शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

आता इथेनॉलच्या ७५ टक्के हिश्श्यासाठी आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:12 IST

महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा डाव हाणून पाडला.

नेर्ले : महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय हा बदल करता येत नाही. तरीही एफआरपीचे दोन तुकडे केले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली. एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा डाव हाणून पाडला. यापुढे इथेनॉलमधील ७५ टक्के हिश्शासाठीही लढा उभारणार असल्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.तांबवे (ता. वाळवा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी केलेल्या आंदोलनास आलेल्या यशाबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, भागवत जाधव, पोपट मोरे, ॲड. एस. यू. संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, आता आपण रस्त्यावरची लढाई जिंकलो आहाेत. एफआरपीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखानदार तयार नव्हते. मात्र, स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे त्यांना गुडघे टेकायला लावले. पहिली उचल २२०० ते २३०० रुपये देण्याचे त्यांचे धोरण होते. याने शेतकऱ्यांची सोसायटी तरी फिटली असती का? जिल्हा बँका कारखानदारांना १३ टक्के व्याजाने पैसे देतात. उत्पादन खर्च वाढला आहे. दोन वेळा महापूर येऊन गेला; पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही. पण, यावेळी कोणालाही सोडणार नाही.जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मुर्दाड आहेत. संघटनेच्या आंदोलनामुळे एकरकमी एफआरपी मिळाली. हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी कधी ऊस प्रश्नावर संसदेत आवाज उठवला का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललेत का? त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी देणे-घेणे नाही.युवा आघाडीचे रविकिरण माने यांनी स्वागत केले. संतोष शेळके, जगन्नाथ भोसले, रामराव जाधव, भगवान सुतार, भास्कर मोरे, शंकर पाटील, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, बबन पाटील, अतुल जाधव, नितीन पाटील यांनी संयोजन केले.

शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावाळवा तालुक्यात शेअर्स मार्केटचे पेव फुटले आहे. तालुक्यात जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कोटी रुपये शेअर्स मार्केटमध्ये बुडाले आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांचे पैसे बुडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा आंदाेलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी