शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

आम्हाला किती जागा द्यायच्या नरेंद्र मोदी, अमित शहा ठरवतील - राजेश क्षीरसागर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:15 IST

शिल्लक शिवसेनेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही

सांगली : कोणाच्या काहीतरी बोलण्याने शिवसेनेच्या जागा कमी होणार नाहीत. आमच्या जागांचा फैसला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती आहे, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, शिवसेना व भाजपमध्ये आता कोणताही वाद नाही. राज्यात कोणीतरी काहीतरी बोलत असते. त्यामुळे कोणाच्या मतावर विधानसभेचे जागावाटप होणार नाही. मोदी व शहा हेच जागावाटपाचे सूत्र ठरवतील.सध्या शिवसेना व भाजपमध्ये चांगला समन्वय आहे. पूर्वीच्या युतीत हा समन्वय कधीच दिसला नव्हता. त्यामुळे आता गतीने कामे होत आहेत. लाेकाभिमुख निर्णय हाेत आहेत. लाेकांनाही सरकार आपले वाटत आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघातील पक्षबांधणीची जबाबदारी माझ्याकडे आहे. या ठिकाणी पक्षाचे काम चांगले आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमची शिवसेना ताकदीने उतरेल.

काही संस्थांवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, यासाठी प्रयत्न राहील. जिल्हा नियोजन समितीमध्ये रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय होईल. निधी वाटपात आम्ही कधीही राजकारण करणार नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसवाल्यांना पैसा व पद महत्त्वाचे वाटते. त्यामुळे सतत ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत असतात. नियोजन समितीच्या निधी वाटपात राजकारण होत असल्याची त्यांची टीका अयोग्य आहे.पूर्वीचे संपर्कप्रमुख कळलावेयापूर्वीच्या शिवसेनेत कुणीतरी बाहेरचा संपर्कप्रमुख यायचा व नुसती भांडणे लावायचा. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी हा कार्यक्रम केला, अशी टीका करीत क्षीरसागर यांनी नितीन बानुगडे-पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.विमानतळासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणारकवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ उभारण्याच्या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.सीमा प्रश्न लवकरच सुटणारमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीच्या बैठका होत आहेत. मी त्या समितीत आहे. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घातल्याने लवकरच प्रश्न सुटेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.ती तर शिल्लक शिवसेनासंजय राऊत यांनी ठाकरेंकडील शिवसेना संपवली आहे. आता शिल्लक शिवसेनेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही, असे क्षीरसागर म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर