शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

कोयनेचे पाणीनियोजन आणीबाणी स्तरावर करा, भारत पाटणकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:36 IST

फडणवीस यांच्यासोबत बैठकीसाठी प्रयत्न

सांगली : कोयना धरणातील पाण्याच्या ढोबळ आणि अशास्त्रीय नियोजनामुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे. शासनाने उपलब्ध पाण्याचे नियोजन आणीबाणी स्तरावर करावे, असे आवाहन पाणी धोरण संघर्ष मंचाचे सहनिमंत्रक भारत पाटणकर यांनी केले आहे. यासंदर्भात चर्चेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीची विनंती केली आहे.उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोयना धरणातीलपाणी वापराची तूट १९.७१ टीएमसी आहे. ३५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरायचे आहे. त्यापैकी १२ टीएमसी पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरण्याचा विचार शासन करत आहे. याचा वीजनिर्मितीवर व उपसा सिंचन योजनांवर काय परिणाम होणार याचा विचार आवश्यक आहे. या स्थितीत राज्यासाठी ग्रीडमधून वीज घेण्याचे नियोजन करावे लागेल. त्यामुळे १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी वळवता येईल. हा निर्णय आणीबाणीच्या पातळीवर घ्यावा.

पाटणकर यांनी सांगितले की, कोयना धरणात सध्या ८० टीएमसी पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी ३५ टीएमसी वीजनिर्मितीसाठी गेल्यास ४५ टीएमसी पिण्यासाठी व सिंचनासाठी राहते. त्यात आणखी १२ टीएमसी वळवले, तर ५७ टीएमसी होते. मात्र याच्या उपलब्धतेसाठी गांभीर्याने विचार करावा लागेल. 

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजनांतून पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. बेकायदा उपसा होतो. त्याविरोधात कडक धोरण राबवावे. शेवटाकडून सुरुवातीला पाणी वितरणाचे धोरणही काटेकोरपणे राबवावे. प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी. यासंदर्भात अधिवेशनापूर्वी व्यापक बैठकीचे नियोजन उपमुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी