शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सांगलीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचाच मर्डर... : पोलिसाचा खून करून आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:16 IST

सचिन लाड ।सांगली : वारणानगर येथे नऊ कोटींच्या रकमेवर पोलिसांचा डल्ला, लूटमारीतील संशयित अनिकेत कोथळे याची पोलीस कोठडीत हत्या अशा अर्धा डझनवर घटनांनी जिल्हा पोलीस दलाची पुरती बेअब्रू झाली. अशा घटनांमधून सावरून पोलीस दल उभारी घेत असतानाच, मंगळवारी रात्री सांगलीत हॉटेलमध्ये एका पोलिसाचाच धारदार शस्त्राने १८ वार करून खून केल्याने ...

ठळक मुद्देपोलीस दल हादरले -गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहिमेची गरज

सचिन लाड ।सांगली : वारणानगर येथे नऊ कोटींच्या रकमेवर पोलिसांचा डल्ला, लूटमारीतील संशयित अनिकेत कोथळे याची पोलीस कोठडीत हत्या अशा अर्धा डझनवर घटनांनी जिल्हा पोलीस दलाची पुरती बेअब्रू झाली. अशा घटनांमधून सावरून पोलीस दल उभारी घेत असतानाच, मंगळवारी रात्री सांगलीत हॉटेलमध्ये एका पोलिसाचाच धारदार शस्त्राने १८ वार करून खून केल्याने संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे. समाजाच्या रक्षणकर्त्याचीच हत्या करून हल्लेखोरांनी कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.खाकी वर्दीतील पोलीस रस्त्यावरून चालत निघाला तरी लोक घाबरत. गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेतील पोलीस आणि स्थानिक शाखेतील पोलिसांचा समाजात आदरयुक्त दरारा होता. पण काळ बदलला. पोलीस दलाचे अत्याधुनिकीकरण झाले. पोलिसांच्या कामाच्या पध्दतीत आमूलाग्र बदल झाले. कामाचे तास वाढले. पोलीस दलातही गुन्हेगारी फोफावली. त्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत गेला. अजूनही काही चांगले कर्तबगार वरिष्ठ अधिकारी व जुन्या कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाचा दरारा टिकून आहे.मिरज शहर पोलीस ठाण्यातील समाधान मांटे यांचा मंगळवारी रात्री सांगलीतील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये धारदार हत्याराने १८ वार करून अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आला. मांटे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला व त्यांचा तडफडून झालेला मृत्यू हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेºयात कैद झाला आहे. हॉटेल व्यवस्थापकासह कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला. मात्र एकानेही हल्लेखोरास रोखण्याचे धाडस दाखविले नाही. हे सर्वजण मदतीसाठी धावले असते, तर मांटे यांचा जीव गेला नसता. हल्लेखोरांनी मांटे यांच्या अंगावर वर्दी असताना त्यांना मारून टाकले, तर मग सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बिनधास्त हल्ला : हत्यार सोबतचहल्लेखोराने मांटे यांच्यावर बिनधास्त हल्ला केला. संशयिताकडे गाडीत हत्यार होते. त्याने अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे दिसते. महापालिका निवडणुकीमुळे पोलीस शहरात २४ तास रस्त्यावर आहेत. मोठी वाहने तपासली जात आहेत, पण शहरात सायंकाळनंतर तरुणांची टोळकी दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून हुल्लडबाजी करतात. वेडीवाकडी वाहने चालवितात. जाब विचारला तर कमरेला लावलेले हत्यार काढतात. या घटनेमुळे आता सरसकट वाहने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुणांकडील हत्यारांचा शोध घेण्याची गरज आहे.हॉटेल, ढाबे सुरूचमहापालिका आचारसंहितेमुळे पोलिसांनी रात्री साडेदहानंतर हॉटेल, ढाबे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक हॉटेल मालकांचे पोलीस अधिकाºयांशी लागेबांधे असल्यामुळे रात्री साडेदहानंतर बाहेरून हॉटेल बंद करून मागून मध्यरात्रीपर्यंत ते सुरूच असते. हॉटेल रत्ना डिलक्समध्ये पोलिसाचा खून रात्री पावणेबाराला झाला. यावरून हे हॉटेल एवढ्या रात्रीपर्यंत कसे सुरू होते, संजयनगर पोलिसांना याची माहिती नसावी का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.रात्रीची गस्त हवीचशहरात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई सातत्याने होणे गरजेचे आहे. निवडणुका किंवा सणावेळी औपचारिकता म्हणून कारवाई करण्याची पद्धत बंद झाली, तरच अशा विचित्र मानसिकतेच्या तळीरामांना आळा बसू शकतो. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी अशा कारवाईत सातत्य ठेवल्यामुळे त्याचा परिणाम अपघातांचे प्रमाण कमी होण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा बसण्यावरही झाला होता. त्यादृष्टीने तयारी करायला हवी.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस