शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:52 IST

शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे  

सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सांगलीत गुरुवारी तू-तू-मैं-मैंचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी बसून नाही, उभं राहूनच चर्चा होणार, अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांनी शांततेत बोला, असा दमदेखील आंदोलकांना भरला. गुरुवारी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडल्यामुळे आंदोलकही आक्रमक झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्कप्रमुख शरद पवार गव्हाण, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी भेटीवरून संघटना प्रतिनिधी आणि पालकमंत्री पाटील यांच्यात वादावादीचे प्रकार घडले.आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बसून चर्चा करण्याची विनंती केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी आत बसून नाही, इथं उभं राहूनच बोलणार, अशी दादागिरी चालणार नाही, असे सुनावले. उभं राहून बोला, मी थांबलो आहे ना येथे. पळून चाललो आहे का? असा सवालही त्यांनी आंदोलकांना केला.

शेतकऱ्यांचे अश्रू कधी दिसणार? : दिगंबर कांबळेशेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी टाहो फोडून सांगत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निषेध नोंदविला आहे. इतकं असूनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील फक्त पाच लोकांचा विरोध आहे, असे म्हणत आहेत. बाकी लोकांचे समर्थन आहे, असा दावा करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू का दिसत नाहीत? हा बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.

टॅग्स :SangliसांगलीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गchandrakant patilचंद्रकांत पाटीलagitationआंदोलनFarmerशेतकरी