शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

नागपूर-रत्नागिरी महामार्गावर उमळवाडजवळ नवा उड्डाणपूल; कोल्हापूरला जाण्यासाठी आणखी एक मार्ग

By संतोष भिसे | Updated: January 4, 2025 18:53 IST

संतोष भिसे सांगली : कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. रत्नागिरी-नागपूर महागामार्गाचा एक भाग म्हणून तो अस्तित्वात ...

संतोष भिसेसांगली : कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. रत्नागिरी-नागपूर महागामार्गाचा एक भाग म्हणून तो अस्तित्वात येत आहे. उदगाव (ता. शिरोळ) हद्दीत उमळवाडजवळ त्याची उभारणी होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुमारास त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हा पूल चारपदरी असेल. तो रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा एक भाग आहे. सध्या उदगाव ते जयसिंगपूर यादरम्यान कृष्णा नदीवर तीन पूल आहेत. एक जुना, दुसरा नवा आणि तिसरा रेल्वेचा पूल आहे. या पुलांपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नवा चौथा पूल उभारला जाईल. रत्नागिरी-नागपूर महामार्ग सध्या अंकलीमध्ये येऊन थांबला आहे. पुढील कामासाठी काही ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले असून, काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केल्याने तेथे काम रखडले आहे.मिरजेतून अंकलीपर्यंत आलेला महामार्ग पुढे उमळवाडजवळून जाणार आहे. सध्याच्या अंकली-उदगाव-जयसिंगपूर या रस्त्याशी त्याचा काही संबंध असणार नाही. उमळवाडजवळून आंब्यापर्यंत तो स्वतंत्र प्रवास करेल. यापैकी चोकाक ते अंकली या महामार्गाच्या प्रकल्पासाठी सुमारे ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये या नव्या पुलाच्या खर्चाचाही समावेश आहे. मे महिन्यात काम सुरू झाल्यानंतर काही अडथळे आले नाहीत, तर २०२६ मधील उन्हाळ्यापर्यंत पूल पूर्ण होऊ शकेल.

वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग निघणारसांगली, मिरजेतून कोल्हापूरकडे जाण्यासाठी सध्या अंकली-उदगाव-जयसिंगपूर व अंकली-उमळवाड-तमदलगे बायपास हे रस्ते उपलब्ध आहेत. शिवाय सांगलीतून हरीपूरमार्गे कृष्णा नदीवरील हरीपूर-कोथळी या नव्या पुलावरूनही जाता येते. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील प्रस्तावित नव्या पुलामुळे आणखी एक रस्ता मिळणार आहे. यानिमित्ताने अंकलीपासून जयसिंगपूर-चिपरी-इचलकरंजी फाटा या टप्प्यातील वाहतुकीच्या कोंडीतूनही मार्ग निघणार आहे.

कृष्णा नदीवर​​​​​​​ आठ पुलांचे अस्तित्वसांगलीपासून मिरजेत कृष्णाघाट-अर्जुनवाडपर्यंत कृष्णा नदीवर सध्या आठ पूल अस्तित्वात आहेत. हरीपूर-कोथळी पूल नव्याने उभारण्यात आला असून आयर्विन पुलाला समांतर पुलाचे कामा अद्याप सुरू आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील उमळवाड पूल नवव्या क्रमांकाचा असेल.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग