शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

चिंताजनक!, सांगली जिल्ह्यात दर पाच दिवसाला एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:15 IST

गतवर्षीच्या तुलनेत खून वाढले

सांगली : जिल्ह्यात दर पाच दिवसाला एक खून होत असल्याचे भयानक चित्र दिसून येते. सहा महिन्यांत तब्बल ३९ खून झाले आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कारणातून ३० खून झाले आहेत. इतर ९ खून गुन्हेगारीच्या वर्चस्वातून झाल्याचे दिसून येते. पोलिसांनी या सर्व खुनांचा छडा लावला असला तरी खुनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. कुपवाड, इस्लामपूर परिसरात खुनाचे प्रकार वाढले आहेत.जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत इतर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. परंतु दुसरीकडे खुनाचे प्रमाण मात्र वाढल्याचे चित्र चिंताजनक म्हणावे लागेल. गुन्हेगारी वर्चस्व, दोन टोळ्यांमधील वाद, खुनाचा बदला यातून खून वाढले नाहीत. परंतु वैयक्तिक कारणातून होणारे खून वाढले आहेत. गुन्हेगारी वर्चस्वातून खून होण्याचे प्रमाण कमी असले तरी एकंदरीत पाच दिवसाला एक खून होतोय म्हटल्यावर हे प्रमाण चिंताजनकच आहे.

गुन्हेगारी टोळ्यांना लगाम घालून संभाव्य गुन्ह्यांना आळा घालता येतो. परंतु वैयक्तिक कारणातून होणारे खून टाळणे पोलिसांच्या हातात राहिले नाही. तरीही जमिनीचा वाद, आर्थिक वाद, कौटुंबिक वाद यातून होणारे खून टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी पोलिस, जिल्हा प्रशासन यांच्यावर राहते.

जमिनीच्या वादातून किंवा गावपातळीवर इतर कारणातून होणारे वाद स्थानिक पातळीवर वेळीच मिटवले गेले तर संभाव्य गंभीर गुन्हे टाळता येतात. त्यासाठीच पोलिस पाटील यांची मदत घेऊन तंटामुक्त समित्यांसमोर गावातील वाद मिटवण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील किरकोळ तंटा, वादातून गंभीर गुन्हे घडू नयेत, दिवाणी खटल्यातून फौजदारी गुन्हा घडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.किरकोळ आणि क्षुल्लक कारणातून खून होत असल्यामुळे ते रोखण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. अल्पवयीन मुलांकडून होणारे खून हा समाजाच्या चिंतेचा विषय आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कळत, नकळत गुन्हेगारीकडे वळणारी पावले वेळीच थांबवली पाहिजेत.

कोयत्याचा सर्रास वापरशेती कामासाठी होणारा कोयत्याचा वापर अलीकडे खून करण्यासाठी होऊ लागला आहे. कोयता विक्रीवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे. त्यामुळे सहजपणे कोयता मिळतो. पोलिसांकडून आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल केले जात असूनही कोयत्याचा वापर थांबलेला नाही. जवळपास ८० ते ९० टक्के खुनाच्या गुन्ह्यात कोयता वापरला जातो.

खुनाची वेगवेगळी कारणेकौटुंबिक वाद, चारित्र्यावर संशय, अनैतिक संबंध, आर्थिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून खुनाच्या घटना घडत आहेत. ३९ पैकी ३० खून वैयक्तिक कारणातून झाले आहेत. इतर खून पूर्ववैमनस्य, खुनाचा बदला, क्षणिक वाद, दारूच्या नशेतील वाद यातून झाले आहेत.

अल्पवयीन गुन्हेगारी धोकादायकजिल्ह्यात झालेल्या अनेक खुनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला आहे. क्षणिक राग, सहनशक्ती नसणे, संयमाचा अभाव, विचार करण्याची क्षमता गमावणे आणि वाईट संगत यामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारी कृत्य करतात असे दिसून येते. काही गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठीही वापर करतात.

जिल्ह्यात इतर गंभीर गुन्ह्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत घटले आहे. परंतु खुनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कारणातून खून होण्याचे प्रमाण अधिक आहे. गाव पातळीवरील वाद, तंटे मिटवण्यासाठी पोलिस पाटील यांची मदत घेतली जाणार आहे. तंटामुक्त समित्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. -संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली.