शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Sangli: महसूलच्या चूक अन् जातीच्या चटक्यातच जगणे; कासेगावातील २०० हून अधिक कुटुंबांची फरपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:25 IST

इस्लामपूर : महसूल विभागाच्या एका चुकीमुळे पिढ्यान् पिढ्यापासून राहणाऱ्या कासेगाव (ता. वाळवा) येथील २०० हून अधिक कुटुंबांच्या भाळी अतिक्रमणाच्या ...

इस्लामपूर : महसूल विभागाच्या एका चुकीमुळे पिढ्यान् पिढ्यापासून राहणाऱ्या कासेगाव (ता. वाळवा) येथील २०० हून अधिक कुटुंबांच्या भाळी अतिक्रमणाच्या नावाचा शिक्का पडला. तर दुसऱ्या बाजूला अद्याप जाती व्यवस्थेची उतरंड मानणाऱ्या आजी-माजी राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे या भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे राज्यात आजही जाती व्यवस्था कायम असल्याची लाज वाटते, अशा शब्दात डॉ. भारत पाटणकर यांनी संताप व्यक्त केला.कासेगाव (ता. वाळवा) येथील गेल्या ४० वर्षांपासून ऐरणीवर आलेल्या मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे प्रलंबित राहिलेल्या मागासवर्गीय समाजातील अतिक्रमित ठरलेल्या घरांच्या जागा त्या-त्या कुटुंबांच्या नावावर करून देण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने या भूमिपुत्रांना घेऊन येथील पंचायत समितीच्या आवारात बेमुदत आंदोलनाला सोमवारी सुरुवात करण्यात आली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच होते.पत्रकारांशी बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, १९३६ पासून ही कुटुंबे तेथे राहत आहेत. १९७३ साली झालेल्या मोजणीवेळी ही बाब या विभागाच्या लक्षात न आल्याने या जागेवर अतिक्रमण अशी नोंद झाली. शासनाकडून झालेल्या या चुकीची सजा आज ही कुटुंबे भोगत आहेत. शासन आपली चूक मान्य करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळेच या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मागे हटणार नाही.

न्याय देण्यास विलंब १९७४-७५ मध्ये भूखंडांचे वाटप झाल्याचे पुरावे आहेत. १९७७ साली या ठिकाणी शासनाकडून घर बांधणी अनुदानही दिले आहे. ही प्रक्रिया कायदेशीरपणे झाली आहे. तरीसुद्धा भूमिपुत्रांना न्याय देण्यास विलंब होत आहे.

नोंदीचा आधार घ्यावा१९७३च्या मोजणीवेळी झालेल्या नोंदी आधार धराव्यात. १९८३ नंतर जी अतिक्रमणे झाली त्यांच्यासाठी ग्रामपंचायत नोंदीचा आधार घ्यावा. त्याआधारे मूळ खातेदारांच्या वारसांमध्ये क्षेत्र विभागून ५०० चौरस फुटांचा निकष लावून नियमितीकरण करून द्यावे.कासेगावचा प्रश्न प्रलंबित कासेगावच्या या जटिल प्रश्नावर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. नितीन करीर यांनी ही जागा गायरानाची नसून ती भूमिहीन व बेघरांसाठी असल्याचे स्पष्ट करत तेथील भूखंडांचे संबंधित कुटुंबांना मोफत वाटप करावे, अशी टिप्पणी केली होती. राज्याचे मुख्य सचिव म्हणून डॉ. करीर निवृत्त झाले. मात्र, कासेगावचा हा प्रश्न प्रलंंबित असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलन