शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

आता इथेनॉलच्या ७५ टक्के हिश्श्यासाठी आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:12 IST

महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा डाव हाणून पाडला.

नेर्ले : महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय हा बदल करता येत नाही. तरीही एफआरपीचे दोन तुकडे केले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली. एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा डाव हाणून पाडला. यापुढे इथेनॉलमधील ७५ टक्के हिश्शासाठीही लढा उभारणार असल्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.तांबवे (ता. वाळवा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी केलेल्या आंदोलनास आलेल्या यशाबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, भागवत जाधव, पोपट मोरे, ॲड. एस. यू. संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, आता आपण रस्त्यावरची लढाई जिंकलो आहाेत. एफआरपीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखानदार तयार नव्हते. मात्र, स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे त्यांना गुडघे टेकायला लावले. पहिली उचल २२०० ते २३०० रुपये देण्याचे त्यांचे धोरण होते. याने शेतकऱ्यांची सोसायटी तरी फिटली असती का? जिल्हा बँका कारखानदारांना १३ टक्के व्याजाने पैसे देतात. उत्पादन खर्च वाढला आहे. दोन वेळा महापूर येऊन गेला; पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही. पण, यावेळी कोणालाही सोडणार नाही.जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मुर्दाड आहेत. संघटनेच्या आंदोलनामुळे एकरकमी एफआरपी मिळाली. हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी कधी ऊस प्रश्नावर संसदेत आवाज उठवला का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललेत का? त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी देणे-घेणे नाही.युवा आघाडीचे रविकिरण माने यांनी स्वागत केले. संतोष शेळके, जगन्नाथ भोसले, रामराव जाधव, भगवान सुतार, भास्कर मोरे, शंकर पाटील, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, बबन पाटील, अतुल जाधव, नितीन पाटील यांनी संयोजन केले.

शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावाळवा तालुक्यात शेअर्स मार्केटचे पेव फुटले आहे. तालुक्यात जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कोटी रुपये शेअर्स मार्केटमध्ये बुडाले आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांचे पैसे बुडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा आंदाेलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी