शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

चारा छावण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:49 IST

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी सहकारी व सेवाभावी संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देचारा छावण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावाजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी सहकारी व सेवाभावी संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर चारा छावणी सुरू करण्याबाबत सहकारी, स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सन 2018-19 मध्ये जिल्ह्यातील 5 तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळी भागातील पशुधन वाचवणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यकतेनुसार जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णयानुसार चारा छावण्या सुरू करावयाच्या आहेत.

तरी चारा टंचाईमुळे चारा छावण्या उघडण्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणी सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषि उत्पन्न बाजार समिती, दूध खरेदी विक्री संघ यासारख्या संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्थेच्या भागभांडवलाची मर्यादाही कमी करून 5 लाखापर्यंत करण्यात आली आहे. तसेच, आयकराची अटही शिथिल केलेली असून संस्थांनी ऑडिट रिपोर्ट जोडण्यात यावा.

तरतुदींचे पालन करणाऱ्या चारा छावण्या चालक संस्थांना प्रतिदिन प्रति मोठे जनावर 90 रुपये आणि लहान जनावरांना 45 रुपये अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. मात्र, संस्थांनीशासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे छावण्यांचे अभिलेख काटेकोरपणे व्यवस्थित ठेवावेत, जेणेकरून देयक अदा करताना अडचणी येणार नाहीत. हे एक सामाजिक कार्य मानून नकारात्मक मानसिकता दूर ठेवावी. सहकारी व स्वयंसेवी संस्थांनी चारा छावणीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे ते म्हणाले.यावेळी दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणासाठी मदतीच्या ठरणाऱ्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक संस्थांनी ज्या ठिकाणी काम करावयाचे आहे, त्या ठिकाणांचा शोध घेऊन, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी सादर करावी.

यासाठी शासन स्तरावरून डिझेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा स्तरावर संपर्क साधावा, जेणेकरून त्रृटी दूर होऊन समन्वय साधण्यास मदत होईल. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, स्वयंसेवी संस्थांबरोबरच नागरिकांनीही यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. तसेच, कार्पोरेट कंपन्यांनी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा. त्यांनी अनुलोम किंवा भारतीय जैन संघटना यासारख्या या कामातील अनुभवी स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने काम करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी महापौर सुरेश पाटील, अनुलोमचे जिल्हा समन्वयक श्रीनिवास गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या सूचनावजा अनुभव व्यक्त केले.

जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दुष्काळग्रस्त भागात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यासाठी असलेल्या अटी व शर्तींची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी लोकसहभाग महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.या बैठकीस अनुलोम, भारतीय जैन संघटना, साखर कारखाने, सहकारी दुध खरेदी विक्री संघ, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली