शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

मिरज तालुक्याचे विभाजन रखडले

By admin | Updated: January 3, 2015 00:14 IST

राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष : स्वतंत्र सांगली तालुक्याच्या मागणीला महसूलमंत्र्यांचा ठेंगा

मिरज : मिरज व पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना महसुली कामासाठी मिरजेला येणे गैरसोयीचे असल्याने मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी आहे. सांगली तालुक्याच्या रखडलेल्या प्रस्तावाबाबत नवीन महसूलमंत्र्यांनीही ठोस भूमिका न घेता तालुका विभाजनाच्या मागणीबाबत तोंडाला पाने पुसली आहेत.प्रशासकीय सोयीसाठी बहुसंख्य ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणीच तालुका प्रशासन आहे. मात्र सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण मिरज तालुक्यात आहे. ७२ गावे आणि ६ लाख ०५ हजार लोकसंख्या असलेल्या मिरज तालुक्यात मिरज, सांगली व इस्लामपूर हे असे अडीच विधानसभा मतदारसंघ येतात. नदीकाठचा पश्चिम भाग व कर्नाटक सीमेवरील पूर्व भागापर्यंत मिरज तालुक्याची हद्द आहे. महसुली कामे व शासकीय, शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले दाखले मिळविण्यासाठी पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना मिरजेला यावे लागते.केवळ सांगली शहरातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. स्वतंत्र सांगली तालुका झाल्यास पश्चिम भागातील ग्रामस्थांची सोय सांगलीत होऊन, मिरजेतील प्रशासकीय ताण कमी होणार आहे. मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्यासाठी तहसीलदारांसह अन्य अधिकारी, कर्मचारी व इमारत, वाहनांसाठी सुमारे दोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. विजयनगर येथे नवीन प्रशासकीय इमारतीत जागा मिळाल्यास तालुका कार्यालय लगेच सुरू करता येणे शक्य असल्याचे, प्रशासनाने चार वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.मिरज तालुक्यात आठ मंडल विभाग असून त्यापैकी मिरज, आरग, मालगाव, कवलापूर हे मिरज तालुक्यात व सांगली, कसबे डिग्रज, बुधगाव, कवलापूर हे मंडल विभाग सांगली तालुक्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. मिरज पश्चिम भागात पूरस्थिती उद्भवते, तर पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीबाबत प्रशासनाला उपाययोजना करावी लागते. दरम्यान, गेल्या दहा वर्षात अनेकवेळा सांगली आणि मिरज असे दोन तालुके करण्याची मागणी होऊनही राजकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.मिरज तालुक्यातील गावेमिरज, बामणी, निलजी, वड्डी, ढवळी, म्हैसाळ, विजयनगर, नरवाड, आरग, बेडग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, मालगाव, शिपूर, डोंगरवाडी, एरंडोली, व्यंकोचीवाडी, खंडेराजुरी, पायाप्पाचीवाडी, बेळंकी, संतोषवाडी, कदमवाडी, सलगरे, चाबुकस्वारवाडी, टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, जानराववाडी, कवलापूर, रसूलवाडी, खरकटवाडी, सांबरवाडी, काकडवाडी, सावळी, कानडवाडी, मानमोडी, तानंग, कळंबी, सिध्देवाडी, सोनी, करोली (एम), भोसे, पाटगाव.सांगलीतील प्रस्तावित गावेसांगली, अंकली, सांगलीवाडी, हरिपूर, कसबे डिग्रज, समडोळी, मौजे डिग्रज, तुंग, दुधगाव, सावळवाडी, मोळा, कुंभोज, माळवाडी, कवठेपिरान, शेरीकवठे, बुधगाव, कुपवाड, वानलेसवाडी, बामणोली, कर्नाळ, पद्माळे, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी, माधवनगर.नवीन सरकारकडून तर निर्णय होणार का?आ. सुरेश खाडे यांनी याबाबत गतवर्षी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे उत्तर दिले होते. त्यानंतर आता सत्ताबदलानंतर सांगली, मिरजेच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी महसूलमंत्र्यांकडे स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी केल्यानंतर, त्यांनीही स्वतंत्र तालुक्याची मागणी शासनाच्या विचाराधिन असल्याचे सांगून तालुका निर्मितीबाबत ठोस निर्णय दिलेला नाही. सत्ताबदलानंतरही स्वतंत्र सांगली तालुक्याबाबत निर्णय होण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.