शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

सागरेश्वरच्या व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्तावच नाही! एनटीआरसीचा मात्र हिरवा कंदील :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:23 AM

देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्या त वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील एनटीआरसी या संस्थेच्या सदस्यांनी केला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी लागणार आहे. येत्या काही महिन्यांत प्रस्ताव दाखल ...

ठळक मुद्देवाघ सोडण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार

देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील एनटीआरसी या संस्थेच्या सदस्यांनी केला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी लागणार आहे. येत्या काही महिन्यांत प्रस्ताव दाखल झाल्यास प्रत्यक्ष अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.

सागरेश्वर व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विचाराधीन आहे. मात्र अजून प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. नॅशनल टायगर रिझर्व्ह कॉर्पोरेशनचे डॉ. विजयकुमार यांनी सागरेश्वर अभयारण्यास भेट देऊन व प्रत्यक्ष अभयारण्याच्या भौगोलिक परिस्थितीची पाहणी करून, येथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याचा दावा केला आहे. तसेच येथे वाघांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

त्यानुसार वरिष्ठ पातळीवर अभयारण्यात वाघ सोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत लवकरच अधिकाऱ्यांचे एक पथक ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन तेथील भौगोलिक व नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास करणार आहे. त्यानंतरच या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.याबाबत वनक्षेत्रपाल साळी म्हणाले की, सागरेश्वर अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी वातावरण व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली तरी, अभयारण्याला कुंपण घालणे गरजेचे आहे. सध्या ७ फूट उंचीचे कुंपण असून ते किमान १५ फूट उंचीचे करणे गरजेचे आहे. अजूनही अभयारण्याच्या काही भागामध्ये जागेच्या हद्दीवरून वाद असल्याने कुंपण घालण्याचे काम थांबलेले आहे. शिवाय कुंपणाशेजारील काही अंतरावरील झाडेही काढावी लागणार आहेत. कर्मचाºयांना प्रशिक्षणासह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यासाठी कोट्यवधीच्या निधीची गरज आहे. प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.प्रकल्पासाठी ३५ कोटींची गरजसागरेश्वर अभयारण्यात वाघ दाखल होण्यासाठी अभयारण्याला कुंपण घालणे, वाहनांची खरेदी करणे, कर्मचाºयांना प्रशिक्षण या व अन्य बाबींसाठी अंदाजे ३५ कोटी रुपयांची गरज आहे.किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणारसागरेश्वर अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग