शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

दुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:28 IST

दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र जनावरे जगविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही तरुणांनी रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे गाठले आहे.

ठळक मुद्देदुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतरशेतकऱ्यांवर मजुरीला जाण्याची वेळ

अशोक डोंबाळे सांगली : दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र जनावरे जगविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही तरुणांनी रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे गाठले आहे.जिल्ह्यात मोठे पाच आणि छोटे ७९ असे ८४ पाझर तलाव आहेत. त्यामध्ये ९४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असून, सध्या १५११.७० दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मेअखेर शिल्लक पाणी पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यातील ४५० गावांवर दुष्काळाचे सावट असून, १८७ गावे आणि १०८८ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई आहे. या गावांतील सुमारे चार लाखांहून अधिक लोकसंख्येला १८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जत, आटपाडी या तालुक्यांतील पूर्व भागामध्ये पाणी टंचाई भीषण असून, येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्वच ठिकाणी दोन ते तीन दिवसांतून एकदा टँकर येत आहे.

काही गावांत टँकरच्या पाण्यामध्ये गैरकारभार होत असल्याच्या तक्रारी आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि मिरज पूर्व, कडेगाव तालुक्यातील ४५० गावांमधील शेतकऱ्यांच्या पदरात सलग दोन खरीप आणि रब्बी हंगाम पडले नाहीत. पेरणीनंतर कोवळी पिकेच वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मजुरीला जाण्याची वेळ आली आहे.दरवर्षी दुष्काळी तालुक्यांतून सव्वालाख मजूर मिरज, वाळवा, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर, सातारा जिल्हे आणि कर्नाटक सीमाभागामध्ये ऊस तोडणीसाठी जातात. यावर्षी गावाकडील दुष्काळाचे भीषण वास्तव पाहून जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊसतोडीसाठी गेलेल्या मजुरांपैकी ४५ ते ५० हजार मजूर पुन्हा गावाकडे फिरकलेच नाहीत.

जत तालुक्यातून सर्वाधिक ५० ते ६० हजार मजुरांचे स्थलांतर होते. यापैकी ५० टक्के मजूर गावाकडे न जाता नदीकाठावर वीटभट्टी, शेतीच्या मजुरीसाठी मिरज, वाळवा, पलूस तालुक्यात थांबले असल्याचे ऊस तोडणी मुकादम दाजी माने यांनी सांगितले.

जत तालुक्यातील पांढरेवाडी, मोटेवाडी, कुलाळवाडी, आसंगी तुर्क, लकडेवाडी, कागनरी, लमाणतांडा (दरीबडची), लमाणतांडा (उटगी), निगडी बुद्रुक, करेवाडी (तिकोंडी), कारंडेवाडी, टोणेवाडी, मायथळ, पांडोझरी पारधी वस्ती ही गावे ओस पडली आहेत.गावात फक्त वयोवृद्धच वास्तव्यास असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. आटपाडी तालुक्यातील करगणी, गोमेवाडी, दिघंची, लिंगीवरे, खरसुंडी, बनपुरी परिसरातील काही तरुणांनी पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर शहराकडे रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगली