शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुलांमध्ये नाशिक, मुलींत कोल्हापूरला विजेतेपद--राज्य शालेय खो-खो स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:27 IST

नाशिक विरूध्द कोल्हापूर असा मुलांचा अंतिम सामना पार पडला. नाशिकने एक गुण दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत कोल्हापूरला पराभूत केले. कोल्हापूर विरूध्द पुणे असा मुलींचा अंतिम सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरने दोन गुणांनी पुण्याचा धुव्वा उडवत विजय मिळवला.

ठळक मुद्देया अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरने दोन गुणांनी पुण्याचा धुव्वा उडवत विजय मिळवला.

हरिपूर : राज्यस्तरीय शालेय १९ वर्षाखालील खो-खो स्पर्धेत नाशिक व कोल्हापूर विभागाने चपळ खेळ करत सांगलीकरांची वाहवा मिळवली. अंतिम सामन्यात मुलांमध्ये नाशिकने कोल्हापूरचा, तर मुलींमध्ये कोल्हापूरने पुणे विभागाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

नाशिक विरूध्द कोल्हापूर असा मुलांचा अंतिम सामना पार पडला. नाशिकने एक गुण दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत कोल्हापूरला पराभूत केले. कोल्हापूर विरूध्द पुणे असा मुलींचा अंतिम सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरने दोन गुणांनी पुण्याचा धुव्वा उडवत विजय मिळवला.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली हायस्कूल व विनोद भाटे ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. चंद्रशेखर साखरे व वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्याहस्ते झाले.बक्षीस वितरण महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष माणिक पाटील, के्रडाईचे माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. समीर शेख यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक महावीर सौंदते होते. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी स्वागत केले. शासकीय खो-खो मार्गदर्शक प्रशांत पवार व सचिन नवले यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सिध्दी एज्युकेशन सेंटरचे सुभाष मोहिते, मुसा तांबोळी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, मानसिंग शिंदे, बाबगोंडा पाटील, निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्यम जाधव, राजेंद्र साप्ते, पी. आर. कांबळे, व्ही. बी. पाटील, एस. बी. चोपडे, एस. पी. कुंभार, आर. व्ही. एकल, जे. एन. दरूरे आदी उपस्थित होते.स्पर्धेचा अंतिम निकाल असामुले : प्रथम : नाशिक : (माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण, ता. सुरगाणा),

द्वितीय : कोल्हापूर : (सांगली हायस्कूल, सांगली), तृतीय : पुणे (संभाजीराजे विद्यालय, नातेगाव)मुली : प्रथम : कोल्हापूर : (हुतात्मा किसन अहीर विद्यालय, वाळवा), द्वितीय : पुणे : (नरसिंह विद्यालय, रांजणी), तृतीय : मुंबई (एसएसटी विद्यालय, मुंबई)

वैयक्तिक बक्षिसे : मुले : उत्कृष्ट संरक्षक : जयदीप देसाई (कोल्हापूर),उत्कृष्ट आक्रमक : वनराज जाधव (नाशिक)उत्कृष्ट अष्टपैलू : दिलीप खांडवी (नाशिक)वैयक्तिक बक्षिसे :मुली : उत्कृष्ट संरक्षक : ऋतुजा भोर,उत्कृष्ट आक्रमक : अश्विनी पारशेउत्कृष्ट अष्टपैलू : वितीका मगदूम

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूर