शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

गायरान जमिनीच्या वादातून पारधी कुटुंबावर जमावाकडून हल्ला, झोपडीसह दुचाकी पेटविल्या; सांगलीतील नरवाड येथे घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:31 IST

याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी माजी सरपंचासह १५ जणांविरुद्ध दंगल, मारामारी व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली आहे.

मिरज : नरवाड (ता. मिरज) येथे गायरान जमिनीवर कब्जाच्या वादातून पारधी कुटुंबावर गुरुवारी रात्री जमावाने हल्ला करून झोपडीसह दोन दुचाकी पेटविल्या. जमावाच्या हल्ल्यात शिवाप्पा सुभाष पवार यांच्यासह दोन महिला जखमी झाल्या. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी माजी सरपंचासह १५ जणांविरुद्ध दंगल, मारामारी व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली आहे.नरवाड येथील लक्ष्मीवाडी रस्त्यावरील एका गायरान जमिनीवर शिवाप्पा पवार व नागेश पवार यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबाकडे सुमारे ३५ एकर गायरान जमीन आहे. याच जमिनीवरून शिवाप्पा पवार व शेजारी राहणारे उत्तम पाटील यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. उत्तम पाटील याने गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार नागेश पवार याने केल्याने गुरुवारी हा वाद विकोपाला गेला.

उत्तम पाटील व साथीदारांनी पवार कुटुंबावर हल्ला केला. यावेळी शिवाप्पा पवार यांच्यासह महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने झोपडी व दोन दुचाकी पेटवून देत एका घराची मोडतोड केली. याबाबत माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.जखमी शिवाप्पा पवार यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंच भारत दशरथ कुर्ले, केदार मारुती शिंदे व उत्तम आण्णासाहेब पाटील (रा. नरवाड) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी न्यायलयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सप्रेम दिलीप कुर्ले, रामा आवटे, सुशील माने, विकी संपकाळ, महेश डुबल यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्व फरार आहेत. फरारींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस