शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

‘शिवशाही ते पेशवाई’तून नवा दृष्टिकोन

By admin | Updated: February 19, 2017 23:13 IST

अशोक राणा : प्राचार्य पी. बी. पाटील यांचे विचार पुस्तकरूपाने प्रकाशित

सांगली : ‘शिवशाही ते पेशवाई’ या पुस्तकातून प्राचार्य पी. बी. पाटील यांनी इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे. या पुस्तकात कोठेही अभिनिवेश नाही. चुकीच्या इतिहासावर त्यांनी संयमाने संताप व्यक्त केला आहे. शिवचरित्राविषयी अनेक प्रकारचे समज-अपसमज प्रचलित असताना, हे पुस्तक भावी पिढीला मोलाचे मार्गदर्शक ठरेल, असे मत इतिहास संशोधक प्रा. डॉ. अशोक राणा यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. येथील मराठा समाज सभागृहात आयोजित ‘शिवशाही ते पेशवाई’ या विषयावरील व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी मांडलेले विचार त्यांच्या कन्या गीता पाटील यांच्या पुढाकाराने पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले. इतिहास संशोधक डॉ. अशोक राणा यांच्याहस्ते व ज्येष्ठ समाजसेवक परशुराम नंदीहळ्ळी (बेळगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी डॉ. राणा बोलत होते.ते म्हणाले की, प्राचार्य पी. बी. पाटील चालते-बोलते विद्यापीठ होते. राजकारणात राहूनही त्यांनी दोषांना जवळ येऊ दिले नाही. ते आमदार होते, पण राजकारणी नव्हते. शिवशाही ते पेशवाईपर्यंतच्या इतिहासाला हात घालण्याचे धाडस त्यांनी केले. हा विषय तसा विस्फोटक. तरीही तो त्यांनी संयमाने हाताळला आहे. शिवशाहीचे स्वरूप व्यक्त करताना त्यांनी मांडलेले निष्कर्ष त्यांच्या न्यायबुद्धीचे द्योतक आहे. भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानावर त्यांनी मांडलेली मते वाचकांच्या पारंपरिक धारणांना धक्के देणारी ठरतील, यात शंका नाही.सध्या आठ ते दहा दिवसात शिवचरित्र लिहिणारे खूपजण आहेत. पण खरे शिवचरित्र समोर आणण्याचे धाडस मोजकेच लोक दाखवत आहेत. वास्तविक इंग्रजांनी भारताच्या इतिहासाला धार्मिक वळण दिले. त्यात ज्या बखरींचा संदर्भ घेत शिवचरित्र लिहिले गेले, त्या बखरी पूर्वग्रहदूषित होत्या. या बखरींमुळेच छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा विकृतरित्या उभी केली गेली. मराठेशाहीची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत केली. मराठ्यांनी इतिहास घडविला, पण तो लिहिला नाही. प्राचार्य पी. बी. पाटील यांनी इतिहास लेखनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन या पुस्तकातून दिला आहे. पुस्तकाच्या लिखाणात अनेक ठिकाणी त्यांचा संताप व्यक्त झाला आहे. पण तो संतापही त्यांनी संयमाने हाताळला आहे. आता या पुस्तकाची स्वतंत्र समीक्षा होण्याची गरज आहे, असेही डॉ. राणा म्हणाले. परशुराम नंदीहळ्ळी म्हणाले की, प्राचार्य पी. बी. पाटील यांचा ध्येयवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात फिरत होता. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास निर्भीडपणे मांडण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. पी. बी. सर केवळ फर्डे वक्तेच नव्हते, तर ते शाहीरही होते. ते विचारवंत, राजकारणी होते, अंधश्रद्धाळू नव्हते. प्रारंभी ग्रंथदिंडी काढून युद्धकलांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर शाहीर डॉ. राजीव चव्हाण व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी स्वागत केले, तर प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या कन्या गीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. शालिनीताई पाटील यांच्या संदेशाचे वाचन अपर्णा खांडेकर यांनी केले. प्राचार्य पाटील लिखित महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली. यावेळी प्राचार्य पाटील यांची नातवंडे पालखीचे वाहक बनली होती. शेवटी शिवाजी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. तारा भवाळकर, डॉ. अविनाश पाटील, ना. ह. माळी, प्रा. रामचंद्र घोडके, शेतकरी नेते अ‍ॅड. किसनराव येळूरकर (बेळगाव), महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपकराव दळवी (बेळगाव) उपस्थित होते. (प्रतिनिधी)पी. बी. सरांचे रेकॉर्ड कायमपरशुराम नंदीहळ्ळी यांनी प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. बेळगाव येथील वक्तृत्व स्पर्धेवेळी पहिल्यांदा त्यांची भेट झाली. त्यानंतर ते तीनवेळा बेळगावात वक्तृत्व स्पर्धेसाठी आले. तिन्हीवेळी त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला. हा विक्रम आजही अबाधित आहे. सीमालढ्यावेळी त्यांनी खानापूर, येळ्ळूर येथे व्याख्यान दिले होते. त्यांच्या व्याख्यानामुळे स्फुरण येऊन तरूणांनी पहिल्यांदा सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला होता, असेही ते म्हणाले.