शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-रत्नागिरी महामार्गावर उमळवाडजवळ नवा उड्डाणपूल; कोल्हापूरला जाण्यासाठी आणखी एक मार्ग

By संतोष भिसे | Updated: January 4, 2025 18:53 IST

संतोष भिसे सांगली : कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. रत्नागिरी-नागपूर महागामार्गाचा एक भाग म्हणून तो अस्तित्वात ...

संतोष भिसेसांगली : कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. रत्नागिरी-नागपूर महागामार्गाचा एक भाग म्हणून तो अस्तित्वात येत आहे. उदगाव (ता. शिरोळ) हद्दीत उमळवाडजवळ त्याची उभारणी होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुमारास त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हा पूल चारपदरी असेल. तो रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा एक भाग आहे. सध्या उदगाव ते जयसिंगपूर यादरम्यान कृष्णा नदीवर तीन पूल आहेत. एक जुना, दुसरा नवा आणि तिसरा रेल्वेचा पूल आहे. या पुलांपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नवा चौथा पूल उभारला जाईल. रत्नागिरी-नागपूर महामार्ग सध्या अंकलीमध्ये येऊन थांबला आहे. पुढील कामासाठी काही ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले असून, काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केल्याने तेथे काम रखडले आहे.मिरजेतून अंकलीपर्यंत आलेला महामार्ग पुढे उमळवाडजवळून जाणार आहे. सध्याच्या अंकली-उदगाव-जयसिंगपूर या रस्त्याशी त्याचा काही संबंध असणार नाही. उमळवाडजवळून आंब्यापर्यंत तो स्वतंत्र प्रवास करेल. यापैकी चोकाक ते अंकली या महामार्गाच्या प्रकल्पासाठी सुमारे ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये या नव्या पुलाच्या खर्चाचाही समावेश आहे. मे महिन्यात काम सुरू झाल्यानंतर काही अडथळे आले नाहीत, तर २०२६ मधील उन्हाळ्यापर्यंत पूल पूर्ण होऊ शकेल.

वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग निघणारसांगली, मिरजेतून कोल्हापूरकडे जाण्यासाठी सध्या अंकली-उदगाव-जयसिंगपूर व अंकली-उमळवाड-तमदलगे बायपास हे रस्ते उपलब्ध आहेत. शिवाय सांगलीतून हरीपूरमार्गे कृष्णा नदीवरील हरीपूर-कोथळी या नव्या पुलावरूनही जाता येते. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील प्रस्तावित नव्या पुलामुळे आणखी एक रस्ता मिळणार आहे. यानिमित्ताने अंकलीपासून जयसिंगपूर-चिपरी-इचलकरंजी फाटा या टप्प्यातील वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग निघणार आहे.

कृष्णा नदीवर​​​​​​​ आठ पुलांचे अस्तित्वसांगलीपासून मिरजेत कृष्णाघाट-अर्जुनवाडपर्यंत कृष्णा नदीवर सध्या आठ पूल अस्तित्वात आहेत. हरीपूर-कोथळी पूल नव्याने उभारण्यात आला असून आयर्विन पुलाला समांतर पुलाचे कामा अद्याप सुरू आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील उमळवाड पूल नवव्या क्रमांकाचा असेल.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग