शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:52 IST

शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे  

सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सांगलीत गुरुवारी तू-तू-मैं-मैंचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी बसून नाही, उभं राहूनच चर्चा होणार, अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांनी शांततेत बोला, असा दमदेखील आंदोलकांना भरला. गुरुवारी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडल्यामुळे आंदोलकही आक्रमक झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्कप्रमुख शरद पवार गव्हाण, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी भेटीवरून संघटना प्रतिनिधी आणि पालकमंत्री पाटील यांच्यात वादावादीचे प्रकार घडले.आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बसून चर्चा करण्याची विनंती केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी आत बसून नाही, इथं उभं राहूनच बोलणार, अशी दादागिरी चालणार नाही, असे सुनावले. उभं राहून बोला, मी थांबलो आहे ना येथे. पळून चाललो आहे का? असा सवालही त्यांनी आंदोलकांना केला.

शेतकऱ्यांचे अश्रू कधी दिसणार? : दिगंबर कांबळेशेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी टाहो फोडून सांगत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निषेध नोंदविला आहे. इतकं असूनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील फक्त पाच लोकांचा विरोध आहे, असे म्हणत आहेत. बाकी लोकांचे समर्थन आहे, असा दावा करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू का दिसत नाहीत? हा बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.

टॅग्स :SangliसांगलीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गchandrakant patilचंद्रकांत पाटीलagitationआंदोलनFarmerशेतकरी