शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच झाले बंद, प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:22 IST

डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी

सांगली : शासनाकडून पुरेसा तांदूळ मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील एक लाख ७० हजार १८५ विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची हेळसांड चालू आहे. सध्या तांदूळच नसल्यामुळे ५० टक्के शाळांमधील मध्यान्ह भोजनच बंद झाल्यामुळे गरीब कुटुंबातील मुलांची उपासमार सुरू झाली आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार आहे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार ७३०.३५ टन तांदळाची गरज होती. तशी मागणीही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाकडे केली होती. यापैकी शासनाने एक हजार ६१.१८२ टन तांदूळ मंजूर केला. प्रत्यक्षात ६६१ टनच तांदूळ जिल्ह्याला मिळाला असून, ४०० टन तांदूळ मिळालाच नाही. डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी केली होती.

यापैकी बुधवार, दि. २५ रोजी २४० टन तांदूळ मिळाला आहे. पोषण आहारासाठी तांदूळच मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच बंद आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडील लेखाधिकारी यांच्याकडे विचारले असता, शासनाकडूनच तांदूळ मिळत नसल्यामुळे पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.फेब्रुवारी, मार्चसाठी १७३० टन तांदूळ हवाजिल्ह्यातील एक लाख ७० हजार १८५ विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी फेब्रुवारी, मार्च २०२३ या दोन महिन्यांसाठी एक हजार ७३० टन तांदळाची शिक्षण विभागाने शासनाकडे मागणी केली आहे. परंतु, शासनाने डिसेंबर, जानेवारी महिन्याचेच पूर्ण तांदूळ दिला नाही. यामुळे फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांचा तांदूळ तरी वेळेत मिळणार का?, असा जि. प. प्रशासनाला प्रश्न पडला आहे.महापालिका क्षेत्रात २० दिवसांपासून बंदमहापालिका क्षेत्रातील शाळांना गेल्या २० दिवसांपासून तांदूळ मिळालेला नाही. यामुळे जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी अनुदानातील शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन गेल्या २० दिवसांपासून मिळत नाही. याबाबत सध्या पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पालकांच्या तक्रारीने शिक्षक हैराण झाले आहेत.जिल्ह्याची अशी आहे परिस्थिती

  • मध्यान्ह भोजनाचे विद्यार्थी : १७०१८५
  • दोन महिन्यांसाठी लागणारा तांदूळ : १७३० टन
  • शासनाकडून मंजूर : १०६१.१६२
  • प्रत्यक्षात मिळाला : ९०१
टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थी