शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Sangli: मणदूरकरांनी साजरा केला दारूबंदीचा लोकोत्सव, तरुणांनी चालू ठेवली पूर्वजांची प्रथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:49 IST

अनोखा उपक्रम : आध्यात्मिक संकल्पाची पणती तेवत

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात वसलेले चारशे ते साडेचारशे लोकसंख्या असलेल्या मणदूर - धनगरवाडा (ता. शिराळा) गावाने दारूबंदीचा ४५ वा वर्धापनदिन लोकोत्सव स्वरूपात साजरा केला. १९८० साली गुढीपाडव्याला गावातील काही वरिष्ठांनी श्री शेवताई देवीच्या मंदिरात नारळावर हात मारून शपथ घेतली दारू प्यायची नाही. या शपथेचा आता इतिहास घडला आहे. या घटनेची आठवण ठेवत गावकरी दरवर्षी गुढीपाडव्याला धार्मिक कार्यक्रम घेत लोकोत्सवच साजरा करीत आहेत.१९८० मध्ये धोंडिबा डोईफोडे, साकृ डोईफोडे, कोंडिबा डोईफोडे, भैरू डोईफोडे, दिनकर शेटके, बाळकू डोईफोडे, नामदेव जोवरे, धोंडीबा लंबोड, बाबूराव डोईफोडे, आदी मंडळी गुढीपाडव्यादिवशी पारावर दारूमुळे आपल्यातील काही कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, याची चर्चा करत होती. अखेर यावर थेट दारूबंदीचाच निर्णय त्यांनी घेतला.

सर्व गावातील मंडळी ग्रामदैवत श्री शेवताईच्या मंदिरात गेले, त्याठिकाणी नारळावर हात ठेवून सर्वांनी दारू न पिण्याची शपथ घेतली. कोणी दारू पिली तर त्यास असहकार्य करण्याचे ठरले. यानंतर दर गुढीपाडव्याला सत्यनारायणाची पूजा घालून दारूबंदीचा वर्धापनदिन साजरा करण्यात येऊ लागला.

२००६ पासून या सात दिवसांचा पारायण सोहळाही सुरू केला. यामुळे गावात दारूबंदीची यात्राच सुरू झाली. गुढीपाडव्याला मुंबईतील चाकरमानी गावात येतात. त्यामुळे मोठा उत्साह याठिकाणी भरू लागला. गेल्या ४५ वर्षांच्या दारूबंदीने गावाने आदर्श निर्माण केला आहे. यंदा दारूबंदीचा वर्धापनदिन व आध्यात्मिक कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी भेट देऊन गावच्या कार्याचे कौतुक केले.

पूर्वजांची प्रथा तरुणांकडून कायमधनगरवाड्यातील पूर्वजांची प्रथा आजच्या तरुणांनी कायमस्वरूपी पुढे चालू ठेवली आहे. पूर्वीच्या जुन्या जाणकार लोकांनी हा अभिनव उपक्रम राबवून एक आध्यात्मिक निर्धाराची लावलेली पणती या पुढील काळात ही तरुण मंडळी निष्ठेने व तेवढ्याच ताकदीने ती तेवत ठेवतील, असे मत रणधीर नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागले होते. गावकऱ्यांनी १९८० च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शपथ घेऊन दारूबंदी केली. या निमित्ताने दरवर्षी हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन असे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो. मुंबईला गेलेले लोक यानिमित्ताने गावी येतात. ही गावची यात्राच गावाने सुरू केली आहे. - बाबूराव डोईफोडे, ग्रामस्थ

टॅग्स :Sangliसांगलीliquor banदारूबंदी