शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
3
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
4
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
5
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
6
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
7
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
8
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपिचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
9
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश
10
मुलींकडील आयपॅड काढून घेतले, अभ्यास करायला सांगितले, आईची थेट तुरुंगात रवानगी, पोलिसांनी केली कारवाई 
11
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
12
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
13
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
14
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
15
आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका
16
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
18
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
19
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
20
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या

सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये तीन हजार एकरांत एमआयडीसी - उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:59 IST

'मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना संयम ठेवावा'

सांगली : सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे तीन हजार एकर जागेवर पश्चिम महाराष्ट्रातील सुसज्ज अशी एमआयडीसी उभारली जाणार आहे. त्यासाठी जागा संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सांगलीत हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र आणि डिफेन्सचा प्रकल्प उभारण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. सहा महिने ते वर्षात सांगलीत मोठा प्रकल्प आणला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.सांगलीत पश्चिम महाराष्ट्र उद्योग, व्यापार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, उद्योग, व्यापार परिषदेत विविध मागण्या, अडचणी मांडल्या आहेत. मिरज औद्योगिक व विकासासाठी ३७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यातील १८ कोटी रुपये रस्ते, तर दिवाबत्तीसाठी नऊ कोटी रुपये खर्च केले जातील. म्हसवड येथे तीन हजार एकरांवर पश्चिम महाराष्ट्रातील सुसज्ज अशी एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. केंद्राच्या मदतीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक क्रांती होऊन विकासाला चालना मिळेल.

सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यात अमली पदार्थ उत्पादन केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे बंद असलेल्या कारखान्याची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. शिवसेनेत येण्यासाठी सांगलीसह राज्यातील अनेकजण इच्छुक आहेत. त्याबाबत लवकरच घडामोड झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या हालचाली सुरू आहेत. राज्य सरकारने कोणताही आक्षेप घेतला नसल्याबाबत विचारले असता मंत्री सामंत म्हणाले, यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या भागातील लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत मांडणार आहे.

त्यांनी इतिहासावर बोलू नयेराहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याबाबत मंत्री सामंत म्हणाले, सोलापूरकर हे माझे मित्र आहेत; परंतु त्यांनी इतिहासाबाबत बोलणे थांबवावे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबत आणि डॉ. आंबेडकरांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे व निषेधार्ह आहे, असे सामंत म्हणाले.

‘मी नाराज नाही’उद्योग विभागातील काही अधिकारी परस्पर निर्णय घेतात. माझ्या विभागात काय अपेक्षा आहेत, याबाबतची विचारणा करणे आवश्यक आहे, याबाबतची नाराजी प्रधान सचिवांकडे व्यक्त केली आहे. मी नाराज असल्याची चर्चा होत असली तरी मी नाराज नाही. सांगली नाट्यपंढरी आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यांवर जर कृत्रिम हास्य दिसत असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल, असे सामंत म्हणाले.

जरांगे यांनी संयम ठेवावाओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; परंतु यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना संयम ठेवावा. गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरUday Samantउदय सामंत