शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
4
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
5
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
7
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
8
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
9
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
10
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
11
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
12
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
13
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
14
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
15
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
16
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
17
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
18
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
19
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
20
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:28 IST

दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र जनावरे जगविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही तरुणांनी रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे गाठले आहे.

ठळक मुद्देदुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतरशेतकऱ्यांवर मजुरीला जाण्याची वेळ

अशोक डोंबाळे सांगली : दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र जनावरे जगविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही तरुणांनी रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे गाठले आहे.जिल्ह्यात मोठे पाच आणि छोटे ७९ असे ८४ पाझर तलाव आहेत. त्यामध्ये ९४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असून, सध्या १५११.७० दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मेअखेर शिल्लक पाणी पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यातील ४५० गावांवर दुष्काळाचे सावट असून, १८७ गावे आणि १०८८ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई आहे. या गावांतील सुमारे चार लाखांहून अधिक लोकसंख्येला १८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जत, आटपाडी या तालुक्यांतील पूर्व भागामध्ये पाणी टंचाई भीषण असून, येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्वच ठिकाणी दोन ते तीन दिवसांतून एकदा टँकर येत आहे.

काही गावांत टँकरच्या पाण्यामध्ये गैरकारभार होत असल्याच्या तक्रारी आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि मिरज पूर्व, कडेगाव तालुक्यातील ४५० गावांमधील शेतकऱ्यांच्या पदरात सलग दोन खरीप आणि रब्बी हंगाम पडले नाहीत. पेरणीनंतर कोवळी पिकेच वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मजुरीला जाण्याची वेळ आली आहे.दरवर्षी दुष्काळी तालुक्यांतून सव्वालाख मजूर मिरज, वाळवा, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर, सातारा जिल्हे आणि कर्नाटक सीमाभागामध्ये ऊस तोडणीसाठी जातात. यावर्षी गावाकडील दुष्काळाचे भीषण वास्तव पाहून जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊसतोडीसाठी गेलेल्या मजुरांपैकी ४५ ते ५० हजार मजूर पुन्हा गावाकडे फिरकलेच नाहीत.

जत तालुक्यातून सर्वाधिक ५० ते ६० हजार मजुरांचे स्थलांतर होते. यापैकी ५० टक्के मजूर गावाकडे न जाता नदीकाठावर वीटभट्टी, शेतीच्या मजुरीसाठी मिरज, वाळवा, पलूस तालुक्यात थांबले असल्याचे ऊस तोडणी मुकादम दाजी माने यांनी सांगितले.

जत तालुक्यातील पांढरेवाडी, मोटेवाडी, कुलाळवाडी, आसंगी तुर्क, लकडेवाडी, कागनरी, लमाणतांडा (दरीबडची), लमाणतांडा (उटगी), निगडी बुद्रुक, करेवाडी (तिकोंडी), कारंडेवाडी, टोणेवाडी, मायथळ, पांडोझरी पारधी वस्ती ही गावे ओस पडली आहेत.गावात फक्त वयोवृद्धच वास्तव्यास असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. आटपाडी तालुक्यातील करगणी, गोमेवाडी, दिघंची, लिंगीवरे, खरसुंडी, बनपुरी परिसरातील काही तरुणांनी पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर शहराकडे रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगली