शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सांगलीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचाच मर्डर... : पोलिसाचा खून करून आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:16 IST

सचिन लाड ।सांगली : वारणानगर येथे नऊ कोटींच्या रकमेवर पोलिसांचा डल्ला, लूटमारीतील संशयित अनिकेत कोथळे याची पोलीस कोठडीत हत्या अशा अर्धा डझनवर घटनांनी जिल्हा पोलीस दलाची पुरती बेअब्रू झाली. अशा घटनांमधून सावरून पोलीस दल उभारी घेत असतानाच, मंगळवारी रात्री सांगलीत हॉटेलमध्ये एका पोलिसाचाच धारदार शस्त्राने १८ वार करून खून केल्याने ...

ठळक मुद्देपोलीस दल हादरले -गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहिमेची गरज

सचिन लाड ।सांगली : वारणानगर येथे नऊ कोटींच्या रकमेवर पोलिसांचा डल्ला, लूटमारीतील संशयित अनिकेत कोथळे याची पोलीस कोठडीत हत्या अशा अर्धा डझनवर घटनांनी जिल्हा पोलीस दलाची पुरती बेअब्रू झाली. अशा घटनांमधून सावरून पोलीस दल उभारी घेत असतानाच, मंगळवारी रात्री सांगलीत हॉटेलमध्ये एका पोलिसाचाच धारदार शस्त्राने १८ वार करून खून केल्याने संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे. समाजाच्या रक्षणकर्त्याचीच हत्या करून हल्लेखोरांनी कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.खाकी वर्दीतील पोलीस रस्त्यावरून चालत निघाला तरी लोक घाबरत. गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेतील पोलीस आणि स्थानिक शाखेतील पोलिसांचा समाजात आदरयुक्त दरारा होता. पण काळ बदलला. पोलीस दलाचे अत्याधुनिकीकरण झाले. पोलिसांच्या कामाच्या पध्दतीत आमूलाग्र बदल झाले. कामाचे तास वाढले. पोलीस दलातही गुन्हेगारी फोफावली. त्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत गेला. अजूनही काही चांगले कर्तबगार वरिष्ठ अधिकारी व जुन्या कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाचा दरारा टिकून आहे.मिरज शहर पोलीस ठाण्यातील समाधान मांटे यांचा मंगळवारी रात्री सांगलीतील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये धारदार हत्याराने १८ वार करून अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आला. मांटे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला व त्यांचा तडफडून झालेला मृत्यू हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेºयात कैद झाला आहे. हॉटेल व्यवस्थापकासह कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला. मात्र एकानेही हल्लेखोरास रोखण्याचे धाडस दाखविले नाही. हे सर्वजण मदतीसाठी धावले असते, तर मांटे यांचा जीव गेला नसता. हल्लेखोरांनी मांटे यांच्या अंगावर वर्दी असताना त्यांना मारून टाकले, तर मग सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बिनधास्त हल्ला : हत्यार सोबतचहल्लेखोराने मांटे यांच्यावर बिनधास्त हल्ला केला. संशयिताकडे गाडीत हत्यार होते. त्याने अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे दिसते. महापालिका निवडणुकीमुळे पोलीस शहरात २४ तास रस्त्यावर आहेत. मोठी वाहने तपासली जात आहेत, पण शहरात सायंकाळनंतर तरुणांची टोळकी दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून हुल्लडबाजी करतात. वेडीवाकडी वाहने चालवितात. जाब विचारला तर कमरेला लावलेले हत्यार काढतात. या घटनेमुळे आता सरसकट वाहने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुणांकडील हत्यारांचा शोध घेण्याची गरज आहे.हॉटेल, ढाबे सुरूचमहापालिका आचारसंहितेमुळे पोलिसांनी रात्री साडेदहानंतर हॉटेल, ढाबे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक हॉटेल मालकांचे पोलीस अधिकाºयांशी लागेबांधे असल्यामुळे रात्री साडेदहानंतर बाहेरून हॉटेल बंद करून मागून मध्यरात्रीपर्यंत ते सुरूच असते. हॉटेल रत्ना डिलक्समध्ये पोलिसाचा खून रात्री पावणेबाराला झाला. यावरून हे हॉटेल एवढ्या रात्रीपर्यंत कसे सुरू होते, संजयनगर पोलिसांना याची माहिती नसावी का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.रात्रीची गस्त हवीचशहरात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई सातत्याने होणे गरजेचे आहे. निवडणुका किंवा सणावेळी औपचारिकता म्हणून कारवाई करण्याची पद्धत बंद झाली, तरच अशा विचित्र मानसिकतेच्या तळीरामांना आळा बसू शकतो. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी अशा कारवाईत सातत्य ठेवल्यामुळे त्याचा परिणाम अपघातांचे प्रमाण कमी होण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा बसण्यावरही झाला होता. त्यादृष्टीने तयारी करायला हवी.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस