कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावात ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:42+5:302021-03-05T04:25:42+5:30
विहिरी, बंधारे, कूपनलिका, ओढे, नाले, तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्याचा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. ...

कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावात ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा
विहिरी, बंधारे, कूपनलिका, ओढे, नाले, तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्याचा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. यावर्षी खरीप पिके व द्राक्ष पिकाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. मुबलक पाण्यामुळे खरीप हंगाम व द्राक्षाचा हंगाम व्यवस्थित पार पडला. शेती व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघाला. वरुणराजाच्या कृपेने सध्या तलावातील पाणीसाठा अद्याप टिकून आहे. आता उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. साधारणपणे हा तीन महिन्यांचा कालावधी असतो. तोपर्यंत शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
तालुक्यातील दहा लघु व मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे...
(पाणीसाठा द.ल.घ.फू.मध्ये) : कुची (५३.१४), रायवाडी (७३.२४), लांडगेवाडी (५.८७), लंगरपेठ (५२.४४), नांगोळे (१८.९६) बोरगाव (१८.४७), हरोली (११.२२), दुधेभावी (१११.४०), घोरपडी (४३.२४), बंडगरवाडी (३३.२४), बसाप्पाचीवाडी (२३६.६४).