शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Sangli: मणदूरकरांनी साजरा केला दारूबंदीचा लोकोत्सव, तरुणांनी चालू ठेवली पूर्वजांची प्रथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:49 IST

अनोखा उपक्रम : आध्यात्मिक संकल्पाची पणती तेवत

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात वसलेले चारशे ते साडेचारशे लोकसंख्या असलेल्या मणदूर - धनगरवाडा (ता. शिराळा) गावाने दारूबंदीचा ४५ वा वर्धापनदिन लोकोत्सव स्वरूपात साजरा केला. १९८० साली गुढीपाडव्याला गावातील काही वरिष्ठांनी श्री शेवताई देवीच्या मंदिरात नारळावर हात मारून शपथ घेतली दारू प्यायची नाही. या शपथेचा आता इतिहास घडला आहे. या घटनेची आठवण ठेवत गावकरी दरवर्षी गुढीपाडव्याला धार्मिक कार्यक्रम घेत लोकोत्सवच साजरा करीत आहेत.१९८० मध्ये धोंडिबा डोईफोडे, साकृ डोईफोडे, कोंडिबा डोईफोडे, भैरू डोईफोडे, दिनकर शेटके, बाळकू डोईफोडे, नामदेव जोवरे, धोंडीबा लंबोड, बाबूराव डोईफोडे, आदी मंडळी गुढीपाडव्यादिवशी पारावर दारूमुळे आपल्यातील काही कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, याची चर्चा करत होती. अखेर यावर थेट दारूबंदीचाच निर्णय त्यांनी घेतला.

सर्व गावातील मंडळी ग्रामदैवत श्री शेवताईच्या मंदिरात गेले, त्याठिकाणी नारळावर हात ठेवून सर्वांनी दारू न पिण्याची शपथ घेतली. कोणी दारू पिली तर त्यास असहकार्य करण्याचे ठरले. यानंतर दर गुढीपाडव्याला सत्यनारायणाची पूजा घालून दारूबंदीचा वर्धापनदिन साजरा करण्यात येऊ लागला.

२००६ पासून या सात दिवसांचा पारायण सोहळाही सुरू केला. यामुळे गावात दारूबंदीची यात्राच सुरू झाली. गुढीपाडव्याला मुंबईतील चाकरमानी गावात येतात. त्यामुळे मोठा उत्साह याठिकाणी भरू लागला. गेल्या ४५ वर्षांच्या दारूबंदीने गावाने आदर्श निर्माण केला आहे. यंदा दारूबंदीचा वर्धापनदिन व आध्यात्मिक कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी भेट देऊन गावच्या कार्याचे कौतुक केले.

पूर्वजांची प्रथा तरुणांकडून कायमधनगरवाड्यातील पूर्वजांची प्रथा आजच्या तरुणांनी कायमस्वरूपी पुढे चालू ठेवली आहे. पूर्वीच्या जुन्या जाणकार लोकांनी हा अभिनव उपक्रम राबवून एक आध्यात्मिक निर्धाराची लावलेली पणती या पुढील काळात ही तरुण मंडळी निष्ठेने व तेवढ्याच ताकदीने ती तेवत ठेवतील, असे मत रणधीर नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागले होते. गावकऱ्यांनी १९८० च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शपथ घेऊन दारूबंदी केली. या निमित्ताने दरवर्षी हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन असे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो. मुंबईला गेलेले लोक यानिमित्ताने गावी येतात. ही गावची यात्राच गावाने सुरू केली आहे. - बाबूराव डोईफोडे, ग्रामस्थ

टॅग्स :Sangliसांगलीliquor banदारूबंदी