शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

Sangli Politics: जयंत पाटील यांच्या मौनात आगामी राजकीय ‘कार्यक्रमा’ची नांदी, कार्यकर्ते संभ्रमात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 16:40 IST

समर्थक, पदाधिकाऱ्यांनीही घेतली सावध भूमिका

अशोक पाटीलइस्लामपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सत्ताधारी गटात जयंत पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चेनंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करीत जाब विचारला होता. आता तेच अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून जयंत पाटील यांनी स्वत:च्या राजकीय वाटचालीबाबत मौन बाळगले आहे. त्यांचे हे मौन भविष्यातील राजकीय ‘कार्यक्रमा’ची नांदी तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची संपूर्ण धुरा आता जयंत पाटील यांच्या खांद्यावर आहे. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जयंत पाटील यांच्या भूमिका राजकीय पटलावर रहस्यपूर्णच ठरल्या. मौन बाळगून योग्य वेळी ‘कार्यक्रम’ करण्यात ते पारंगत असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. राज्यातील राजकारणात अनेक उलथापालथी झाल्यानंतर जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी कोणालाच अचूक अंदाज बांधता आला नाही. जयंत पाटील यांनीही या विषयावर बाेलणे टाळणे पसंत केले.लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून उमेदवार कोण असणार, यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु, यावर जयंत पाटील यांनी कधीच स्पष्ट भाष्य केले नाही. योग्य वेळी आपण त्यावर बोलू, अशी मोजकी प्रतिक्रिया देऊन त्यांनी विषय टाळले आहेत.हातकणंगले मतदारसंघाच्या दोऱ्या अजूनही जयंत पाटील यांच्याच हाती आहेत. तरीही या मतदारसंघातील उमेदवारीबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांचे समर्थकही सध्या मौन बाळगण्यात धन्यता मानत आहेत. तरीही पक्षांतर्गत त्यांच्या भूमिकेबाबत दबक्या आवाजात ऊलटसुलट चर्चा सुरुच आहे.

उमेदवारी जाहीर होताच भूमिका स्पष्टहातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती व इंडिया आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षांकडून अद्याप उमेदवार निश्चित नाहीत. उमेदवारीच्या निर्णयाचा अंदाज घेण्याचे काम सध्या जयंत पाटील यांच्याकडून सुरू आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील