शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

आम्हाला किती जागा द्यायच्या नरेंद्र मोदी, अमित शहा ठरवतील - राजेश क्षीरसागर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:15 IST

शिल्लक शिवसेनेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही

सांगली : कोणाच्या काहीतरी बोलण्याने शिवसेनेच्या जागा कमी होणार नाहीत. आमच्या जागांचा फैसला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती आहे, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, शिवसेना व भाजपमध्ये आता कोणताही वाद नाही. राज्यात कोणीतरी काहीतरी बोलत असते. त्यामुळे कोणाच्या मतावर विधानसभेचे जागावाटप होणार नाही. मोदी व शहा हेच जागावाटपाचे सूत्र ठरवतील.सध्या शिवसेना व भाजपमध्ये चांगला समन्वय आहे. पूर्वीच्या युतीत हा समन्वय कधीच दिसला नव्हता. त्यामुळे आता गतीने कामे होत आहेत. लाेकाभिमुख निर्णय हाेत आहेत. लाेकांनाही सरकार आपले वाटत आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघातील पक्षबांधणीची जबाबदारी माझ्याकडे आहे. या ठिकाणी पक्षाचे काम चांगले आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमची शिवसेना ताकदीने उतरेल.

काही संस्थांवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, यासाठी प्रयत्न राहील. जिल्हा नियोजन समितीमध्ये रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय होईल. निधी वाटपात आम्ही कधीही राजकारण करणार नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसवाल्यांना पैसा व पद महत्त्वाचे वाटते. त्यामुळे सतत ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत असतात. नियोजन समितीच्या निधी वाटपात राजकारण होत असल्याची त्यांची टीका अयोग्य आहे.पूर्वीचे संपर्कप्रमुख कळलावेयापूर्वीच्या शिवसेनेत कुणीतरी बाहेरचा संपर्कप्रमुख यायचा व नुसती भांडणे लावायचा. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी हा कार्यक्रम केला, अशी टीका करीत क्षीरसागर यांनी नितीन बानुगडे-पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.विमानतळासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणारकवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ उभारण्याच्या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.सीमा प्रश्न लवकरच सुटणारमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीच्या बैठका होत आहेत. मी त्या समितीत आहे. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घातल्याने लवकरच प्रश्न सुटेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.ती तर शिल्लक शिवसेनासंजय राऊत यांनी ठाकरेंकडील शिवसेना संपवली आहे. आता शिल्लक शिवसेनेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही, असे क्षीरसागर म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर