शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

मालगाव पाणी योजना आर्थिक संकटात-पाणीपट्टीची थकबाकी ८४ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:49 IST

मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स बंद करण्याची कारवाई सुरु

ठळक मुद्देग्रामपंचायतीकडून वसुलीसाठी पाणी कनेक्शन केली बंद

अण्णा खोत ।मालगाव : मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. पण, यासही नागरिकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे.

शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून मालगाव ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना राबविली आहे. या योजनेमुळे शुध्द पाणी पुरवठ्याची सोय झाली आहे. महावितरणचा विजेचा दरही जादा असल्यामुळे वसूल होणाऱ्या पाणीपट्टीत योजना चालविणे ग्रामपंचायतीसमोर मोठे आव्हान आहे. याचबरोबर अनेक कुटुंबियांनी पाणी पुरवठ्याचे कनेक्शनच घेतलेले नाही. मालगावची लोकसंख्या ४० हजार असूनही गावांमध्ये केवळ १४७५ जणांनी पाणी कनेक्शन्स घेतली आहेत. यापूर्वीच्या ग्रामविकास अधिकाºयांनी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने सध्या चालूसह जुनी पाणीपट्टी ८४ लाखांवर पोहोचली आहे. या योजनेच्या थकीत वीज बिलाचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असून सध्या ३५ लाखांची थकबाकी झाली आहे. पाणीपट्टीची वसुली नसल्याने पाणी योजनेला ग्रहण लागले आहे.

वीज बिल थकबाकीमुळे महावितरणने वसुलीच्या नोटिसा ग्रामपंचायतीला बजावल्या आहेत. थकीत पाणीपट्टीच्या ८४ लाख रुपये थकबाकीपैकी वसुली मोहिमेत ७० हजार रुपयांची वसुली झाली आहे. या रकमेतून चालूचे वीज बिल भरल्यामुळे वीज परवठा खंडितचा धोका टळला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळे योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला नसल्यामुळे गावाला पाणी पुरवठ्याची टंचाई नाही. असे असले तरी थकीत वीज बिलासाठी महावितरणच्या अधिकाºयांकडून मालगाव पाणी योजनेचा वीज पुरवठा कोणत्याहीक्षणी खंडित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने कठोर पाऊल उचलत पाणीपट्टीची थकबाकी असलेल्यांची कनेक्शन्स तोडण्याची गरज आहे. थकीत पाणीपट्टी वसुलीच्या मोहिमेत ३० ते ४० पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स ग्रामपंचायतीने बंद केली आहेत. यापुढेही कारवाईची मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले.थकबाकीचा बोजा : घरावर चढवण्यात येणारयोजना चालविताना देखभाल, दुरूस्ती व वीज बिलासाठी तरतूद ही पाणीपट्टीच्या वसुलीवर अवलंबून आहे. सद्यस्थितीला वीज बिल सुमारे ३५ लाखथकीत बिलाची वसुली न झाल्यास त्याचा वाईट परिणाम योजनेवर होण्याची शक्यता असल्याने वसुलीसाठी नळ कनेक्शन्स खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. थकबाकी न भरणाºयांच्या घरावर थकबाकीचा बोजा चढविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी याची दखल घेऊन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन गटनेते प्रदीप सावंत, सरपंच असलम मुजावर व ग्रामविकास अधिकारी डी. आर. शिंदे यांनी केले आहे.सहकार्य करावेवसुलीसाठी ग्रामपंचायतीने नळकनेक्शन खंडीत करण्याची मोहीम राबविली आहे. पाणी योजना टिकविण्यासाठी ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरणे आवश्यक आहे. कर वसुलीसाठी ग्रामविकास अधिकाºयांना अधिकार दिल्याचे सरपंच असलम मुजावर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई