शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Sangli News: जयंत पाटलांची सहकारातून एक्झिट; 'राजारामबापू'ची निवडणूक बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:52 IST

जयंतरावांच्या सहकार क्षेत्रातील एक्झिटमुळे एकच खळबळ

युनूस शेखइस्लामपूर : राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर आणि नावलौकिक असणाऱ्या येथील राजारामबापू साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध झाली. मात्र नव्या पिढीकडे सत्तेची सूत्रे सोपवताना सहकारातील प्रगाढ ज्ञान प्राप्त केलेल्या माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी तब्बल ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आणि आज तो अंमलातही आणल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. जयंतरावांच्या सहकार क्षेत्रातील एक्झिटमुळे एकच खळबळ उडाली.उपाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह प्रदीपकुमार पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पवार, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, दादासाहेब मोरे आणि मेघा मधुकर पाटील या आठ जुन्या संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर नव्या चेहऱ्यात युवा नेते प्रतिक पाटील, दीपक पाटील, शैलेश पाटील, अतुल पाटील, अमरसिंह साळुंखे, बबन थोटे, रघुनाथ जाधव, योजना सचिन पाटील, आप्पासाहेब हाके, हणमंत माळी आणि राजकुमार कांबळे यांचा समावेश आहे.सहकार क्षेत्रातील एका कारखान्याच्या चार शाखा काढत देशाच्या पातळीवर विक्रम नोंदविण्याची कामगिरी राजारामबापू कारखान्याने केली आहे. याचे सर्व श्रेय जयंत पाटील यांना जाते. बापूंच्या निधनानंतर १९८४ साली वाळवा तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात आलेल्या जयंत पाटील यांनी आपली सुरुवात सहकारातून केली. त्यावेळची पाण्याची परिस्थिती पाहून आणि बापूंनी त्यांच्या कारकिर्दीत घेऊन ठेवलेले पाणी परवाने वापरात आणण्यासाठी पदयात्रा काढत जयंतरावांनी अवघ्या समाजमनावर आपल्या प्रतिमेचे गारूड उभा करण्यात यश मिळविले. त्यानंतर थेट कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यावर तेव्हापासून अत्याधुनिकीकरणाकडे सुरू झालेला राजारामबापू कारखान्याचा प्रवास आजही अखंडपणे टिकून आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प, अर्कशाला, असिटोन निर्मिती त्यानंतर आता इथेनॉल असा उपपदार्थ निर्मितीच्या संकल्पनाही खुद्द जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेल्या.आता कारखान्याच्या सत्तेची सूत्रे नव्या आणि तिसऱ्या पिढीतील युवा नेते प्रतिक पाटील यांच्याकडे सोपविली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांना त्यांची कामगिरी उत्कृष्टपणे करताना निर्णय प्रक्रियेतही खुलेपणा रहावा असा विचार करून जयंत पाटील यांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच नव्या रक्ताला वाव देण्यासाठी मी स्वतः थांबणार आहे असे सांगत अनेक सहकाऱ्यांना अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्यातच थांबवले होते. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी जयंत पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेत सर्वांनाच धक्का दिला.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखाने