील काँग्रेसच्या वादाचे पडसाद जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमटले. नेत्यांच्या भूमिकेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षापासून फारकत घेतली. म्हणूनच २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मताची आकडेवारी उमेदवारांना टिकविता आली नाही.

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट..सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ मागील निवडणुकीत सहा हजार मताधिक्याने विजयी झाले होते; पण, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना ३६ हजार १३५ मतांची आघाडी मिळाली. जतमध्येही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांचाही ३७ हजार १०३ मताने पराभव झाला. केवळ काँग्रेस नेत्यांची एकजूट नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेला बेरीज होण्याऐवजी वजाबाकीच झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे नेते आत्मचिंतन करून आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीपूर्वी संघर्ष संपवून नव्याने पक्षबांधणी करणार की नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. नेत्यांनी संघर्ष थांबविला नाही, तर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट होणार आहे.

काँग्रेसचे आणखी काय चुकले?

  • ओबीसी, दलित समाजाची एकसंधपण बांधणी करण्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष
  • काँग्रेस पक्षबांधणीकडे लक्ष देण्याऐवजी गट-तट वाढविण्यात नेते व्यस्त.
  • गावपातळीवर पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष.
  • अंतर्गत वादात मतदारापर्यंत पोहोचण्यात यश.
  • भाजपविरोधात भूमिका मांडण्याऐवजी एकमेकांवर टीकास्त्रात व्यस्त.
  • निवडणुका आल्यानंतरच कार्यकर्त्यांची नेत्यांना आठवण.
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024