शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

मालगाव पाणी योजना आर्थिक संकटात-पाणीपट्टीची थकबाकी ८४ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:49 IST

मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स बंद करण्याची कारवाई सुरु

ठळक मुद्देग्रामपंचायतीकडून वसुलीसाठी पाणी कनेक्शन केली बंद

अण्णा खोत ।मालगाव : मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. पण, यासही नागरिकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे.

शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून मालगाव ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना राबविली आहे. या योजनेमुळे शुध्द पाणी पुरवठ्याची सोय झाली आहे. महावितरणचा विजेचा दरही जादा असल्यामुळे वसूल होणाऱ्या पाणीपट्टीत योजना चालविणे ग्रामपंचायतीसमोर मोठे आव्हान आहे. याचबरोबर अनेक कुटुंबियांनी पाणी पुरवठ्याचे कनेक्शनच घेतलेले नाही. मालगावची लोकसंख्या ४० हजार असूनही गावांमध्ये केवळ १४७५ जणांनी पाणी कनेक्शन्स घेतली आहेत. यापूर्वीच्या ग्रामविकास अधिकाºयांनी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने सध्या चालूसह जुनी पाणीपट्टी ८४ लाखांवर पोहोचली आहे. या योजनेच्या थकीत वीज बिलाचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असून सध्या ३५ लाखांची थकबाकी झाली आहे. पाणीपट्टीची वसुली नसल्याने पाणी योजनेला ग्रहण लागले आहे.

वीज बिल थकबाकीमुळे महावितरणने वसुलीच्या नोटिसा ग्रामपंचायतीला बजावल्या आहेत. थकीत पाणीपट्टीच्या ८४ लाख रुपये थकबाकीपैकी वसुली मोहिमेत ७० हजार रुपयांची वसुली झाली आहे. या रकमेतून चालूचे वीज बिल भरल्यामुळे वीज परवठा खंडितचा धोका टळला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळे योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला नसल्यामुळे गावाला पाणी पुरवठ्याची टंचाई नाही. असे असले तरी थकीत वीज बिलासाठी महावितरणच्या अधिकाºयांकडून मालगाव पाणी योजनेचा वीज पुरवठा कोणत्याहीक्षणी खंडित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने कठोर पाऊल उचलत पाणीपट्टीची थकबाकी असलेल्यांची कनेक्शन्स तोडण्याची गरज आहे. थकीत पाणीपट्टी वसुलीच्या मोहिमेत ३० ते ४० पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स ग्रामपंचायतीने बंद केली आहेत. यापुढेही कारवाईची मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले.थकबाकीचा बोजा : घरावर चढवण्यात येणारयोजना चालविताना देखभाल, दुरूस्ती व वीज बिलासाठी तरतूद ही पाणीपट्टीच्या वसुलीवर अवलंबून आहे. सद्यस्थितीला वीज बिल सुमारे ३५ लाखथकीत बिलाची वसुली न झाल्यास त्याचा वाईट परिणाम योजनेवर होण्याची शक्यता असल्याने वसुलीसाठी नळ कनेक्शन्स खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. थकबाकी न भरणाºयांच्या घरावर थकबाकीचा बोजा चढविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी याची दखल घेऊन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन गटनेते प्रदीप सावंत, सरपंच असलम मुजावर व ग्रामविकास अधिकारी डी. आर. शिंदे यांनी केले आहे.सहकार्य करावेवसुलीसाठी ग्रामपंचायतीने नळकनेक्शन खंडीत करण्याची मोहीम राबविली आहे. पाणी योजना टिकविण्यासाठी ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरणे आवश्यक आहे. कर वसुलीसाठी ग्रामविकास अधिकाºयांना अधिकार दिल्याचे सरपंच असलम मुजावर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई