शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच झाले बंद, प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:22 IST

डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी

सांगली : शासनाकडून पुरेसा तांदूळ मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील एक लाख ७० हजार १८५ विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची हेळसांड चालू आहे. सध्या तांदूळच नसल्यामुळे ५० टक्के शाळांमधील मध्यान्ह भोजनच बंद झाल्यामुळे गरीब कुटुंबातील मुलांची उपासमार सुरू झाली आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार आहे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार ७३०.३५ टन तांदळाची गरज होती. तशी मागणीही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाकडे केली होती. यापैकी शासनाने एक हजार ६१.१८२ टन तांदूळ मंजूर केला. प्रत्यक्षात ६६१ टनच तांदूळ जिल्ह्याला मिळाला असून, ४०० टन तांदूळ मिळालाच नाही. डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी केली होती.

यापैकी बुधवार, दि. २५ रोजी २४० टन तांदूळ मिळाला आहे. पोषण आहारासाठी तांदूळच मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच बंद आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडील लेखाधिकारी यांच्याकडे विचारले असता, शासनाकडूनच तांदूळ मिळत नसल्यामुळे पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.फेब्रुवारी, मार्चसाठी १७३० टन तांदूळ हवाजिल्ह्यातील एक लाख ७० हजार १८५ विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी फेब्रुवारी, मार्च २०२३ या दोन महिन्यांसाठी एक हजार ७३० टन तांदळाची शिक्षण विभागाने शासनाकडे मागणी केली आहे. परंतु, शासनाने डिसेंबर, जानेवारी महिन्याचेच पूर्ण तांदूळ दिला नाही. यामुळे फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांचा तांदूळ तरी वेळेत मिळणार का?, असा जि. प. प्रशासनाला प्रश्न पडला आहे.महापालिका क्षेत्रात २० दिवसांपासून बंदमहापालिका क्षेत्रातील शाळांना गेल्या २० दिवसांपासून तांदूळ मिळालेला नाही. यामुळे जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी अनुदानातील शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन गेल्या २० दिवसांपासून मिळत नाही. याबाबत सध्या पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पालकांच्या तक्रारीने शिक्षक हैराण झाले आहेत.जिल्ह्याची अशी आहे परिस्थिती

  • मध्यान्ह भोजनाचे विद्यार्थी : १७०१८५
  • दोन महिन्यांसाठी लागणारा तांदूळ : १७३० टन
  • शासनाकडून मंजूर : १०६१.१६२
  • प्रत्यक्षात मिळाला : ९०१
टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थी