शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

‘म्हैसाळ’च्या पाण्यावरून कलगीतुरा रंगला

By admin | Updated: March 14, 2016 00:07 IST

अनेक भागात पाणी पोहोचलेच नाही : दुजाभाव होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

 सांगली : म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी आणि त्याकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, या पार्श्वभूमीवर अखेर शेतकऱ्यांनी व साखर कारखान्यांनी भरलेल्या रकमेतून पाणी सुरु झाले असले तरी, पाण्याच्या लाभावरुन गावा-गावांत चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून आवर्तनाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात झालेली दिरंगाई व शेतकऱ्यांकडून काही विशिष्ट भागालाच पाणी सोडले जात असल्याच्या आरोपामुळे शेतकऱ्यांत असंतोष दिसत असून, म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समान पाणी मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. यावर्षी प्रथमच म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तीव्र स्वरुपाचा संघर्ष करावा लागला. यापूर्वी शेतकऱ्यांच्या मागणीअगोदरच काहीवेळा आवर्तने सुरु झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र, थकबाकी भरावी, या मुद्यावर शासनाने घेतलेली ठाम भूमिका व शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादामुळे अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा आवर्तन सुरु झाले. यातही साखर कारखान्यांनी महत्त्वाची भूमिका घेत थकबाकी भरण्यास मदत केल्यानेच आवर्तन सुरु होऊ शकले. आवर्तन सुरु होऊन त्याचा वापर सुरु झाला असतानाच, आता मुख्य कालव्यांर्तगत येणारे शाखा कालवे व पोटकालव्यांना पाणी सोडण्यावरुन शेतकऱ्यांतच संघर्ष होताना दिसत आहे. प्रशासनाने सर्वप्रथम मुख्य कालव्यातून संपूर्ण लाभक्षेत्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले असून त्यासाठी कोठेही सायफन पध्दतीने अथवा इतर मार्गाने पाणी उचलण्यास मनाई केली होती. यातूनच आरग येथे कालवा अडवून तलावात पाणी सोडण्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासनाने कालव्यावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आता म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील खंडेराजुरी शाखा कालव्यातून व कळंबी शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी, आवर्तन सुरु होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर पाणी सोडण्यात आल्याने आमची पिके जळून गेल्यानंतर पाणी सोडल्याचा आरोप या भागातील शेतकरी करीत आहेत. थकबाकी वसुलीस प्रतिसाद देणाऱ्या मालगाव भागात कळंबी शाखा कालव्यातून पाणी पोहोचत असले तरी, या कालव्यातून दोन दिवसापूर्वी पाणी सोडण्यात आले आहे. खंडेराजुरी शाखा कालव्यात झुडपे वाढल्याने पाण्यास अडथळा निर्माण होत असून शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसुली होताना ती पूर्णवेळची होणार आणि त्याचा लाभ मात्र पंधरा दिवस उशिरा मिळत असल्यानेच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हीच अवस्था पोटकालव्यांची असून अनेक भागात वारेमाप पाणी सोडण्यात आले असून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असताना, खरी पाण्याची गरज असणारा भाग मात्र वंचित राहत आहे. यात राजकीय दबावामुळे प्रशासन नामोहरम झाल्याचेच दिसून येत आहे. प्रशासनाने आता पोटकालवे आणि शाखा कालव्यांची पाहणी करुन नियोजनाची गरज असताना, असे होत नसल्यानेच शेतकऱ्यांत असंतोष निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)पाण्याचे नियोजन करा, अन्यथा आंदोलन छेडणारपाण्याचे नियोजन योग्य होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असून प्रशासनाने तातडीने पाण्याचे नियोजन करावे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचा लवकरच दौरा करुन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. कोणताही गट-तट न पाहता सर्व भागाला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रशासनाने तातडीने पाण्यापासून वंचित भागाला पाणी सोडण्याचे नियोजन करावे. प्रसंगी प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मिरज पंचायत समितीचे सभापती जयश्री पाटील यांनी दिला.हजारो लिटर पाण्याची नासाडीयोजनेच्या पोटकालव्यातून सोडण्यात आलेले पाणी त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाल्यानंतर बंद होणे गरजेचे असताना, पाणी सुरुच राहिल्याने विनावापर हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मिरज पूर्व भागातील अनेक गावांत रस्त्याच्या कडेने असे पाणी वाया जाताना दिसून येत आहे.