शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगली लोकसभा काँग्रेसला मिळण्यात एका नेत्याचा अडथळा, योग्यवेळी नाव जाहीर करू - विश्वजित कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 12:10 IST

पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकार

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये, यासाठी कोण प्रयत्नशील आहे, याची जाणीव सर्वांना आहे. मी आताच बोलणं योग्य होणार नाही, योग्य वेळी महाविकास आघाडीतील तो नेता कोण? हे जाहीर करण्यात येईल, असा टोला काँग्रेस नेते माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत लगावला, पण महाविकास आघाडीतील तो नेता कोण, याची जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगली आहे.डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तरीही सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी काही नेते प्रयत्न करीत आहेत, हे सर्वांना माहीत आहे. यामागे कोणत्या प्रकाराचे राजकारण शिजतंय, कोण शिजवतंय याबाबत काही लोकांना माहीत आहे, काहींना माहिती नाही. मात्र, मी त्याबाबत आता स्पष्ट बोलू शकत नाही, योग्यवेळी त्याबाबत बोलणार आहे.सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल. आम्ही सर्वांनी एकमताने विशाल पाटील यांची लोकसभेसाठी उमेदवारी ठरवली आहे. तसा निर्णय एकमताने पक्षश्रेष्ठींना कळविला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, असा शब्द दिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकारचंद्रहार पाटील यांच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील प्रवेशाबद्दल विचारले असता. डॉ. कदम म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपआपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. पक्षात कोणाला घ्यावे, कोणाला घेऊ नये, हा ज्यांचा त्याचा निर्णय आहे. अद्याप सांगली लोकसभेच्या उमेदवारीबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सर्व आदेश दिल्लीवरूनमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सर्व आदेश सध्या दिल्लीवरून येत आहेत. गावांना पाणी देण्यासाठी आता दिल्लीला विचारणार आहे का ? असा खडा सवाल डॉ. विश्वजित कदम यांनी राज्य सरकारला उपस्थित केला. महाराष्ट्रातील पोलिस भरतीदेखील दिल्लीकरांना विचारल्याशिवाय होणार नाही, अशी परिस्थिती आहे, पण पाण्याबाबतीत दिल्लीला विचारू नका, असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदम