शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

नागपूर-रत्नागिरी महामार्गावर उमळवाडजवळ नवा उड्डाणपूल; कोल्हापूरला जाण्यासाठी आणखी एक मार्ग

By संतोष भिसे | Updated: January 4, 2025 18:53 IST

संतोष भिसे सांगली : कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. रत्नागिरी-नागपूर महागामार्गाचा एक भाग म्हणून तो अस्तित्वात ...

संतोष भिसेसांगली : कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. रत्नागिरी-नागपूर महागामार्गाचा एक भाग म्हणून तो अस्तित्वात येत आहे. उदगाव (ता. शिरोळ) हद्दीत उमळवाडजवळ त्याची उभारणी होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुमारास त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हा पूल चारपदरी असेल. तो रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा एक भाग आहे. सध्या उदगाव ते जयसिंगपूर यादरम्यान कृष्णा नदीवर तीन पूल आहेत. एक जुना, दुसरा नवा आणि तिसरा रेल्वेचा पूल आहे. या पुलांपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नवा चौथा पूल उभारला जाईल. रत्नागिरी-नागपूर महामार्ग सध्या अंकलीमध्ये येऊन थांबला आहे. पुढील कामासाठी काही ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले असून, काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केल्याने तेथे काम रखडले आहे.मिरजेतून अंकलीपर्यंत आलेला महामार्ग पुढे उमळवाडजवळून जाणार आहे. सध्याच्या अंकली-उदगाव-जयसिंगपूर या रस्त्याशी त्याचा काही संबंध असणार नाही. उमळवाडजवळून आंब्यापर्यंत तो स्वतंत्र प्रवास करेल. यापैकी चोकाक ते अंकली या महामार्गाच्या प्रकल्पासाठी सुमारे ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये या नव्या पुलाच्या खर्चाचाही समावेश आहे. मे महिन्यात काम सुरू झाल्यानंतर काही अडथळे आले नाहीत, तर २०२६ मधील उन्हाळ्यापर्यंत पूल पूर्ण होऊ शकेल.

वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग निघणारसांगली, मिरजेतून कोल्हापूरकडे जाण्यासाठी सध्या अंकली-उदगाव-जयसिंगपूर व अंकली-उमळवाड-तमदलगे बायपास हे रस्ते उपलब्ध आहेत. शिवाय सांगलीतून हरीपूरमार्गे कृष्णा नदीवरील हरीपूर-कोथळी या नव्या पुलावरूनही जाता येते. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील प्रस्तावित नव्या पुलामुळे आणखी एक रस्ता मिळणार आहे. यानिमित्ताने अंकलीपासून जयसिंगपूर-चिपरी-इचलकरंजी फाटा या टप्प्यातील वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग निघणार आहे.

कृष्णा नदीवर​​​​​​​ आठ पुलांचे अस्तित्वसांगलीपासून मिरजेत कृष्णाघाट-अर्जुनवाडपर्यंत कृष्णा नदीवर सध्या आठ पूल अस्तित्वात आहेत. हरीपूर-कोथळी पूल नव्याने उभारण्यात आला असून आयर्विन पुलाला समांतर पुलाचे कामा अद्याप सुरू आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील उमळवाड पूल नवव्या क्रमांकाचा असेल.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग